शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

उल्हासनगरात फेरीवाला धोरणाने महापालिका तिजोरीत २ कोटीचा भरणा, ७ कोटीचे टार्गेट

By सदानंद नाईक | Updated: January 30, 2023 17:14 IST

महापालिकेकडे १० हजार फेरीवाल्याची नोंदणी मात्र प्रत्यक्षात वसुली २ हजार पेक्षाही कमी फेरीवाल्याची

सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिकेच्या सर्वेक्षणनुसार शहरात १० हजार फेरीवाल्याची नोंदणी असतांना, प्रत्यक्षात २ हजार पेक्षाही कमी फेरीवाल्याकडून वसुली होत असल्याचे उघड झाले. फेरीवाला धोरणानुसार गेल्या वर्षी २ कोटी उत्पन्नाची भर महापालिका तिजोरीत पडली असून पुढील वर्षी ७ कोटीच्या उत्पन्नाचे टार्गेट विभागाने ठेवले आहे.

उल्हासनगरातील विकास कामाला गती देण्यासाठी तत्कालीन आयुक्त राजा दयानिधी व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी शासन एलबीटी अनुदान, मालमत्ता व पाणी कर उत्पन्न या दोन महत्त्वाच्या उत्पन्नाच्या स्रोता व्यतिरिक्त इतर पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले. फेरीवाच्याकडून स्वच्छता कर घेण्यासाठी फेरीवाला धोरण अंमलात आणले. तसेच दुकान परवाने, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, महापालिका जाग्यावर मोबाईल टॉवर्स उभारणे, मालमत्ता भाडयाने देणे आदी पर्यायी उत्पन्न स्रोत पुढे आले. गेल्या वर्षी महापालिकेने प्रभाग समिती निहाय स्वच्छता कर फेरीवाल्याकडून दररोज २० व ४० रुपये आकारण्यास सुरवात केली. गेल्या एका वर्षात महापालिका तिजोरीत त्यामुळे २ कोटी उत्पन्नाची भर पडली. 

महापालिकेला कोट्यवधीचे उत्पन्न फेरीवाला धोरणातून मिळू लागल्यावर, फेरीवाला धोरण यशस्वीपणे राबविण्यासाठी महापालिकेने फेरीवाला धोरणानुसार वसुलीचा ठेका खाजगी ठेकेदाराला देण्यात आला. वर्षाला ७ कोटीच्या उत्पन्नाचे टार्गेट महापालिकेने ठेवले. दरम्यान महापालिका सर्वेक्षणात १० हजार फेतीवाल्याची नोंद आहे. तर ८ हजारा पेक्षा जास्त ऑनलाइन फेरीवाल्याची नोंद आहे. टोपरी घेऊन बसणाऱ्याकडून दिवसाला २० रुपये तर हातगाडी फेरीवाल्याकडून दिवसाला ४० रुपये स्वच्छता कर आकारले जाते. 

दरम्यान खाजगी ठेकेदार एकून २ हजार पेक्षाही कमी फेरीवाल्याकडून स्वच्छता कर आकारात आहे. वसुलीच्या एकून रक्कमे पैकी ८१ टक्के रक्कम महापालिकेला तर १९ टक्के रक्कम ठेकेदाराला मिळणार आहे. फेरीवाला धोरणानुसार वसुली फेरीवाल्याची संख्या वाढल्यास महापालिका तिजोरीत कोट्यावधीच्या रक्कमेत भर पडणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर