शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
"पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
6
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
7
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
8
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
9
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
10
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
11
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
12
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
13
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
14
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
15
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
16
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
17
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणे; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
18
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
19
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
20
पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
Daily Top 2Weekly Top 5

ई-कचऱ्यात २० टक्के वाढ; केवळ चार केंद्रांवर १९,५४० मेट्रिक टनावर प्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 05:13 IST

सध्या ई-कचरावाढीचा दर २० टक्के असून देशात मात्र हाच दर १० टक्के आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशात आयटी पार्कची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वच शहरांना निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या ई-कचरावाढीचा दर २० टक्के असून देशात मात्र हाच दर १० टक्के आहे. याची हाताळणी अनौपचारिक क्षेत्रांद्वारे होत असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मुंबई महानगर प्रदेशात याची ई-कचऱ्याची मोडतोड करून वर्गीकरण, प्रक्रिया करणारी चार केंद्रे आहेत. त्या ठिकाणी दरवर्षी १९,५४० मेट्रिक टन ई-कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. पुनर्प्रकिया करणारी १५ केंद्रे आहेत. आतापर्यंत ई-कचऱ्याचा एकदाच अभ्यास झालेला असून तो आयआरजी सिस्टीमने केला होता. त्यासाठी केवळ चार उत्पादने विचारात घेतली होती, असे एमएमआरडीएने आपल्या २०२१ च्या विकास आराखड्यात म्हटले आहे.

बंदरे आणि भंगार गोदामात वाट्टेल तशी विल्हेवाट

महानगर प्रदेशातील भिवंडी, मुंब्रा आणि तळोजा भागात भंगाराची गोदामे आहेत. सर्व नियम पायदळी तुडवून येथे ई कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. जेएनपीटी, बीपीटी या दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदरात अनेकदा काही बाहेरचे छुप्या मार्गाने कंटेनरमधून इतर देशातील टाकाऊ घातक ई-कचरा पाठवत असल्याचे उघडकीस आले आहे. परंतु, यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही. कोणी खबर दिली, वा पकडले गेले तरच सरकारी यंत्रणांकडून कारवाई होते.

ई-कचऱ्याचा धोका

- दरवर्षी मोठ्या प्रमाणात संगणक, त्यांचे सुटे भाग, लॅपटॉप, मोबाइल, झेरॉक्स मशीन, टीव्ही, टेप, स्पीकर यांचा कचरा तयार होतो. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. 

- ई-वस्तूंसाठी बेरिलियम, कॅडमियम, पारा आणि शिसे यासारख्या हानीकारक सामग्रीचा वापर होतो. ही सामग्री स्वत: विघटित होत नाही. ती पर्यावरणासाठी मोठा धोका आहे. 

- या जड धातूंची योग्य विल्हेवाट लावली नाहीत तर भूजल वाहिन्या, ओढे, नाल्यांपर्यंत पोहोचू शकतात. त्यातून त्वचा रोगाचे मोठे आव्हान आहे.

येथे वाढले आयटी पार्क

- मुंबई महानगर प्रदेशात सर्वाधिक आयटी पार्क नवी मुंबईत असून त्याखालोखाल मुंबई आणि ठाण्यात आहेत. इतर शहरात त्यांची संख्या नगण्य आहे. या ठिकाणी बॅक ऑफिससह कॉल सेंटरची संख्याही मोठी आहे.

- मुंबई-नवी मुंबईत अनेक सरकारी आणि बँकांची विभागीय कार्यालये, मोबाईल कंपन्यांची नेटवर्क हाताळणारी मुख्यालये नवी मुंबईत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेLokmatलोकमत