शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

१४ लाख तरुणांच्या आत्महत्या, कौटुंबिक हिंसाचारावर ठेवले बोट; भरपाई देणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 03:29 IST

ठाणे : भारतीय कुटुंबव्यवस्थेतील संवेदना, संस्कार पती-पत्नीच्या नात्यातील अहंकारमुळे हरवले आहेत.

ठाणे : भारतीय कुटुंबव्यवस्थेतील संवेदना, संस्कार पती-पत्नीच्या नात्यातील अहंकारमुळे हरवले आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी २००५ साली कौटुंबिक हिंसाचार कायदा आला. त्याची अंमलबजावणीला सुरू होताच दहा वर्षात २६ ते ४० वयोगटांतील सुमारे १४ लाख नऊ हजार मुलांनी केवळ पोटगीच्या नुकसानभरपाईपोटी आत्महत्या केल्या आहेत, तर तीन लाख ४० हजार घटस्फोटासाठीचे अर्ज न्यायालयात प्रलंबित आहेत, अशी माहिती अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी दिली.सारा फाऊंडेशनच्या चौथ्या वर्धापनिदनानिमित्त सहयोग मंदिर येथे ‘चला नाते जपू या’ या कार्यक्र मात त्या बोलात होत्या. महिलांवर अन्याय होतो, म्हणून कौटुंबिक हिंसाचार कायदा अस्तित्वात आला. पण यामुळे भारतीय कुटुंबसंस्था खिळखिळी होत असल्याचे चित्र दिसत आहे. विवाहानंतर केवळ चार दिवसांतच सासू, पती शारीरिक, मानसिक छळ करतात म्हणून मुली कोर्टात घटस्फोटाचे दावे दाखल करतात आणि याचा गैरफायदा घेत गल्लाभरू वकील मुलांना तीस ते चाळीस पानी नाेिटसा पाठवून त्यांचे जीणे नकोसे करून टाकतात. २० लाख, ५० लाख, एक कोटी नुकसानभरपाईची मागणी मुलीकडचे करतात. दुर्देवाने ही मागणी मुलाला पूर्ण करणे शक्य नसेल, तर त्याच्यापुढे आत्महत्त्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही, अशी उदाहरणे त्यांनी दिली. देशात १४ लाख मुलांना नुकसानभरपाई देणे शक्य झाले नाही म्हणून अशा २६ ते ४० या वयोगटातील मुलांनी आत्महत्त्या केल्याचे त्यांनी सांगितले. मुलाच्या आईने त्याचे लग्न होताच संसाराच्या चाव्या सुनेकडे सोपवल्या तरच मुलांचा संसार आणि पर्यायाने घर आनंदात राहील, असा सल्लाही त्यांनी दिला. हल्ली जावई सांभाळणे सोपे, पण सून सांभाळणे अवघड होऊन बसले आहे. कारण सासूचे हात कायद्याने बांधले गेले आहेत. त्यामुळे सासूनेही बदलत्या काळानुसार तडजोड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील,डॉ. रोहित गोखले, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, माटे अँण्ड सन्सचे माटे, वास्तूविराज मंजुषा अहिरराव यांना गौरविण्यात आले. सारा फाऊंडेशनच्या सारंगी महाजन उपस्थित होत्या.