शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

ई-कचऱ्यात २० टक्के वाढ; केवळ चार केंद्रांवर १९,५४० मेट्रिक टनावर प्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 05:13 IST

सध्या ई-कचरावाढीचा दर २० टक्के असून देशात मात्र हाच दर १० टक्के आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशात आयटी पार्कची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वच शहरांना निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या ई-कचरावाढीचा दर २० टक्के असून देशात मात्र हाच दर १० टक्के आहे. याची हाताळणी अनौपचारिक क्षेत्रांद्वारे होत असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मुंबई महानगर प्रदेशात याची ई-कचऱ्याची मोडतोड करून वर्गीकरण, प्रक्रिया करणारी चार केंद्रे आहेत. त्या ठिकाणी दरवर्षी १९,५४० मेट्रिक टन ई-कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. पुनर्प्रकिया करणारी १५ केंद्रे आहेत. आतापर्यंत ई-कचऱ्याचा एकदाच अभ्यास झालेला असून तो आयआरजी सिस्टीमने केला होता. त्यासाठी केवळ चार उत्पादने विचारात घेतली होती, असे एमएमआरडीएने आपल्या २०२१ च्या विकास आराखड्यात म्हटले आहे.

बंदरे आणि भंगार गोदामात वाट्टेल तशी विल्हेवाट

महानगर प्रदेशातील भिवंडी, मुंब्रा आणि तळोजा भागात भंगाराची गोदामे आहेत. सर्व नियम पायदळी तुडवून येथे ई कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. जेएनपीटी, बीपीटी या दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदरात अनेकदा काही बाहेरचे छुप्या मार्गाने कंटेनरमधून इतर देशातील टाकाऊ घातक ई-कचरा पाठवत असल्याचे उघडकीस आले आहे. परंतु, यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही. कोणी खबर दिली, वा पकडले गेले तरच सरकारी यंत्रणांकडून कारवाई होते.

ई-कचऱ्याचा धोका

- दरवर्षी मोठ्या प्रमाणात संगणक, त्यांचे सुटे भाग, लॅपटॉप, मोबाइल, झेरॉक्स मशीन, टीव्ही, टेप, स्पीकर यांचा कचरा तयार होतो. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. 

- ई-वस्तूंसाठी बेरिलियम, कॅडमियम, पारा आणि शिसे यासारख्या हानीकारक सामग्रीचा वापर होतो. ही सामग्री स्वत: विघटित होत नाही. ती पर्यावरणासाठी मोठा धोका आहे. 

- या जड धातूंची योग्य विल्हेवाट लावली नाहीत तर भूजल वाहिन्या, ओढे, नाल्यांपर्यंत पोहोचू शकतात. त्यातून त्वचा रोगाचे मोठे आव्हान आहे.

येथे वाढले आयटी पार्क

- मुंबई महानगर प्रदेशात सर्वाधिक आयटी पार्क नवी मुंबईत असून त्याखालोखाल मुंबई आणि ठाण्यात आहेत. इतर शहरात त्यांची संख्या नगण्य आहे. या ठिकाणी बॅक ऑफिससह कॉल सेंटरची संख्याही मोठी आहे.

- मुंबई-नवी मुंबईत अनेक सरकारी आणि बँकांची विभागीय कार्यालये, मोबाईल कंपन्यांची नेटवर्क हाताळणारी मुख्यालये नवी मुंबईत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेLokmatलोकमत