शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

कळव्यात १८ रुग्णांचा मृत्यू, दोषींवर कारवाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 07:25 IST

१२ ऑगस्टला रात्री रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील शिवाजी महाराज रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा गोपनीय अहवाल शासनास प्राप्त झाला असून, हा अहवाल पटलावर ठेवण्यात येईल. यामध्ये जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात सदस्य अनिल परब यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील चर्चेदरम्यान सामंत बोलत होते. 

१२ ऑगस्टला रात्री रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यातील शिफारशींनुसार कारवाई करण्यात येईल,  असे सामंत यांनी स्पष्ट केले.

 दरम्यान, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सात व छत्रपती संभाजीनगर येथे १० रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू उपचाराअभावी झाला नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने कळविले आहे. 

‘रिक्त पदे तातडीने भरा’    राज्यातील महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेशी निगडित अत्यावश्यक पदे तातडीने भरण्याबाबत तसेच औषध पुरवठा नियमितरीत्या उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.  रुग्णालयासाठी अधिकारी व कर्मचाऱी यांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत  पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे रुग्णसेवेमध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल