शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

गावपाड्यांतील रस्त्यांच्या डागडुजीसाठी हवेत 20 कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 23:53 IST

शहापूर, मुरबाडमध्ये पावसामुळे रस्त्यांचे नुकसान

सुरेश लोखंडेठाणे :  मुंबई  महानगराला लागून असलेला ठाणे जिल्हा चार हजार २१४ चौकिमीमध्ये विस्तारला आहे. मुंबई गाठण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील रस्ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. पण, आजही या जिल्ह्यातील गावपाड्यांना जोडणारे रस्ते जीवघेणे ठरत आहेत. यंदाच्या सर्वाधिक दोन हजार ६५२.४१ मिमी पावसामुळे जिल्ह्यातील या रस्त्यांची चाळण झाली आहे. निखळून पडलेली खडी आणि त्यात खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी २० कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षा ठाणे जिपच्या बांधकाम विभागाने केली आहे.

जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायतींच्या गावपाड्यांना जोडण्याचे काम व या गावांचा विकास साधण्यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते आणि त्यावरील दळणवळणाची साधणे आवश्यक आहे. पण, या रस्त्यांची दयनीय अवस्था ग्रामस्थांच्या जीवावर उठली आहे. त्यात यंदा पावसाच्या मनमानी संततधारेमुळे रस्त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.  आदिवासी, दुर्गम भागाच्या शहापूर तालुक्यात यंदा ९३.७३ मिमी, मुरबाड तालुक्यात ६८.४१ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे रस्त्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. याप्रमाणेच भिवंडी, कल्याण व अंबरनाथच्या रस्त्यांमुळे गावखेड्यांचे रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. या खराब रस्त्यांमुळे एसटी बसही वेळेवर धावत नाहीत. 

रस्ता दुरूस्तीसाठी २० कोटी एवढ्या निधीची मागणी

जिल्ह्यात ३१००.०२९  किमी लांबीचे रस्ते   इतर जिल्हामार्ग - ६४०.३९५ किमी ग्रामीण मार्ग-२४५९ किमी.           त्यापैकी २२ किमी लांबीचे खड्डे आहेत. 

ठरावाचा लाभ कमी ३,१०० किमीचे गावरस्ते (व्हीर) इतर जिल्हा मार्गात (ओडीआर) समाविष्ट करा व ओडीआरचे मुख्य जिल्हामार्गात (एमडीआर) रूपांतर करा, असा ठराव जानेवारी २०१९ च्या डीपीसीत झाला. पण, त्याचा लाभ काहींनीच घेतलाय.

चांगल्या रस्त्यांअभावी ग्रामस्थांचे हाल  जिल्ह्यातील बहुतांश गावपाड्यांना अजूनही रस्त्यांचा अभाव असल्यामुळे आदिवासी बांधवांना आजही महिला, भगिनींना झोळी करून रुग्णालयात औषधोपचार व प्रसूतीसाठी शहरात आणावे लागत असल्याचे वास्तव ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :thaneठाणेroad safetyरस्ते सुरक्षा