शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

१६ हजार जि.प. कर्मचाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार

By admin | Updated: April 18, 2016 00:21 IST

सुमारे दीड वर्षापूर्वी उदयाला आलेल्या पालघर जिल्हा परिषदेसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता पडू नये, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ११ हजार १५१ शिक्षकांसह १६ हजार कर्मचाऱ्यांपैकी

- सुरेश लोखंडे,  ठाणे

सुमारे दीड वर्षापूर्वी उदयाला आलेल्या पालघर जिल्हा परिषदेसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता पडू नये, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ११ हजार १५१ शिक्षकांसह १६ हजार कर्मचाऱ्यांपैकी अनेकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार समायोजनेखाली पालघरमध्ये बदल्या होणार आहेत. बिंदू नामावलीनुसार होणाऱ्या या बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ठाणे- पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांमधील कर्मचारी संख्या समान ठेवण्यासाठी राज्य शासनाने या दोन्ही जिल्ह्यांसाठी एक स्वतंत्र शासन निर्णय जारी केला आहे. विभाजन होऊनही आदिवासी, दुर्गम भागातील बदल्यांचे संकट मात्र पाठ सोडत नसल्यामुळे शिक्षकांसह अन्य सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे. यासाठी १ जानेवारी २०१५ ची अंतिम ज्येष्ठतासूची या समायोजन बदल्यांसाठी प्रमाणभूत मानली आहे. प्राप्त माहितीनुसार पालघर जिल्ह्यातून सुमारे एक हजार ४११ शिक्षक ठाणे जिल्ह्यात येण्यास पात्र ठरत असल्याचे बोलले जात आहे. तर, ठाणे जिल्ह्यातून केवळ सात शिक्षक पालघरमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. परंतु, या सक्तीच्या बदल्यांना पात्र ठरणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची माहिती ठाणे जिल्हा परिषदेने गुप्त ठेवली आहे. मात्र, एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या दरम्यान या बदल्या निश्चित केल्या जाणार आहेत. त्यासाठी याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.या बदल्यांसाठी बिंदू नामावलीचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. त्यात सेवाज्येष्ठता यादी बदल्यांसाठी पात्र धरली जाणार आहे. यानुसार, होणाऱ्या बदल्यांमधून अपंग कर्मचारी, दुर्धर व गंभीर आजाराने पीडित कर्मचारी, ५३ वर्षे व त्यावरील वयाचे कर्मचारी आणि शासकीय सेवेतील पतीपत्नी एकत्रीकरण आणि विकल्प असलेल्यांना सवलत देण्याचे निश्चित केले आहे. उर्वरित बदली झालेल्या दोन्ही जिल्हा परिषदांमधील कर्मचारी, शिक्षक यांची प्रतीक्षा यादी तयार होऊन भविष्यात त्यांना पसंतीच्या ठिकाणी बदली करणे शक्य होणार आहे.रिक्त जागी दोन्ही जिल्हा परिषदांना भरती करता येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. पण, दोन्ही जिल्हा परिषदांचे कर्मचारी, शिक्षक संख्या समान ठेवण्यासाठी काढलेला शासन निर्णय हा अन्यायकारक असल्याची चर्चा ठाणे जिल्हा परिषदेत ऐकायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांसह शिक्षकांमध्ये बदल्यांचा विषय जोरदारपणे चर्चीला जात असून यादीत आपले नाव येणार नाही, यासाठीदेखील काहींचे प्रयत्न सुरू असल्याचे ऐकायला मिळत आहे.