शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना १३० कोटींच्या पीक कर्जाची मदत

By admin | Updated: August 4, 2015 03:19 IST

पाऊस विलंबाने आलेला असतानाच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी

सुरेश लोखंडे , ठाणेपाऊस विलंबाने आलेला असतानाच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी भातासह नागली पिकांसाठी बँकेचे कर्ज घेतले आहे. यानुसार, ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे २६ हजार ७४६ शेतकऱ्यांना या खरीप हंगामासाठी १३० कोटी २३ लाख ६७ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केल्याचा दावाठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला आहे. भात व नागली या खरीप हंगामातील प्रमुख पिकांसह जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे टीडीसीसी बँकेचे नियोजन आहे. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांत ऊस उत्पादक नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. सध्याच्या या खरीप हंगामात शेतकऱ्यांना या दोन्ही जिल्ह्यांतील ३८६ शेती संस्थांद्वारे १३० कोटी २३ लाख ६७ हजार रुपये पीककर्ज दिल्याचे टीडीसीसीचे मुख्य पीककर्जवाटप अधिकारी विलास पाटील यांनी सांगितले. भातासाठी हेक्टरी ५५ हजार तर नागलीसाठी हेक्टरी २५ हजार रुपयांप्रमाणे या कर्जाचे वाटप होत आहे. या कर्जाच्या मुद्दलाची रक्कम शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत भरणे अपेक्षित आहे. वर्षभराच्या या कालावधीत त्यांच्या कर्जावरील ७ टक्के व्याजदर शासनाकडून बँकेस मिळतो. ठाणे जिल्ह्यातील २०६ शेती संस्थांव्दारे १५ हजार ४८८ शेतकऱ्यांना कर्जवाटप झाले आहे. त्यांच्या १३ हजार ०७८.७५ हेक्टर क्षेत्रासाठी ६७ कोटी ७५ लाख ७६ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील १८० शेती संस्थांव्दारे ११ हजार ३७५ शेतकऱ्यांना त्यांच्या १३ हजार ६६७.२५ हेक्टर क्षेत्रासाठी ६२ कोटी ४७ लाख ९१ हजार रुपये कर्जाचे वाटप केले आहे.