शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

ठाण्यातील १५ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By admin | Updated: June 25, 2017 04:04 IST

कर्ज माफीच्या नव्या घोषणेचा लाभ ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३१ हजार ५८० शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांची १७१ कोटी ९३ लाखांची कर्जमाफी झाली आहे.

सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कर्ज माफीच्या नव्या घोषणेचा लाभ ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३१ हजार ५८० शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांची १७१ कोटी ९३ लाखांची कर्जमाफी झाली आहे. यात १४२ कोटी ७६ लाखांच्या पीककर्जासह २९ कोटी २१ लाखांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाचा समावेश आहे. यात ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ७२९ शेतकरी आहेत. त्यांना ७९ कोटी ५० लाखांची कर्जमाफी मिळाली. यात १३ हजार १७४ शेतकऱ्यांचे ६२ कोटी २१ लाखांचे पीककर्ज माफ झाले आहे. तर १७ कोटी २१ लाखांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाचा लाभ दोन हजार ५५५ शेतकऱ्यांना झाला आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांत एक हेक्टर शेती असलेल्या आठ हजार ८३२ लहान शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या सुमारे पाच हजार २५८ मध्यम शेतकऱ्यांचा समावेश आहे. दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असलेल्या सुमारे ७३८ मोठ्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहेठाणे व पालघर जिल्ह्यात भात, नागली, वरी, केळी आणि चिकू या चार पीकांसाठीच शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे. भात पीकासह नागली व वरीसाठी शेतकऱ्यांनी सर्वाधिक कर्ज घेतले आहेत. या तुलनेत केळी व चिकूसाठी अत्यल्प शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.