शहरं
Join us  
Trending Stories
1
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
3
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
4
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
5
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
6
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
7
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
8
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
9
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
10
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
11
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
12
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
13
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
14
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
15
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
16
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
17
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
18
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
19
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
20
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

‘स्वच्छ भारत’साठी १९ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:56 IST

केडीएमसी उर्वरित निधीच्या प्रतीक्षेत : कचरागाड्या खरेदी, उंबर्डे प्रकल्पावर रक्कम खर्च

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस स्वच्छ भारत अभियानासाठी ११४ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी २० टक्के निधी केंद्र तर १३ टक्के निधी राज्य सरकारकडून मिळणार होता. मात्र, या ३३ टक्क्यांपैकी केवळ ५० टक्केच म्हणजे १९ कोटींचा निधी महापालिकेस मिळाला आहे. दुसरीकडे या अभियानासाठी महापालिकेस स्वत:च्या हिश्श्यातून ६७ टक्के निधी उभा करायचा आहे. त्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.

केडीएमसीने मिळालेल्या १९ कोटी रुपयांच्या निधीतून कचरा वाहतुकीसाठी नवीन वाहने खरेदी केली आहेत. तसेच उंबर्डे येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी भरावभूमी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पाच्या सिव्हील वर्क अंतिम टप्प्यात आहे. त्यावर १९ कोटींपैकी काही निधी खर्च करण्यात आला आहे. महापालिकेने १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्पही प्रस्तावित केले होते. त्यापैकी पाच प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. पाचपैकी दोन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. मात्र, त्यांना पुरेसा जैविक कचरा मिळत नसल्याची ओरड आहे. तर, अन्य दोन प्रकल्प बांधून तयार असले तरी ते कार्यान्वित झालेले नाहीत. याशिवाय महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्र कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येकी एक कचरा वर्गीकरण शेड उभारली जाणार आहे. त्यापैकी मनसे नगरसेवक मंदार हळबे यांच्या प्रभागात ऊर्जा फाउंडेशनद्वारे केवळ प्लास्टिक कचºयाची शेड उभारली गेली आहे. शिवसेना नगरसेवक राजेश मोरे यांच्या दत्तनगर प्रभागात एक शेड उभारली आहे. या दोन्ही शेड डोंबिवली पूर्वेत आहेत. कल्याण पश्चिमेतील शिवसेना नगरसेविका रजनी मिरकुटे यांच्या प्रभागात एक शेड उभारली आहे. या तिन्ही कचरा वर्गीकरण शेड कार्यान्वित आहेत. मात्र, कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या प्रभागातील लोकग्राम येथील व डोंबिवली पश्चिमेतील नगरसेवक जर्नादन म्हात्रे यांच्या प्रभागातील कचरा वर्गीकरणाची शेड कार्यान्वित झालेली नाही. त्यांचे काम बाकी आहे. उंबर्डे प्रकल्पाचे सिव्हील वर्क अंतिम टप्प्यात आले असताना कंत्राटदाराचे ८० लाखांचे बिल थकले आहे. हे बिल अद्याप दिलेले नसताना कंत्राटदारने आणखी ८७ लाखांचे बिल घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सादर केले आहे. स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी महापालिकेने ६७ टक्के निधी उभा करायचा होता. महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चाअंतर्गत त्यासाठी ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, महापालिकेकडून ही तरतूद कितीपत खर्च केली जाते, याविषयी प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळेच उंबर्डे प्रकल्पाचे बिल महापालिकेच्या तिजोरीतून अदा केलेले नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.५० टक्के निधी देण्याची मागणीस्वच्छ भारत अभियानासाठी सरकारकडून केवळ १९ कोटी रुपये मिळाले आहेत. उर्वरित निधीचा अद्याप पत्ता नाही. मात्र, एकूण ११४ कोटी रुपयांच्या मंजूर रक्कमेपैकी राज्य व केंद्र सरकारकडून महापालिकेस ३३ टक्क्यांऐवजी ५० टक्क रक्कम दिली जावी, अशी मागणी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी केली होती. मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनीही हीच मागणी उचलून धरली होती. त्यावर राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडून अद्याप कोणतेच उत्तर मिळालेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान