शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

१६ हजार जि.प. कर्मचाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार

By admin | Updated: April 18, 2016 00:21 IST

सुमारे दीड वर्षापूर्वी उदयाला आलेल्या पालघर जिल्हा परिषदेसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता पडू नये, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ११ हजार १५१ शिक्षकांसह १६ हजार कर्मचाऱ्यांपैकी

- सुरेश लोखंडे,  ठाणे

सुमारे दीड वर्षापूर्वी उदयाला आलेल्या पालघर जिल्हा परिषदेसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता पडू नये, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ११ हजार १५१ शिक्षकांसह १६ हजार कर्मचाऱ्यांपैकी अनेकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार समायोजनेखाली पालघरमध्ये बदल्या होणार आहेत. बिंदू नामावलीनुसार होणाऱ्या या बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ठाणे- पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांमधील कर्मचारी संख्या समान ठेवण्यासाठी राज्य शासनाने या दोन्ही जिल्ह्यांसाठी एक स्वतंत्र शासन निर्णय जारी केला आहे. विभाजन होऊनही आदिवासी, दुर्गम भागातील बदल्यांचे संकट मात्र पाठ सोडत नसल्यामुळे शिक्षकांसह अन्य सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे. यासाठी १ जानेवारी २०१५ ची अंतिम ज्येष्ठतासूची या समायोजन बदल्यांसाठी प्रमाणभूत मानली आहे. प्राप्त माहितीनुसार पालघर जिल्ह्यातून सुमारे एक हजार ४११ शिक्षक ठाणे जिल्ह्यात येण्यास पात्र ठरत असल्याचे बोलले जात आहे. तर, ठाणे जिल्ह्यातून केवळ सात शिक्षक पालघरमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. परंतु, या सक्तीच्या बदल्यांना पात्र ठरणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची माहिती ठाणे जिल्हा परिषदेने गुप्त ठेवली आहे. मात्र, एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या दरम्यान या बदल्या निश्चित केल्या जाणार आहेत. त्यासाठी याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.या बदल्यांसाठी बिंदू नामावलीचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. त्यात सेवाज्येष्ठता यादी बदल्यांसाठी पात्र धरली जाणार आहे. यानुसार, होणाऱ्या बदल्यांमधून अपंग कर्मचारी, दुर्धर व गंभीर आजाराने पीडित कर्मचारी, ५३ वर्षे व त्यावरील वयाचे कर्मचारी आणि शासकीय सेवेतील पतीपत्नी एकत्रीकरण आणि विकल्प असलेल्यांना सवलत देण्याचे निश्चित केले आहे. उर्वरित बदली झालेल्या दोन्ही जिल्हा परिषदांमधील कर्मचारी, शिक्षक यांची प्रतीक्षा यादी तयार होऊन भविष्यात त्यांना पसंतीच्या ठिकाणी बदली करणे शक्य होणार आहे.रिक्त जागी दोन्ही जिल्हा परिषदांना भरती करता येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. पण, दोन्ही जिल्हा परिषदांचे कर्मचारी, शिक्षक संख्या समान ठेवण्यासाठी काढलेला शासन निर्णय हा अन्यायकारक असल्याची चर्चा ठाणे जिल्हा परिषदेत ऐकायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांसह शिक्षकांमध्ये बदल्यांचा विषय जोरदारपणे चर्चीला जात असून यादीत आपले नाव येणार नाही, यासाठीदेखील काहींचे प्रयत्न सुरू असल्याचे ऐकायला मिळत आहे.