शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

१३०० तक्रारी निघाल्या निकाली

By admin | Updated: December 24, 2016 03:08 IST

जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन होऊन यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून फसवणूक झालेल्या आणि मंचाकडे दाद मागणाऱ्या

स्नेहा पावसकर / ठाणेजिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन होऊन यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून फसवणूक झालेल्या आणि मंचाकडे दाद मागणाऱ्या ग्राहकांचे प्रश्न मंच सोडवत असतो. २०१६ या वर्षात मंचात नव्याने सुमारे ११०० तक्रारी दाखल झाल्या असून त्यापेक्षा जास्त म्हणजे सुमारे १३०० तक्रारी निकाली काढण्यात मंचाला यश आले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाली लागलेल्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.सदनिका खरेदीपासून ते एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी प्रकरणात ग्राहकाला सहज फसवले जाते. यापैकी काही ग्राहकच फसवणूक करणाऱ्याविरोधात तक्रार करतात. मात्र, त्यापैकीही काही ग्राहक पुरावे गोळा करणे, न्यायालयात उपस्थित राहणे, या कारणांमुळे पुढे तक्रार चालवत नाहीत. मात्र, ज्या तक्रारी दाखल होतात, त्या सोडवून ग्राहकाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कायम प्रयत्नशील असतो. तरीही, फसवणुकीला बळी पडलेल्या अधिकाधिक ग्राहकांनी मंचाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन मंचातर्फे केले जाते. २०१५ मध्ये ९५० तक्रारी निकाली काढल्या होत्या. तर, नवीन दाखल झालेल्या तक्रारींची संख्या सुमारे ११०० होती. यंदाही २०१६ मध्ये नवीन सुमारे ११०० तक्रारी मंचात दाखल झाल्या असून यंदा १३०० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर, प्रलंबित तक्रारींची संख्या सुमारे २७०० आहे. ग्राहक संरक्षणाचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी फिरत्या न्यायालयांची मागणी ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश जोशी यांनी केली.