शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईद्वारे १३,४०० शालेय प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:19 IST

शिक्षणाचा हक्क(आरटीई) कायद्यांतर्गत जिल्ह्यातील नामांकित ६५२ खाजगी शाळांमध्ये यंदा १३ हजार ४०० प्रवेश देण्यात येणार आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : शिक्षणाचा हक्क(आरटीई) कायद्यांतर्गत जिल्ह्यातील नामांकित ६५२ खाजगी शाळांमध्ये यंदा १३ हजार ४०० प्रवेश देण्यात येणार आहेत. या रिक्त जागी बालकांना पूर्व प्राथमिक (केजी)ते पहिलीच्या वर्गाचे प्रवेश मोफत मिळणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ मार्चपर्यंत देण्यात आली आहे.इंग्रजी माध्यमासह दर्जेदार शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळा केजी ते पहिलीच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी मनमानी डोनेशन व शुल्क वसूल करतात. त्यामुळे या नामांकित शाळांमध्ये गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. या शाळांमध्ये मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुुंबातील बालकांना आरटीईद्वारे मोफत प्रवेश् देण्याची सक्ती केली आहे. यानुसार या बालकांसाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये एकूण जागांपैकी २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. त्यानुसार यंदा सुमारे ६५२ शाळांमध्ये १३ हजार ४०० शाळांमध्ये शालेय प्रवेश होणार आहेत. विद्यार्थ्यांना २०१९ ते २० या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी ँ३३स्र२://१३ी25ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये सुमारे १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित होते. यंदा शाळांची संख्या १२ ने वाढली असली तरी त्यातील प्रवेश सुमारे तीन हजार १४६ ने कमी झाले आहेत. आरटीईच्या २५ टक्के आरक्षणातील हे प्रवेश कमी होण्याचे कारण शिक्षण विभागाकडून सांगितले जात नाही. केजी ते पहिलीच्या वर्गात मागासवर्गींसह अल्प व मध्यम उत्पन्न गटातील पाल्यांच्या मुलांना आरटीईद्वारे प्रवेश दिला जात आहे.आरक्षित ठेवलेल्या १३ हजार ४०० प्रवेशांपैकी ११ हजार ७७६ प्रवेश पहिलीच्या वर्गात, तर एक हजार ६२४ प्रवेश पूर्वप्राथमिक म्हणजे केजीसाठी आहेत. गेल्या वर्षी प्रवेशप्रक्रिया रेंगाळल्यामुळे व पालकांचा प्रतिसादही कमी होता. सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलने पहिल्या फेरीतील २६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले होते. त्यावर योग्य तो तोडगा निघाल्यानंतरच दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. १० जूनपर्यंत ती सुरू होती. या प्रवेशावरून सतत गोंधळ सुरू असतो. १६ हजार ५४६ रिक्त प्रवेशांपैकी पाच हजार ७०२ विद्यार्थी पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी निवडले होते. यातील सुमारे तीन हजार ८९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले, तर दुसºया फेरीसाठी जिल्हाभरातील दोन हजार ६३७ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. ं

टॅग्स :Educationशिक्षणthaneठाणे