शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

रेशनकार्डअभावी १७ हजार ६९८ आदिवासी कुटुंबांची उपासमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 02:34 IST

श्रमजीवींचे आज तहसीलवर आंदोलन

ठाणे : श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असता न्यायालयाने तातडीने रेशनकार्ड देण्याचे निर्देश शासनाला दिले. मात्र, केवळ एक हजार १४८ रेशनकार्ड देऊन आदिवासींच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केल्याचा आरोप करून श्रमजीवी संघटना २६ मेपासून ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांसमोर रेशनकार्ड हक्कासाठी बेमुदत आंदोलन करणार आहे.

या चारही जिल्ह्यांत रेशनकार्डची तब्बल १८ हजार ८४८ पैकी तब्बल १७ हजार ६९८ प्रकरणे प्रलंबित आहेत. रेशनकार्डधारकांना रेशन मिळाले. मात्र, ज्या गरिबांकडे नाही त्यांना ते द्यावे, यासाठी सरकारशी पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे श्रमजीवीने न्यायालयीन आदेश प्राप्त केले. मात्र, त्यास न जुमानता अत्यल्प रेशनकार्ड दिल्यामुळे श्रमजीवींच्या कार्यकर्त्यांनी कार्ड व रेशन हक्क मिळेपर्यंत चार जिल्ह्यांतील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन छेडल्याचे संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी सांगितले.

ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यात या संघटनेने दाखल केलेल्या १८ हजार ८४८ पैकी तब्बल १७ हजार ६९८ प्रकरणे प्रलंबित आहेत. गरिबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देणार असल्याचे शासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या हमीपत्रात स्पष्ट केले आहे. मात्र, यानुसार कोणतीही कार्यवाही न झाल्याने न्यायालयाच्या सन्मानाचाही भंग झाल्याचे ते म्हणाले.

नाशिक मध्ये सात हजार २७२ कार्ड अद्याप नाहीत

च्ठाणे जिल्ह्यात रेशनकार्डसाठी चार हजार १०९ प्रकरणांपैकी केवळ ४२९ रेशनकार्ड मिळाले. तब्बल तीन हजार ६८० रेशनकार्ड देणे बाकी आहे. पालघर जिल्ह्यात सहा हजार ७७३ अर्जांपैकी केवळ ३४४ कार्ड मिळाली असून तब्बल सहा हजार ४२९ प्रकरणे प्रलंबित आहेत.

च्रायगड जिल्ह्यात दाखल ३५५ पैकी ३३८ कार्ड मिळाली आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्यात दाखल केलेल्या सात हजार ६०९ अर्जांपैकी केवळ ३३७ रेशनकार्ड मिळाली असून तब्बल सात हजार २७२ कार्ड अद्याप मिळाली नाहीत. या १७ हजार ६९८ गरीब कुटुंबांच्या भुकेची जबाबदारी कोणाची, असा सवाल श्रमजीवीने आंदोलनाद्वारे विचारला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे