शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

२७ गावांत २ हजार बेकायदा बांधकामे

By admin | Updated: April 25, 2017 00:08 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमध्ये एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आताच दोन हजार बेकायदा बांधकामे आहेत.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमध्ये एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आताच दोन हजार बेकायदा बांधकामे आहेत. त्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन हे बघ्याची भूमिका घेतात. या बांधकामांवर तातडीने कारवाई करावी, यासाठी रवींद्रन यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, त्यास न्याय न मिळाल्याने ‘रवींद्रन भगावो, तुकाराम मुंढे आओ’ अशी भूमिका आमदार गणपत गायकवाड यांनी घेली आहे. २७ गावांमधील दोन हजार बांधकामांवर कारवाई व्हावी, यासाठी थेट मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार असल्याचे गायकवाड म्हणाले. मंत्रालयात मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात त्यांना पत्र देणार असल्याचे ते म्हणाले. बेकायदा बांधकामे हटवण्यावर ठामपणे भूमिका घेणारे डॅशिंग प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांचीच रवींद्रन यांच्या जागी नियुक्ती करावी, असे साकडे घालणार असल्याचे गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आयुक्त रवींद्रन हे गोडगोड बोलतात, पण ठोस कार्यवाही करण्याबाबत त्यांचे धोरण मुळमुळीत आहे. लोकशाही धाब्यावर बसवली जात असेल, तर त्या धोरणाचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी केला. आशेळे, द्वारली गावांतील बेकायदा बांधकामे वेळोवेळी आयुक्त तसेच प्रभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे गायकवाड म्हणाले. यापैकी एका ठिकाणी १२ माळ्यांचे टॉवर कोणाच्या कृपाशीर्वादाने उभे राहते, असा सवाल केला. प्रभाग अधिकाऱ्यांचा यामध्ये पुढाकार जास्त असतो. त्यांच्या संगनमताशिवाय कुठेही बेकायदा बांधकामे उभीच राहू शकत नाही, असे ते म्हणाले. आरक्षित जागेवरील अतिक्रमण पाडले, असे उदाहरण निदान या शहरांत नाही. त्यामुळे मुंढे यांच्यासारखे अधिकारीच येथे हवेत, असा पुनरुच्चार आमदार गायकवाड यांनी केला. (प्रतिनिधी)