शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

रेशनकार्डअभावी १७ हजार ६९८ आदिवासी कुटुंबांची उपासमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 02:34 IST

श्रमजीवींचे आज तहसीलवर आंदोलन

ठाणे : श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असता न्यायालयाने तातडीने रेशनकार्ड देण्याचे निर्देश शासनाला दिले. मात्र, केवळ एक हजार १४८ रेशनकार्ड देऊन आदिवासींच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केल्याचा आरोप करून श्रमजीवी संघटना २६ मेपासून ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांसमोर रेशनकार्ड हक्कासाठी बेमुदत आंदोलन करणार आहे.

या चारही जिल्ह्यांत रेशनकार्डची तब्बल १८ हजार ८४८ पैकी तब्बल १७ हजार ६९८ प्रकरणे प्रलंबित आहेत. रेशनकार्डधारकांना रेशन मिळाले. मात्र, ज्या गरिबांकडे नाही त्यांना ते द्यावे, यासाठी सरकारशी पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे श्रमजीवीने न्यायालयीन आदेश प्राप्त केले. मात्र, त्यास न जुमानता अत्यल्प रेशनकार्ड दिल्यामुळे श्रमजीवींच्या कार्यकर्त्यांनी कार्ड व रेशन हक्क मिळेपर्यंत चार जिल्ह्यांतील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन छेडल्याचे संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी सांगितले.

ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यात या संघटनेने दाखल केलेल्या १८ हजार ८४८ पैकी तब्बल १७ हजार ६९८ प्रकरणे प्रलंबित आहेत. गरिबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देणार असल्याचे शासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या हमीपत्रात स्पष्ट केले आहे. मात्र, यानुसार कोणतीही कार्यवाही न झाल्याने न्यायालयाच्या सन्मानाचाही भंग झाल्याचे ते म्हणाले.

नाशिक मध्ये सात हजार २७२ कार्ड अद्याप नाहीत

च्ठाणे जिल्ह्यात रेशनकार्डसाठी चार हजार १०९ प्रकरणांपैकी केवळ ४२९ रेशनकार्ड मिळाले. तब्बल तीन हजार ६८० रेशनकार्ड देणे बाकी आहे. पालघर जिल्ह्यात सहा हजार ७७३ अर्जांपैकी केवळ ३४४ कार्ड मिळाली असून तब्बल सहा हजार ४२९ प्रकरणे प्रलंबित आहेत.

च्रायगड जिल्ह्यात दाखल ३५५ पैकी ३३८ कार्ड मिळाली आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्यात दाखल केलेल्या सात हजार ६०९ अर्जांपैकी केवळ ३३७ रेशनकार्ड मिळाली असून तब्बल सात हजार २७२ कार्ड अद्याप मिळाली नाहीत. या १७ हजार ६९८ गरीब कुटुंबांच्या भुकेची जबाबदारी कोणाची, असा सवाल श्रमजीवीने आंदोलनाद्वारे विचारला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे