शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

वसईत १४० अतिधोकादायक इमारती; ३६९ इमारती खाली करण्याच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 06:15 IST

वसई विरारमध्ये ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडून जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : वसई विरार महानगरपालिकेने शहरातील ए ते आय या नऊ प्रभागातील १४० इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करून ३६९ इमारतींना नोटिसी देत खाली करून दुरुस्ती करण्यासाठी सांगितले आहे. तर ९९९ इमारतींमध्ये रहिवासी राहत असून त्या इमारती खाली न करता दुरुस्त करणे व १२ इमारतींची किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

वसई विरारमध्ये ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडून जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. भविष्यात अशी कोणतीही दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी महानगरपालिकेने या इमारती रिक्त करून कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. सर्वेक्षण केलेल्या इमारतीपैकी १४० इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. तर ३६९ इमारतींना नोटिसा देऊन खाली करून दुरुस्ती करण्यासाठी सांगण्यात आले आहे. मनपाने आतापर्यंत १५ अतिधोकादायक इमारती निष्कासित केलेल्या असून १९ इमारती खाली केल्या आहेत. ९९९ इमारती खाली न करता त्याची दुरुस्ती सुचविली असून १२ इमारतीला किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान अनेक वर्ष जुन्या इमारतींना नोटिसा देऊन, त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगण्यात आले. त्यापैकी काहीं इमारती अतीधोकादायक व धोकादायक निघण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

वालीव प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक ३१ इमारती अतिधोकादायक असून विरार पूर्व बी प्रभाग समितीमध्ये सर्वात कमी ६ इमारती आहेत. यानंतर चंदनसार सी प्रभाग समितीमध्ये १५, आचोळे डी प्रभाग समितीमध्ये २०, नालासोपारा पश्चिम ई प्रभाग समितीमध्ये १९, पेल्हार एफ प्रभाग समितीमध्ये ११, नवघर माणिकपूर एच प्रभाग समितीमध्ये १३ तर वसई गाव आय प्रभाग समितीमध्ये १४ इमारती अतिधोकादायक आहेत. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना झाल्यास किंवा बेघर झालेल्या नागरिकांना राहण्याची पर्यायी व्यवस्था किंवा ट्रान्झिट कॅम्पची सुविधा उपलब्ध केली जाईल असे उपायुक्त दीपक झिंझाड यांनी लोकमतला सांगितले आहे.

१) अतिधोकादायक व धोकादायक प्रवर्गातील मिळकतीचे स्ट्रक्चरल ऑडीट ज्या मिळकती धारकांनी पूर्ण केलेले नाही. त्यांचे ऑडिट हे मनपाने पूर्ण केलेले असून नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तात्काळ सदरच्या मिळकती रिक्त कराव्यात व भविष्यात होणारी दुर्घटना टाळावी. - अनिलकुमार पवार (आयुक्त, मनपा)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार