शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

१८ हजारांवर झोपडीधारकांना घरे; रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:12 IST

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत योजना राबवण्यासाठी ठाणेकरांना मुंबईत खेपा मारण्याची गरज भासणार नाही. ठाण्यातच एसआरएचे कार्यालय सुरू झाल्यानंतर या विभागाकडे ९७ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यात एलओआय दिलेले प्रस्ताव ६९ आहेत.

- अजित मांडकेठाणे : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत योजना राबवण्यासाठी ठाणेकरांना मुंबईत खेपा मारण्याची गरज भासणार नाही. ठाण्यातच एसआरएचे कार्यालय सुरू झाल्यानंतर या विभागाकडे ९७ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यात एलओआय दिलेले प्रस्ताव ६९ आहेत. या मंजूर प्रस्तावातील झोपडीधारकांची संख्या २३ हजार ५११ एवढी आहे. असे असले तरी विकासकच पुढे येत नसल्याने ही योजना म्हणावी तशी मार्गी लागलेली नाही. आता खास ठाण्यातील एसआरएसाठी स्वतंत्र सीईओ देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री रवींद्र वायकर यांनी केल्याने खऱ्या अर्थाने या योजनांना गती मिळून प्रतीक्षेतील १८ हजारांहून अधिक झोपडीधारकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल, आशा निर्माण झाली आहे.घोडबंदर येथील ठाणे पालिकेच्या भाजी मंडईच्या दुसºया मजल्यावर एसआरएचे कार्यालय सुरू आहे. पूर्वी एसआरए मंजुरीसाठी मुंबईला जावे लागत होते. त्यात सहा ते सात महिन्यांचा कालावधी जात होता. परंतु, ठाण्यात कार्यालय आल्याने आता संपूर्ण अटींची पूर्तता केली असेल, तर एक ते दोन महिन्यांत या फाइलला मंजुरी मिळू शकेल, असा विश्वास एसआरएच्या अधिकाºयांनी व्यक्त केला होता. पूर्वी ठाण्यात एसआरडीअंतर्गत कामे केली जात होती. याअंतर्गत आतापर्यंत पाच योजना मार्गी लागल्या असून त्यामध्ये या पाचही योजनांना ओसीदेखील मिळाली आहे. त्यानुसार, ५२३ झोपडीधारकांना या योजनेतून हक्काचे घर मिळाले आहे. तर, चार योजनांची कामे आजही सुरू असून यामध्ये २२५ चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. तर, एसआरडी बंद झाल्यानंतर एसआरएअंतर्गत काही योजना बदलण्यात आल्या असून त्यामध्ये २६ प्रकल्पांची कामे सुरू असून यामध्ये सात हजार ७१५ झोपडीधारकांना हक्काचे घर मिळेल.यामुळे रखडल्या योजनामागील कित्येक वर्षांपासून आठ योजनांमध्ये अद्यापही कोणत्याही प्रकारची प्रगती झाली नसल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये चार हजार ५३४ झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार आहे. परंतु, हे झोपडीधारक आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत.यासंदर्भात एसआरएच्या अधिकाºयांना छेडले असता, त्यांनी सांगितले की, यामागे सोसायटीमध्ये एकी नसणे हे प्रमुख कारण आहे. तसेच वाटाघाटी योग्य प्रकारे न होणे योजना मंजुरीच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणे आदींसह इतर काही छोट्यामोठ्या गोष्टींवरून ही प्रकरणे रखडली असल्याचे त्यांनी सांगितले.याच कारणामुळे आता झोपडपट्टी भागात नव्या योजनांसाठी विकासक पुढे येताना दिसत नसल्याचे एसआरएच्या अधिकाºयांनी सांगितले. एखाद्या झोपडपट्टी भागातील योजना हाती घेतली, तर यामध्ये न्यायालय आणि आपसातील संगनमत या मुद्यावरून ही योजना रखडते.

टॅग्स :thaneठाणे