शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

ठाणे जिल्ह्यात कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगांव बदलापूर २२ टक्के पाणी कपातीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 19:03 IST

बारवी धरणासह उल्हासनदीला पाणी पुरवठा करणाºया आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणाºया पाणी पुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणी कपातीचा सक्तीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला.

ठळक मुद्देबारवी धरणासह उल्हासनदीला पाणी पुरवठा करणा-या आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणा-या पाणी पुरवठ्यात २२ टक्के तूटएमआयडीसी, केडीएमसी, स्टेम आणि एमजेपी आदींव्दारे ठिकठिकाणच्या शहरांना रोज सुमारे एक हजार १९२ एमएलडी पाणी पुरवठापाणी पुरवठ्यातून आठवड्याभरात २२ टक्के पाणी बचत

ठाणे : ठाणेच्या मुंब्रा - कळवा या भागासह जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगांव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून २२ टक्के पाणी कपात आठवड्याभरात करण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. यामुळे आता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी ठिकठिकाणी होणारा पाणी पुरवठा एक दिवसपूर्ण बंद ठेवण्याची सक्ती आता लागू झाली आहे.बारवी धरणासह उल्हासनदीला पाणी पुरवठा करणा-या आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणा-या पाणी पुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणी कपातीचा सक्तीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला. एमआयडीसी, केडीएमसी, स्टेम आणि एमजेपी आदींव्दारे ठिकठिकाणच्या शहरांना रोज सुमारे एक हजार १९२ एमएलडी पाणी पुरवठा होतो. या पाणी पुरवठ्यातून आठवड्याभरात २२ टक्के पाणी बचत करायची आहे. यामुळे महापालिकांनी एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून ही सक्तीची पाणी कपात लागू झाली आहे. यानुसार बारवी धरणासह उल्हासनदीतून पाणी उचलणा-या एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील कारखाने, कंपन्यांसह उल्हासनगर मनपा आदी ठिकाणी होणारा पाणी पुरवठा आता शुक्रवारी या एक दिवसा करीता बंद ठेवण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यामुळे एमआयडीसीकडून सुमारे ५८३ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची बचत होणार आहे.याप्रमाणेच कल्याण - डोंबिवलीचा २३४ एलएलडी पाणी पुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येईल. तर स्टेमव्दारे उचलण्यात येणारा २८५ एमएलडी पाणी पुरवठा बुधवारी बंद ठेवण्यात येईल. यामुळे स्टेमव्दारे करण्यात येणारा पाणी पुरवठा ठाणेच्या घोडबंदरसह शहरातील काही भागांसह भिवंडी मनपासह मीरा भार्इंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील गावखे्यांचा पाणी पुरवठा बुधवारी बंद ठेवण्यात येईल. याशिवाय अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पाणी पुरवठा करणारे महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सोमवारी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे ९० एमएलडी पाणी बचत एमजेपीकडून बचत होणार आहे. या पाणी कपातीमुळे बचत होणारे धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे.जिल्ह्यात सक्तीने लागू केलेली २२ टक्के पाणी कपात आगामी दिवाळी, ईद आदी सणासुदीच्या काळात मात्र रद्द करण्यात येणार आहे. यामुळे सणातिवाराच्या कालावधीत मात्र मनसोक्त नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. धरणातील पाण्यातील तूट लक्षात घेऊन गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एक महिना आधी ही सक्तीची पाणी कपात लागू करावी लागली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून १४ टक्के कपात लागू केली होती . मात्र फेब्रुवारी , मार्चला ती ७ टक्के केली होती. त्यानंतर ती रद्द केली होती. पण आता धरणातील कमी साठा लक्षात घेऊन लघूपाटबंधारे विभागाने सक्तीचे २२ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार महापालिकांसह एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदींना तो सक्तीने पाळावा लागणार आहे.

टॅग्स :thaneठाणेwater shortageपाणीटंचाई