शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वसईत १४० अतिधोकादायक इमारती; ३६९ इमारती खाली करण्याच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 06:15 IST

वसई विरारमध्ये ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडून जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : वसई विरार महानगरपालिकेने शहरातील ए ते आय या नऊ प्रभागातील १४० इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करून ३६९ इमारतींना नोटिसी देत खाली करून दुरुस्ती करण्यासाठी सांगितले आहे. तर ९९९ इमारतींमध्ये रहिवासी राहत असून त्या इमारती खाली न करता दुरुस्त करणे व १२ इमारतींची किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

वसई विरारमध्ये ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडून जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. भविष्यात अशी कोणतीही दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी महानगरपालिकेने या इमारती रिक्त करून कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. सर्वेक्षण केलेल्या इमारतीपैकी १४० इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. तर ३६९ इमारतींना नोटिसा देऊन खाली करून दुरुस्ती करण्यासाठी सांगण्यात आले आहे. मनपाने आतापर्यंत १५ अतिधोकादायक इमारती निष्कासित केलेल्या असून १९ इमारती खाली केल्या आहेत. ९९९ इमारती खाली न करता त्याची दुरुस्ती सुचविली असून १२ इमारतीला किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान अनेक वर्ष जुन्या इमारतींना नोटिसा देऊन, त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगण्यात आले. त्यापैकी काहीं इमारती अतीधोकादायक व धोकादायक निघण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

वालीव प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक ३१ इमारती अतिधोकादायक असून विरार पूर्व बी प्रभाग समितीमध्ये सर्वात कमी ६ इमारती आहेत. यानंतर चंदनसार सी प्रभाग समितीमध्ये १५, आचोळे डी प्रभाग समितीमध्ये २०, नालासोपारा पश्चिम ई प्रभाग समितीमध्ये १९, पेल्हार एफ प्रभाग समितीमध्ये ११, नवघर माणिकपूर एच प्रभाग समितीमध्ये १३ तर वसई गाव आय प्रभाग समितीमध्ये १४ इमारती अतिधोकादायक आहेत. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना झाल्यास किंवा बेघर झालेल्या नागरिकांना राहण्याची पर्यायी व्यवस्था किंवा ट्रान्झिट कॅम्पची सुविधा उपलब्ध केली जाईल असे उपायुक्त दीपक झिंझाड यांनी लोकमतला सांगितले आहे.

१) अतिधोकादायक व धोकादायक प्रवर्गातील मिळकतीचे स्ट्रक्चरल ऑडीट ज्या मिळकती धारकांनी पूर्ण केलेले नाही. त्यांचे ऑडिट हे मनपाने पूर्ण केलेले असून नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तात्काळ सदरच्या मिळकती रिक्त कराव्यात व भविष्यात होणारी दुर्घटना टाळावी. - अनिलकुमार पवार (आयुक्त, मनपा)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार