शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

बायोमायनिंगच्या प्रकल्पाकरिता १३७ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याणमधील वादग्रस्त आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बायोमायनिंग पद्धतीने बंद करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रस्ताव तयार केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याणमधील वादग्रस्त आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बायोमायनिंग पद्धतीने बंद करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव १३७ कोटी रुपये खर्चाचा आहे. त्याला निधी मिळावा, यासाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळताच आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

गतवर्षी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली होती. मे २०२० मध्ये डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने आरोग्य सेवासुविधा पुरवण्यास प्राधान्य दिले गेले. त्यामुळे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मागे पडला. दरम्यान, आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा कचरा बायोमायनिंग पद्धतीने नष्ट करून त्या जागेवर गार्डन विकसित केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले होते. त्यासाठी महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. बायोमायनिंगकरिता आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे भिवंडी येथील गावात रिकाम्या दगडखाणीची मागणी केली होती. खाण ठरली आहे. मात्र, त्या गावातील ग्रामस्थांची ग्रामसभा कोरोनामुळे न झाल्याने ग्रामसभेची मान्यता मिळालेली नाही. मात्र, महापालिकेने बायोमायनिंगकरिता १३७ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. एप्रिल २०२१ मध्ये या प्रस्तावास राज्य सरकारकडून मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली.

...........

महापालिकेने उंबर्डे येथे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प उभारला आहे. त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून इंधन तयार करणे, कचऱ्यापासून खत तयार करणे, कापडी कचऱ्यापासून पिशव्या तयार करणे, या विविध उपाययोजनांमुळे आजघडीला डम्पिंग ग्राउंडवर केवळ ६० ते १०० मेट्रिक टन इतकाच कचरा जात आहे. उर्वरित ४०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आला.

........

महापालिका हद्दीत ज्या बड्या सोसायट्या आणि इमारती आहेत, त्यांना बांधकाम परवानगी देताना पर्यावरण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्या प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित सोसायट्यांनी त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे. त्यानुसार, मागच्या आठवड्यात बालाजी गार्डनचा कचरा उचलणे बंद करण्यात आले होते. त्यांना चार दिवसांची मुदतवाढ दिली होती. शहरातील अशा २३ बड्या सोसायट्यांना घनकचरा व्यवस्थापन विभागाने पुन्हा कचरा न उचलण्याची नोटीस दिली आहे. त्यांनी प्रक्रिया प्रकल्प सोसायटीत उभारावा, असे आदेश दिले आहेत. त्यापैकी तीन सोसायट्यांनी त्यांच्या सोसायटीतील कचऱ्यावर स्वत: प्रक्रिया करणे सुरू केले आहे. त्यामुळे जवळपास ४० मेट्रिक टन कचरा डम्पिंग ग्राउंडवर जात नाही.

----------------

वाचली