शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१४९० इमारती धोकादायक मुंब्य्रातील संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 00:45 IST

यादी जाहीर; मनपाच्या निर्णयाकडे लक्ष

ठाणे : एकीकडे शहरातील कोरोनाचे संकट भीषण होत असतांना दुसरीकडे येत्या काही दिवसांत येणाऱ्या पावसाळ्यात धोकादायक इमारतींची समस्यादेखील आ वासून उभी आहे. एकट्या मुंब्रा विभागात १४९० इमारती या धोकादायक तर १४ इमारती या अतिधोकादायक असल्याचेही महापालिकेच्या यादीवरून दिसत आहे. त्यामुळे महापालिका त्या खाली करणार की, अन्य काही पर्याय निवडणार, याकडे लक्ष लागले आहे.

शहरात दोन महिन्यांपासून लॉकडाउन असतांनाही कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे त्यांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांची मागणीही वाढली आहे. दुसरीकडे येत्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्याच्या या कालावधीत नालेसफाई, गटारांची सफाई करण्याबरोबरच मागील काही वर्षांत धोकादायक इमारतींचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

१०८९ इमारतींच्या किरकोळ दुरुस्तीची गरज

च्धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना महापालिकेने आता नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये सी १- अतिधोकादायक, सी २ अ इमारत तोडून पुन्हा उभी करण्यास शक्य, आणि सी ३ ब- तत्काळ दुरुस्त करता येणे शक्य, तर सी ३ किरकोळ दुरुस्तीला परवानगी देता येणे शक्य, अशा इमारतींचा समावेश असून महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी वेबसाइटवर टाकली आहे.च्ज्यामध्ये सी-१ मध्ये १४ इमारतींचा समावेश आहे. येथील नागरिकांना पावसाळ्यापूर्वी इमारत खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तर सी २ अ मध्ये ५९, सी २ ब मध्ये ३२५ इमारतींचा समावेश आहे.

१४ इमारती अतिधोकादायक :

आजघडीला मुंब्य्रात १४९० इमारती या धोकादायक स्थितीत असून १४ इमारती या अतिधोकादायक स्थितीत आहेत. २०१२ मध्ये शीळफाटा येथे झालेल्या लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेत ७४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेनंतर महापालिकेने धोकादायक इमारतींचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :mumbraमुंब्रा