शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मीरा भाईंदरमध्ये मासेमारी करण्यास गेलेला 16 वर्षाचा मुलगा बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 14:29 IST

भाईंदर पश्चिमेस असलेल्या चौक समुद्र किनारी भावांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेला 16 वर्षाचा मुलगा समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे.

मीरारोड -  भाईंदर पश्चिमेस असलेल्या चौक समुद्र किनारी भावांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेला 16 वर्षाचा मुलगा समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस मात्र भरती असल्याने बुडालेल्या मुलाचा शोध घेणे अवघड झाले आहे . सध्या मासेमारी बंद असली तरी किनाऱ्याला पाण्याच्या प्रवाहात येणारे मासे मिळत असल्याने दोन काठ्यांना जाळे लावून मच्छीमार हे मासेमारी करत असतात. घरच्या पुरते मासे यातून मिळत असतात. तर काहीजण लहान बोट घेऊन जवळपास मासेमारी करतात. भाईंदरच्या उत्तनजवळील चौक बंदरात राहणारा ऑज्वल अजय माल्या (१६) हा आपल्या लहान भाऊ एमोस ( १४ ) व एलिस्टन  (१२) यांच्यासोबत सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी चौक समुद्र किनारी गेला होता. दोन काठ्यांना जाळे लावून मासेमारी करत होते. 8.45 वाजण्याच्या सुमारास मासे पकडून झाल्यावर ऑज्वल व एलिस्टन पाण्यातून बाहेर येत होते. गुडघाभर पाणी असताना अचानक ऑज्वल पाण्यात पडला व दिसेनासा झाला. 

त्याचा किनाऱ्यावर शोध घेण्यात आला. पालिकेचे अग्निशमन दलाचे जवानदेखील आले. पण त्यांच्याकडे बोट नसल्याने त्यांनी किनाऱ्यावर व परिसरात शोध घेतला असता तो सापडला नाही. मोटर बोटीच्या सहाय्याने काही काळ शोध घेतला. परंतु मोठी भरती असल्याने पाण्याचा प्रवाह वेगात होता. जेणे करून शोधकार्य थांबवण्यात आले. समुद्र किनाऱ्याच्या आजूबाजूच्या कोळीवाड्यांना देखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सायंकाळी भरती कमी झाली की पुन्हा शोध कार्य सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले.  ऑज्वल हा मच्छीमार कुटुंबातीलच असल्याने त्याला पोहता येत होते . नुकताच अकरावी उत्तीर्ण झाला होता.