शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१४ लाख तरुणांच्या आत्महत्या, कौटुंबिक हिंसाचारावर ठेवले बोट; भरपाई देणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 03:29 IST

ठाणे : भारतीय कुटुंबव्यवस्थेतील संवेदना, संस्कार पती-पत्नीच्या नात्यातील अहंकारमुळे हरवले आहेत.

ठाणे : भारतीय कुटुंबव्यवस्थेतील संवेदना, संस्कार पती-पत्नीच्या नात्यातील अहंकारमुळे हरवले आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी २००५ साली कौटुंबिक हिंसाचार कायदा आला. त्याची अंमलबजावणीला सुरू होताच दहा वर्षात २६ ते ४० वयोगटांतील सुमारे १४ लाख नऊ हजार मुलांनी केवळ पोटगीच्या नुकसानभरपाईपोटी आत्महत्या केल्या आहेत, तर तीन लाख ४० हजार घटस्फोटासाठीचे अर्ज न्यायालयात प्रलंबित आहेत, अशी माहिती अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी दिली.सारा फाऊंडेशनच्या चौथ्या वर्धापनिदनानिमित्त सहयोग मंदिर येथे ‘चला नाते जपू या’ या कार्यक्र मात त्या बोलात होत्या. महिलांवर अन्याय होतो, म्हणून कौटुंबिक हिंसाचार कायदा अस्तित्वात आला. पण यामुळे भारतीय कुटुंबसंस्था खिळखिळी होत असल्याचे चित्र दिसत आहे. विवाहानंतर केवळ चार दिवसांतच सासू, पती शारीरिक, मानसिक छळ करतात म्हणून मुली कोर्टात घटस्फोटाचे दावे दाखल करतात आणि याचा गैरफायदा घेत गल्लाभरू वकील मुलांना तीस ते चाळीस पानी नाेिटसा पाठवून त्यांचे जीणे नकोसे करून टाकतात. २० लाख, ५० लाख, एक कोटी नुकसानभरपाईची मागणी मुलीकडचे करतात. दुर्देवाने ही मागणी मुलाला पूर्ण करणे शक्य नसेल, तर त्याच्यापुढे आत्महत्त्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही, अशी उदाहरणे त्यांनी दिली. देशात १४ लाख मुलांना नुकसानभरपाई देणे शक्य झाले नाही म्हणून अशा २६ ते ४० या वयोगटातील मुलांनी आत्महत्त्या केल्याचे त्यांनी सांगितले. मुलाच्या आईने त्याचे लग्न होताच संसाराच्या चाव्या सुनेकडे सोपवल्या तरच मुलांचा संसार आणि पर्यायाने घर आनंदात राहील, असा सल्लाही त्यांनी दिला. हल्ली जावई सांभाळणे सोपे, पण सून सांभाळणे अवघड होऊन बसले आहे. कारण सासूचे हात कायद्याने बांधले गेले आहेत. त्यामुळे सासूनेही बदलत्या काळानुसार तडजोड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील,डॉ. रोहित गोखले, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, माटे अँण्ड सन्सचे माटे, वास्तूविराज मंजुषा अहिरराव यांना गौरविण्यात आले. सारा फाऊंडेशनच्या सारंगी महाजन उपस्थित होत्या.