शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

१५४८ बालके तीव्र कुपोषित; ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:32 IST

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांगीण सक्षम असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात आजही सुमारे एक हजार ५४८ बालके तीव्र कमी वजनाची आढळली आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांगीण सक्षम असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात आजही सुमारे एक हजार ५४८ बालके तीव्र कमी वजनाची आढळली आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड झाले आहे.कुपोषित बालकांमध्ये ७९ बालके तीव्र कुपोषित, तर ९७१ बालके मध्यम कुपोषित आहेत. याशिवाय १५९ बालके दुर्धर आजाराशी झगडत आहेत. याशिवाय एक हजार ५४८ बालके अति कमी वजनाची आढळून आली. त्यांच्यावर वेळीच दैनंदिन उपचारासह पोषण आहाराची मात्र न दिल्यास ते कुपोषणाच्या संख्येत वाढ करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. या तीव्र कमी वजनाच्या बालकांच्या तुलनेत सुमारे आठ हजार ६०१ बालके मध्यम वजनाची आढळली आहेत. याकडे गांभीर्याने विचार न केल्यास ठाणे जिल्ह्याचादेखील मेळघाट होण्यास विलंब लागणार नसल्याचे बोलले जात आहे.बालकांच्या तुलनेतील कुपोषणाची टक्केवारीकुपोषित बालकांना अतिरिक्त आहार देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने १५ लाखांच्या मूळ तरतूदीत वाढ करून घेतली. सुमारे २२ लाख ६० हजारांनी वाढीव तरतूद केलेली दिसून येत आहे.दरवर्षी लाखोंच्या तरतूद करूनही जिल्ह्यास लागलेला कुपोषणाचा कलंक मात्र पुसल्या जात नसल्याची बाब गंंभीर आहे. ग्रामीण, आदिवासी भागातील एक लाख १२ हजार ४०० बालकांच्या तुलनेत ०.१ टक्के बालके तीव्र कुपोषणाचे तर ०.९ टक्के बालके मध्यम कुपोणाचे असल्याचे सांगून जिल्हा यंत्रणा आपले कर्तव्य श्रेष्ठ असल्याचे पटवून देण्यात आघाडीवर दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणे