शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

ठाणे जिल्ह्यातील २२५७८ असाक्षरांचा लेखी परीक्षेला उत्तम प्रतिसाद

By सुरेश लोखंडे | Updated: March 17, 2024 17:15 IST

शिक्षण खात्याच्या योजना विभागाकडून उल्लास- नवभारत साक्षरता हे अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. १

ठाणे : केंद्र पुरस्कृत उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी ठाणे जिल्ह्यातील असाक्षरांची पायाभुत साक्षरता आणि मुल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील २२ हजार ५७८ असाक्षरांनी ही परीक्षा दिली. स्त्री व पुरूषांचा सहभाग असलेल्या या परीक्षार्थीनी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या एक हजार ६२८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा दिली आहे. या परीक्षेला जिल्ह्याभरात उत्तम प्रतिसाद मिळाला असे शिक्षणाधिकारी (याेजना) भावना राजनाेर यांनी लाेकमतला सांगितले.            

जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर पार पडलेली ही परीक्षा वाचन, लेखन आणि संख्याज्ञान अशा तीन भागां घेण्यात आली. त्येकी ५० या प्रमाणे १५० गुणांची ही ऑफलाईन परीक्षा हाेती. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागात किमान ३३ गुण आवश्यक आहेत,या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकत्रित हाेत्या. प्रत्यक्ष पेपरला तीन तासांचा कालावधी देण्यात आला. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जास्त वेळ दिला आहे. जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांचे साक्षरतेचे वर्ग घेतल्यानंतर आज त्यांची ही लेखी परीक्षा जिल्ह्यात घेण्यात आली.शिक्षण खात्याच्या योजना विभागाकडून उल्लास- नवभारत साक्षरता हे अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. १५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या असाक्षरांना साक्षर बनवण्यासाठी हा उपक्रम आहे. यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, जीवन कौशल्ये विकसित करणे हे मुख्य उद्दीष्ठ या अभियानाचे आहे, त्यात लेखन, वाचन, संख्याज्ञानासह आर्थिक साक्षरता, कायदा आणि डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्यनिहाय बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण अशा घटकांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, गटस्तरीय, केंद्रस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून ही परीक्षा आज घेण्यात आली.