शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विरोध डावलून १६० कोटींचा आपला दवाखाना प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:58 IST

ज्यांना हवे त्यांच्याच प्रभागात आरोग्य केंद्र; आयुक्तांचे स्पष्टीकरण

ठाणे : किसननगर आणि कळवा येथे सुरू केलेली आपला दवाखाना ही संकल्पना पूर्णत: फोल ठरली असल्याचा आरोप करून एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ठाण्यात २६ आरोग्य केंद्रांची गरज असताना अतिरिक्त ५० केंदे्र सुरू करून सुमारे १६० कोटी रु पयांची उधळपट्टी करण्याचे कारण काय, असा सवाल करत शुक्रवारच्या महासभेत विरोधकांनी आपला दवाखाना या संकल्पनेच्या खर्चावर आक्षेप घेतला. अखेर, आयुक्तांनी ज्या नगरसेवकाला आपला दवाखाना नको असेल, त्यांच्या प्रभागात ही योजना राबवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही विरोधकांनी या योजनेला विरोध कायम ठेवला. अखेर, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा विरोध नोंदवून गोंधळात हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.शहराच्या विविध भागांत एकूण ५० आपला दवाखाना (ई-हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे. महानगरपालिकेने मेडिकल आॅन गो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये ‘आपला दवाखाना’ (ई-हेल्थ स्मार्ट क्लिनिक) ही संकल्पना राबवण्याचे प्रस्तावित केले आहे. आरोग्य केंद्र सुरू करताना दर ५० हजार नागरिकांमागे ते एक असावे, असा नियम आहे. ठाणे शहराची लोकसंख्या सध्या २६ लाखांच्या घरात आहे. त्यापैकी ५० टक्के लोक हे चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास आहेत. या आरोग्य केंद्रांचा वापर करणाऱ्यांची लोकसंख्या पाहता ठाणे शहरात २६ आरोग्य केंद्रांची गरज आहे. आजमितीला ठाण्यात २८ आरोग्य केंद्रे आहेत. त्यामुळे अतिरिक्त ५० केंदे्र सुरू करून ठाणेकरांच्या १६० कोटी रु पयांची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालय आणि शासनाच्या सिव्हील रु ग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत, त्याच सुविधांसाठी ‘आपला दवाखाना’मध्ये १० रु पये दर आकारला जाणार आहे. शिवाय, ही संकल्पना सर्वात आधी किसननगर आणि कळवा येथे राबवण्यात आली होती. मात्र, ती फोल ठरलेली आहे. त्यातही प्रस्ताव मंजूर होण्याआधीच निविदा काढल्याचा आरोपही त्यांनी केला.बाळासाहेब ठाकरेआरोग्यदायी योजना नाव द्यायापूर्वी ज्या दोन ठिकाणी हे प्रयोग राबवण्यात आले होते, ते यशस्वी झाल्याचे स्पष्टीकरण आरोग्य अधिकारी आर.टी. केंद्रे यांनी दिले. मागील तीन महिन्यांत या आरोग्य केंद्रांमधून आठ हजार रुग्णांवर उपचार झाल्याचेही त्यांनी सांगितले.दुसरीकडे राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या संकल्पनेला आमचा विरोध नसून त्यावर केल्या जाणाºया खर्चावर आक्षेप असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या मुद्याला हात घालून ही योजना यशस्वी असून चांगली असल्याचे सांगितले.त्यामुळे या योजनेचे यापुढे बाळासाहेब ठाकरे आरोग्यदायी योजना असे नामकरण करण्यात यावे आणि या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. त्यानंतर, विरोधकांचा विरोध वाढतच असल्याचे दिसून आले.जेवढ्या रुग्णांवर उपचार, तेवढेच बिलआयुक्त संजीव जयस्वाल यांनी याबाबत माहिती देताना केवळ आपल्या देशातच नाही, तर प्रगत देशातही आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. डॉक्टरांची संख्याही प्रत्येक ठिकाणी कमी आहे. ठाण्यात तर कळवा हॉस्पिटलच्या माध्यमातून रोजच्या रोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात. ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.ही योजना गरिबांसाठी असून त्याचा खरा उपयोग त्यांनाच होणार आहे. तसेच ज्या संस्था हे उपक्रम चालवणार असतील, त्यांच्याकडे जेवढे रुग्ण उपचार घेणार आहेत, तेवढेच बील त्यांना अदा केले जाणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा पुन्हा विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.खर्चाच्या मुद्यावर जो काही आक्षेप घेण्यात आला आहे, त्यावर जर एखादी दुसरी संस्था यापेक्षा कमी खर्चात ही संकल्पना राबवण्यास तयार असेल, त्यालासुद्धा हे काम देता येऊ शकते. तशी संस्था लोकप्रतिनिधींनी सुचवल्यास त्याचेही स्वागत केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका