शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ठाण्यात रस्त्याच्या कामात २०० कोटींचा घोटाळा? लाखाची लाच घेताना जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:45 IST

ठाणे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पद्माकर सुखदेवे यांना एक लाखाची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडले. त्यांच्या अटकेनंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि भिवंडी या तालुक्यांत एमएमआरडीएअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा सुमारे २०० कोटींचा घोटाळा उघड होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पद्माकर सुखदेवे यांना एक लाखाची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडले. त्यांच्या अटकेनंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि भिवंडी या तालुक्यांत एमएमआरडीएअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा सुमारे २०० कोटींचा घोटाळा उघड होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.सुखदेवे यांनी टेंडरप्रक्रियेत सर्वच अटीशर्तींना बाजूला ठेवून स्वत:च्या फायद्यासाठी त्यांच्या मर्जीतील कंपन्यांना लाभ होईल, अशी टेंडर प्रक्रिया पूर्ण केली, असा दावा एसीबीच्या अधिकाºयांकडून केला जात आहे.रस्त्याच्या कामाच्या ६० लाखांच्या मंजूर झालेल्या बिलाचा मोबदला म्हणून सुखदेवे याने त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी केल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. मंगळवारी सायंकाळी सुखदेवे याच्या कार्यालय परिसरात सापळा लावला. मागितलेल्या रकमेतील लाखाचा पहिला हप्ता घेताना त्याला रंगेहाथ पकडले. अटक करून बुधवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता जामिनावर त्याची सुटका झाली. मात्र, सोमवारी आणि गुरुवारी एसीबी कार्यालयात हजर राहण्याबाबत सांगितले आहे.जिल्ह्यात एमएमआरडीएअंतर्गत २०० कोटींच्या कामांसाठी मध्यंतरी टेंडर प्रक्रिया राबवताना, सुखदेवे यांनी त्यांच्या फायद्यासाठी नामांकित कंपन्यांना ती कामे न देता, त्यांच्या मर्जीतील कंपन्यांना कामे देण्यास सुरुवात केली. काही ठेकेदारांनी याविरुद्ध आवाज उठवला होता. त्याबाबतची तक्रार थेट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार, विखे-पाटील यांनी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करत माहिती मागवली होती. ठेकेदारांनी टेंडर प्रक्रियेची कागदपत्रे पाहण्यास मिळावी, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांच्याकडे केली होती. त्यावेळी खासदारांनीही कागदपत्रे दाखवा, असे संबंधित विभागाला सांगितले होते. मात्र, तरीसुद्धा ती कागदपत्रे दाखवण्यात आली नाहीत. भिवंडीतील १०० कोटी तर कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाडमधील ९९ कोटींच्या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.सुखदेवे यांना पकडल्याचे समजतात, काही ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात पेढेवाटप केल्याचे समजते.लोकप्रतिधिनींकडे तक्रारी केल्या जात असल्याचा राग काढण्यासाठी सुखदेवे यांनी एमएमआरडीए अंतर्गत झालेल्या कामांची बिले मंजूर करताना, ठेकेदारांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यातून त्यांनी अतिरिक्त टक्केवारीची मागणी सुरू केली. एकीकडे कामेही मिळत नाहीत आणि केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी अतिरिक्त टक्केवारीची मागणी सुरू झाल्याने अखेर त्यांच्याविरोधात ठेकेदारांमध्ये प्रचंड रोष वाढीस लागला. त्यातूनच, ही तक्रार दाखल झाल्यावर ते रंगेहाथ पकडले गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे