शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

उल्हासनगरातील १६ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 2:58 AM

आयुक्तांकडून चौकशी : कमी वसुली भोवली

उल्हासनगर : एलबीटीची कमी वसुली झाल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी १६ निलंबित कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यात ते दोषी सापडल्याने आयुक्तांनी त्यांचे निलंबन कायम ठेवले. तसेच दोन वर्षांची सेवा गृहीत धरली जाणार नसून त्यांच्यावर कमी वसुलीचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सरकारने राज्यातील महापालिका जकातकर रद्द करून त्याऐवजी एलबीटी करप्रणाली सुरू केली. एलबीटी करप्रणालीद्वारे पालिकेने तब्बल १५ हजार व्यापाऱ्यांची नोंदणी केली. मात्र, बहुतांश व्यापाऱ्यांनी वार्षिक विवरणपत्र सादर न केल्याने, त्यांची करनिर्धारणा झाली नाही. त्यामुळे एलबीटीचे उत्पन्न जकातीपेक्षा कमी झाले. कमी वसुलीचा ठपका तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी ठेवून १६ कर्मचाºयांना निलंबित, तर ५० कर्मचाºयांना नोटीस दिल्या. याप्रकाराने एलबीटीतील सावळागोंधळ ऐरणीवर आला. कमी वसुलीमुळे दरमहा आठ ते नऊ कोटी तर वर्षाला १०० कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप मनसेने केला.

मनसेने महापालिका एलबीटी विभागातील भ्रष्टाचाराची तक्रार नगरविकासमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश तत्कालीन आयुक्तांना दिले. त्यानुसार, सेवानिवृत्त उपसचिव कैलास बोधडे यांच्यांतर्गत चौकशी सुरू होऊन चौकशीत १६ कर्मचारी अंशत: दोषी आढळले. दोषी कर्मचाºयांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर, आयुक्त अच्युत हांगे यांनी त्यांचे निलंबन कायम ठेवून त्या दोन वर्षांची सेवा गृहीत धरली जाणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. पालिका अधिकारी, व्यापारी व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतातून एलबीटी विभागात २०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला होता. गेल्याच महिन्यात महापालिका एलबीटी विभागाने पुन्हा वार्षिक विवरणपत्र सादर न करणाºया दुकानदारांना नोटिसा पाठवून एलबीटीअंतर्गत कर भरण्याचे आदेश दिले आहेत.२०० कोटींचे नुकसानएलबीटी करप्रणालीमुळे महापालिकेचे २०० कोटींचे नुकसान झाल्याचे उघड झाले. जकातीपासून दरमहा १६, तर एलबीटी करप्रणालीद्वारे सात ते आठ कोटींची वसुली झाली. म्हणजे दरमहा आठ तर दोन वर्षांत २०० कोटींचे नुकसान झाले आहे. महापालिका अधिकारी, नगरसेवक व व्यापारी यांच्या संगनमतानुसार एलबीटीकर कमी वसूल झाल्याचा आरोप झाला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे