शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे १४७ घरांची पडझड, मुरबाडमधील १२३

By सुरेश लोखंडे | Updated: April 14, 2023 18:11 IST

अवकाळी पावसाने राज्याच्या अन्य जिल्ह्यात अतोनात नुकसान केले आहे.

ठाणे : अवकाळी पावसाने राज्याच्या अन्य जिल्ह्यात अतोनात नुकसान केले आहे. त्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील गांवखेड्यांना तीव्र उष्णतेच्या लाटेसह वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला आहे. गेल्या १४ दिवसांत तब्बल १४७ घरांची अशंत: पडझड झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांनी कहर केला आहे. काही काळ ढगाळ वातावरण निवळल्यानंतर जीव घेण्या उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे, तर सायंकाळी ग्रामीण भागात वादळी वाऱ्याचा फटका बसत आहे. जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड या दोन्ही तालुक्यांना वादळ वाऱ्याचा फटका बसला आहे. दरम्यान या दोन्ही तालुक्यात दीड मीमी.पाऊस पडला. मात्र वादळामुळे गावखेड्यातील घरांवरील पत्रे उडाले, गवताचे छप्पर असलेल्या घरांना या वादळामुळे फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील १२३ घरांचे नुकसान असून शहापूर या दुर्गम भागातील २४ घरांच्या नुकसानीची नोंद प्रशासनाने घेतली आहे.

फळझाडांसह भाजीपाल्यालाही फटका

मुरबाडच्या दहिगाव परिसरातील जाविद शेख यांच्या एक एकरमधील ९६ आंब्यांसह ५२ नारळाच्या झाडांना वादळाचा फटका बसला आहे. त्यामुळे तब्बल दोन लाखांच्या नुकसानीचा अंदाज शेख यांनी व्यक्त केला आहे. फार्म हाऊससह भाजीपाल्याचे, भेंडीचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. या वादळी वाऱ्यांपासून होणाऱ्या नुकसानीसह ग्रामीण भागात पाणी टंचाईही जीवघेणी ठरत आहे. त्यात रोज ४० ते ४२ अंशसेल्शीअस तापमानाला जिल्ह्यातील ग्रामस्थ तोंड देत आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे शारिरिक ताण पडून मृत्यु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उन्हाळ्यात अशी घ्या काळजी...

 जिल्ह्यातील या उष्णतेच्या लाटेवर मात करण्यासाठी उपाययोजना करून काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा नियंत्रण कक्षासह महापालिका, विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. यामध्ये तहान लागलेली नसली, तरीही जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट आणि चपलांचा वापर करावा. प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी टोपीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोके, मान झाकावी, आदी उपाययोजना सुचवविल्या आल्या आहेत.