शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

जिल्ह्यातील आरटीईच्या शालेय प्रवेशासाठी १४७२० अर्ज ग्राह्य ; सात हजार अर्ज नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 18:50 IST

जिल्ह्यातील गरीब, मागासवर्गीय व आर्थिकदृट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील बालकांना या उच्चदर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज मागवण्यात आले. त्यातून लॉटरी सोडतपध्दतीने विद्यार्थ्यांनी निवड, केजी आणि पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश आरक्षित ठेवले आहे. यासाठी पालकांनी २१ हजार ६५० अर्ज आजपर्यंत आॅनलाइन दाखल केले. त्यातील सहा हजार ९३० अर्ज रद्द ठरवलेले आहेत.

ठळक मुद्देगरीब, मागासवर्गीय व आर्थिकदृट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील बालकांना या उच्चदर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळेत मोफत प्रवेशजिल्ह्यातील ६५२ उच्च दर्जाचे, चांगले शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये १३ हजार ४०० प्रवेशनवीन अर्ज दाखल करण्यासाठी देखील ३० मार्च ही मुदत वाढ

ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली जिल्ह्यातील ६५२ उच्च दर्जाचे, चांगले शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये १३ हजार ४०० प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. या जागी प्रवेश मिळवण्यासाठी २१ हजार ६५० अर्ज दाखल झाले. पण त्यातील केवळ १४ हजार ७२० प्रवेश अर्ज ग्राह्य धरले आहेत. उर्वरित सहा हजार ९३० अर्ज रद्द केले. या रद्द ठरलेल्या अर्जांमध्ये संबंधीत पालकानी योग्य दुरूस्ती त्वरीत करणे अपेक्षित आहे. याशिवाय नवीन अर्ज दाखल करण्यासाठी देखील ३० मार्च ही मुदत वाढ देण्यात आली आहे.जिल्ह्यातील गरीब, मागासवर्गीय व आर्थिकदृट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील बालकांना या उच्चदर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज मागवण्यात आले. त्यातून लॉटरी सोडतपध्दतीने विद्यार्थ्यांनी निवड, केजी आणि पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश आरक्षित ठेवले आहे. यासाठी पालकांनी २१ हजार ६५० अर्ज आजपर्यंत आॅनलाइन दाखल केले. त्यातील सहा हजार ९३० अर्ज रद्द ठरवलेले आहेत. या रद्द केलेल्या अर्जात योग्य ती दुरूस्ती करून पालकानी ते पुन्हा आॅनलाइन दाखल करता येतील. सीनिअर केजीसाठी जागा नसलेल्या शाळाना बहुतांशी पालकांनी पसंती दिली आहे. त्यामुळेच सुमारे ९९ टक्के अर्ज रद्द ठरल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.आपला प्रवेश अर्ज ग्राह्य धरला की नाही, याची खातरजमा संबंधीत पालकांनी त्वरीत करण्याची अपेक्षा आहे. ग्राह्य न धरलेल्याअर्जातील दुरूस्तीसह योग्य पसंतीच्या शाळा पालकांनी नमुद करून ते अर्ज पुन्हा आॅनलाइन संमिट करण्याची संधी या पालकांना देण्यात आली आहे. या आधी अर्ज न केलेल्या पालकांनी या वाढीव मुदतीचा फायदा घेऊन पाल्याचा प्रवेश अर्ज त्वरीत आॅनलाइन करणे अपेक्षित आहे.पालकांनी हा प्रवेश अर्ज www.student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दाखल करणे आवश्यकआहे. जिल्ह्यातील ६५२ शाळांमध्ये होणा-या एकूण प्रवेशाच्या २५ टक्के शालेय प्रवेश आरटीईव्दारे दिले जात आहे. त्यासाठी या शाळांमध्ये १३ हजार ४०० प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. या आरक्षित ठेवलेल्या १३ हजार ४०० प्रवेशापैकी ११ हजार ७७६ प्रवेश पहिलीच्या वर्गात दिले जाणार आहे. तर एक हजार ६२४ प्रवेश पूर्वप्राथमिक म्हणजे केजीत दिले जाणार आहेत. म्हणजे केजीत प्रवेश दिला जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा