शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

खडकपाडा ठाण्यासाठी १५० रुपये

By admin | Updated: January 18, 2016 01:54 IST

कल्याणची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता बारावे (गोदरेज हिल) येथे खडकपाडा पोलीस ठाण्याची स्थापना केली आहे.

आकाश गायकवाड,  डोंबिवलीकल्याणची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता बारावे (गोदरेज हिल) येथे खडकपाडा पोलीस ठाण्याची स्थापना केली आहे. मात्र, नव्याने निर्माण केलेल्या या ठाण्यात पोहोचण्यासाठी मोहने-आंबिवली परिसरातील नागरिकांना मोठी कसरतकरावी लागते. रिक्षाने थेट जाण्यासाठी तीनवेळा रिक्षा बदलावी लागते. त्यासाठी मोहने-आंबिवलीवासीयांना सुमारे ५० ते १५० रु पये मोजावे लागत आहेत. त्यामुळे मोहने पोलीस चौकीतच गुन्हा दाखल करण्याची सुविधा सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.कल्याण पश्चिमेतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्वी पश्चिमेत रेल्वे स्टेशनजवळच महात्मा फुले चौक पोलीस ठाणे होते. वाढती लोकसंख्या, परिणामस्वरूप वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तेथील पोलीसबळ अपुरे ठरत होते. मात्र, या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास उंबर्डे-सापर्डे, गौरीपाडा, टावरीपाडा, गांधारे, आधारवाडी, बिर्ला कॉलेज परिसर, योगीधाम तसेच दुसऱ्या दिशेला ३-४ किमी अंतरावर असलेली आंबिवली पंचक्रोशी, तसेच उल्हासनगर रस्त्यावर असलेल्या वालधुनी या भागातून कोणत्याही वाहनाने येणाऱ्या नागरिकांना जास्त खर्चीक नसून सोयीचे ठरत होते. रिक्षाने पोहोचण्यासही जास्तीतजास्त १५ ते २० रु पये खर्च येत असे. मात्र, नव्याने निर्माण झालेल्या बारावे (गोदरेज हिल) येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्र ार करण्यासाठी मोहने-आंबिवलीवासीयांना मोठी कसरत करावी लागत आहे. खडकपाडा पोलीस ठाणे हे मोहने-आंबिवली परिसरवगळता कल्याण पश्चिमच्या अन्य भागांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. मात्र, आंबिवली परिसरातील नागरिकांना तेथे पोहोचणे त्रासदायक वा खूप खर्चीक आहे. या पंचक्र ोशीत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वडवली, अटाळी, आंबिवली, मोहने, एनआरसी कॉलनी, गाळेगाव ही पूर्वीची गावे आता शहरी रूप धारण करीत असल्याने लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे या भागात कोणताही गुन्हा, अपघात वा अन्य प्रकार घडल्यास तक्र ारदाराकडे स्वत:चे वाहन नसल्यास रिक्षाने पोलीस ठाणे गाठण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ठाणे पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी जातीने लक्ष देऊन तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रि या जागरूक नागरिक गोवर्धन शिंदे यांनी व्यक्त केली आहे.