शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

नांदिवलीत २ कोटींचे रस्ते, नाल्याची काम होणार तरी कधी? - रवी म्हात्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 20:26 IST

नांदिवली येथील श्री स्वामी समर्थ नगरमध्ये पुराच्या पाण्यामुळे बोट घेऊन दोन रुग्णांसह अन्य रहिवाश्यांना मदत करावी लागली.

डोंबिवली: नांदिवली येथील श्री स्वामी समर्थ नगरमध्ये पुराच्या पाण्यामुळे बोट घेऊन दोन रुग्णांसह अन्य रहिवाश्यांना मदत करावी लागली. अनेकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी गेले. आयुष्यभराची पुंजी जमवून सर्वसामान्य नागरिक घर घेतात, आणि अशा पद्धतीने महापालिका प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे नागरिकांचे नुकसान होते, ते योग्य नाही. नांदिवली भागात जेथे पाणी साचते त्या भागात चांगला रस्ता होण्यासाठी,आणखी एक नाला अशा विकासकामांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात २ कोटींची विकास कामे या प्रभागासाठी जाहिर झाली आहेत, पण कामांचा मात्र पत्त नाही. नागरिकांचे नुकसान झाल्यानंतरच विकास काम करायची का? महापालिका प्रशासनाची ही कामाची पद्धत कुठली? अशी टिका करत नांदिवलीचे माजी सरपंच रवी म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली.रविवारी त्यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासमवेत श्री स्वामी समर्थ मठासमोरील गळया एवढ्या पाण्यामधून मदत कार्य देण्यास अडचणी येत असल्याचे अनुभवले. अखेरीस त्यांनी बोट मागवून नागरिकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. सकाळी ७ वाजल्यापासून पाणी कमी होत नसल्याने अखेरीस ११ नंतर बोटीने त्यांनी ज्या नागरिकांना बाहेर यायचे होते त्यांना बाहेर काढले. तसेच रुग्णांनाही बाहेर काढले.नगरसेविका, ई प्रभाग समिती सभापती रुपाली रवी म्हात्रे यांच्या प्रभागात रस्ते, नाले आदी विकासकामांसाठी २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचा आराखडा देखिल तयार करण्यात आला असून कामाला सुरुवात का केली नाही? मार्च महिन्यापासून या ठिकाणी कामे व्हावीत यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. प्रत्यक्षात अधिका-यांना भेट, पाहणी करण्यात आली. परंतू तरीही कामे मात्र पुढे सरकली नाहीत त्यामुळेच यंदाही पूरस्थितीतून नागरिकांना जावे लागत असल्याचे म्हात्रे म्हणाले.गतवर्षी आणि यंदाही आयुक्त गोविंद बोडके यांनी येथील पाणी बघून गंभीर स्थिती असल्याचे सांगत पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने त्यांनीच तातडीने जेसीबी बोलावून दोन इमारतींच्या भिंती पाडण्याचे आदेश दिल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली होती. जेथे पाणी साचले होते तो भाग सखल असून २००५ च्या पूरामध्येही इथला भाग पाण्याखालीच होता. त्यावेळी स्वामींच्या मठातील सभामंडपाला पाणी लागले होते,ध्यानमंदिर पूर्ण पाण्याखाली होते. तेव्हापासून या ठिकाणच्या रस्त्याची विशेष काम झालेली नव्हती. आता महापालिकेत आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला, पण पुन्हा स्थिती जैसे थेच असल्याने त्यांच्या घरांचे, सामानाचे, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. जे झाले ते झाले पण आता तरी महापालिकेने या प्रभागातील रस्ते, नाले यांसह मुलभूत काम तातडीने करावीत आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी म्हात्रे यांनी केली. पुढील वर्षी तरी अशी गंभीर स्थिती नसावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुक्त सकारात्मक असले तरी अधिकारी मात्र कामात दिरंगाई, दुर्लक्षपणा करत असल्यामुळेच प्रभागातील विकास काम संथगतीने सुरु असल्याची टिका म्हात्रेंनी केली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक