शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

२७ गावांत २ हजार बेकायदा बांधकामे

By admin | Updated: April 25, 2017 00:08 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमध्ये एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आताच दोन हजार बेकायदा बांधकामे आहेत.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमध्ये एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आताच दोन हजार बेकायदा बांधकामे आहेत. त्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन हे बघ्याची भूमिका घेतात. या बांधकामांवर तातडीने कारवाई करावी, यासाठी रवींद्रन यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, त्यास न्याय न मिळाल्याने ‘रवींद्रन भगावो, तुकाराम मुंढे आओ’ अशी भूमिका आमदार गणपत गायकवाड यांनी घेली आहे. २७ गावांमधील दोन हजार बांधकामांवर कारवाई व्हावी, यासाठी थेट मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार असल्याचे गायकवाड म्हणाले. मंत्रालयात मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात त्यांना पत्र देणार असल्याचे ते म्हणाले. बेकायदा बांधकामे हटवण्यावर ठामपणे भूमिका घेणारे डॅशिंग प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांचीच रवींद्रन यांच्या जागी नियुक्ती करावी, असे साकडे घालणार असल्याचे गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आयुक्त रवींद्रन हे गोडगोड बोलतात, पण ठोस कार्यवाही करण्याबाबत त्यांचे धोरण मुळमुळीत आहे. लोकशाही धाब्यावर बसवली जात असेल, तर त्या धोरणाचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी केला. आशेळे, द्वारली गावांतील बेकायदा बांधकामे वेळोवेळी आयुक्त तसेच प्रभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे गायकवाड म्हणाले. यापैकी एका ठिकाणी १२ माळ्यांचे टॉवर कोणाच्या कृपाशीर्वादाने उभे राहते, असा सवाल केला. प्रभाग अधिकाऱ्यांचा यामध्ये पुढाकार जास्त असतो. त्यांच्या संगनमताशिवाय कुठेही बेकायदा बांधकामे उभीच राहू शकत नाही, असे ते म्हणाले. आरक्षित जागेवरील अतिक्रमण पाडले, असे उदाहरण निदान या शहरांत नाही. त्यामुळे मुंढे यांच्यासारखे अधिकारीच येथे हवेत, असा पुनरुच्चार आमदार गायकवाड यांनी केला. (प्रतिनिधी)