शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

वसईत १४० अतिधोकादायक इमारती; ३६९ इमारती खाली करण्याच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 06:15 IST

वसई विरारमध्ये ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडून जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : वसई विरार महानगरपालिकेने शहरातील ए ते आय या नऊ प्रभागातील १४० इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करून ३६९ इमारतींना नोटिसी देत खाली करून दुरुस्ती करण्यासाठी सांगितले आहे. तर ९९९ इमारतींमध्ये रहिवासी राहत असून त्या इमारती खाली न करता दुरुस्त करणे व १२ इमारतींची किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

वसई विरारमध्ये ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडून जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. भविष्यात अशी कोणतीही दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी महानगरपालिकेने या इमारती रिक्त करून कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. सर्वेक्षण केलेल्या इमारतीपैकी १४० इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. तर ३६९ इमारतींना नोटिसा देऊन खाली करून दुरुस्ती करण्यासाठी सांगण्यात आले आहे. मनपाने आतापर्यंत १५ अतिधोकादायक इमारती निष्कासित केलेल्या असून १९ इमारती खाली केल्या आहेत. ९९९ इमारती खाली न करता त्याची दुरुस्ती सुचविली असून १२ इमारतीला किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान अनेक वर्ष जुन्या इमारतींना नोटिसा देऊन, त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगण्यात आले. त्यापैकी काहीं इमारती अतीधोकादायक व धोकादायक निघण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

वालीव प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक ३१ इमारती अतिधोकादायक असून विरार पूर्व बी प्रभाग समितीमध्ये सर्वात कमी ६ इमारती आहेत. यानंतर चंदनसार सी प्रभाग समितीमध्ये १५, आचोळे डी प्रभाग समितीमध्ये २०, नालासोपारा पश्चिम ई प्रभाग समितीमध्ये १९, पेल्हार एफ प्रभाग समितीमध्ये ११, नवघर माणिकपूर एच प्रभाग समितीमध्ये १३ तर वसई गाव आय प्रभाग समितीमध्ये १४ इमारती अतिधोकादायक आहेत. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना झाल्यास किंवा बेघर झालेल्या नागरिकांना राहण्याची पर्यायी व्यवस्था किंवा ट्रान्झिट कॅम्पची सुविधा उपलब्ध केली जाईल असे उपायुक्त दीपक झिंझाड यांनी लोकमतला सांगितले आहे.

१) अतिधोकादायक व धोकादायक प्रवर्गातील मिळकतीचे स्ट्रक्चरल ऑडीट ज्या मिळकती धारकांनी पूर्ण केलेले नाही. त्यांचे ऑडिट हे मनपाने पूर्ण केलेले असून नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तात्काळ सदरच्या मिळकती रिक्त कराव्यात व भविष्यात होणारी दुर्घटना टाळावी. - अनिलकुमार पवार (आयुक्त, मनपा)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार