शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

बीएसयूपी योजनेकरिता १५० कोटींचे कर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:16 IST

भाईंदर पालिका : कर्जासाठी एमएमआरडीएकडे पाठपुरावा सुरू

- राजू काळे

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या बीएसयूपी योजनेचे काम सरकारी अनुदानाचा मार्ग बंद झाल्याने ठप्प झाले होते. मात्र, त्याच्या पूर्णत्वासाठी पालिकेने राज्य सरकारकडे गतवर्षी पाठवलेल्या १५० कोटी रुपयांच्या कर्जाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने अलीकडेच मान्यता दिली आहे. पालिकेने हे कर्ज एमएमआरडीएमार्फत मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

पालिकेने २००९ पासून बीएसयूपी योजना काशिमीरा परिसरातील जनतानगर व काशी चर्च येथे राबवण्यास सुरुवात केली. आठ मजल्यांच्या सुमारे १३ इमारतींची ही योजना अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. या इमारतींपैकी एक आठ मजली इमारत जनतानगर येथे बांधून त्यात १७९ लाभार्थ्यांना घरे देण्यात आली आहेत. योजनेला अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतरही ती पूर्ण न केल्याने केंद्र व राज्य सरकारने या योजनेला अनुदान देण्यास नकार दिला. परिणामी, योजना रेंगाळली आहे. सुमारे २७९ कोटींची ही योजना २०१२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना वाढत्या महागाईच्या कचाट्यात अडकल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यातच, योजनेच्या कंत्राटदारांनी महसूल विभागात रॉयल्टी न भरल्याने महसूल विभागाने योजनेचे काम थांबवले. तसेच योजनेच्या रेखांकनासाठी नियुुक्त केलेल्या कंत्राटदाराने जागेचे सर्वेक्षण २०१५ पर्यंत केलेच नसल्याने प्रत्यक्षात कामाला सुरुवातच झाली नाही.

एकूण चार हजार १३६ सदनिकांच्या योजनेतील सुमारे एक हजार ६२० लाभार्थ्यांचे अद्याप स्थलांतर करण्यात आले. त्यातील काहींचे दहिसर चेकनाका येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहसंकुलात, तर काहींनी स्वखर्चाने खाजगी घरांत पर्यायी निवारा शोधला आहे. त्यांना पालिकेकडून दरमहा तीन हजार रुपये भाडे देण्याचे मान्य करण्यात आले. पालिकेची आर्थिक नाकेबंदी झाल्याने योजना रखडल्याने लाभार्थ्यांचे भाडे थकवण्यात आले. दरम्यान, योजना पूर्ण करण्यासाठी निधी मिळवण्यासाठी पालिकेने योजनेच्या एकूण क्षेत्रापैकी २५ टक्के क्षेत्र वाणिज्यवापरासाठी देण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यात आठ मजल्यांच्या इमारतींऐवजी १६ मजल्यांच्या सुमारे १० इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी काशी चर्च येथे आणखी एक आठ मजल्यांची इमारत प्रस्तावित असून तिच्यासह १६ मजल्यांच्या पाच इमारती सध्या अर्धवट अवस्थेत आहेत.

पालिकेच्या १५० कोटींच्या कर्जावर एमएमआरडीएने अद्याप शिक्कामोर्तब न केल्याने योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे नगरसेविका मीरादेवी यादव यांनी काम त्वरित सुरू न केल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यावर प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून अर्धवट अवस्थेतील इमारतींच्या कामाला सुरुवात करून लाभार्थ्यांचे थकीत भाडे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.प्रशासनाची तयारीकर्ज उपलब्ध झाल्यास अद्याप स्थलांतर न झालेल्या लाभार्थ्यांच्या पर्यायी निवाऱ्याची सोय पालिकेला करावी लागणार आहे. तसेच उर्वरित १६ मजल्यांच्या पाच इमारतींच्या कामाला सुरुवात करावी लागणार आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च येणार असला, तरी ही योजना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. तसा ठराव तत्कालीन महासभेत मंजूर करण्यात आला आहे.