शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

शेतकऱ्यांना १३० कोटींच्या पीक कर्जाची मदत

By admin | Updated: August 4, 2015 03:19 IST

पाऊस विलंबाने आलेला असतानाच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी

सुरेश लोखंडे , ठाणेपाऊस विलंबाने आलेला असतानाच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी भातासह नागली पिकांसाठी बँकेचे कर्ज घेतले आहे. यानुसार, ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे २६ हजार ७४६ शेतकऱ्यांना या खरीप हंगामासाठी १३० कोटी २३ लाख ६७ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केल्याचा दावाठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला आहे. भात व नागली या खरीप हंगामातील प्रमुख पिकांसह जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे टीडीसीसी बँकेचे नियोजन आहे. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांत ऊस उत्पादक नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. सध्याच्या या खरीप हंगामात शेतकऱ्यांना या दोन्ही जिल्ह्यांतील ३८६ शेती संस्थांद्वारे १३० कोटी २३ लाख ६७ हजार रुपये पीककर्ज दिल्याचे टीडीसीसीचे मुख्य पीककर्जवाटप अधिकारी विलास पाटील यांनी सांगितले. भातासाठी हेक्टरी ५५ हजार तर नागलीसाठी हेक्टरी २५ हजार रुपयांप्रमाणे या कर्जाचे वाटप होत आहे. या कर्जाच्या मुद्दलाची रक्कम शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत भरणे अपेक्षित आहे. वर्षभराच्या या कालावधीत त्यांच्या कर्जावरील ७ टक्के व्याजदर शासनाकडून बँकेस मिळतो. ठाणे जिल्ह्यातील २०६ शेती संस्थांव्दारे १५ हजार ४८८ शेतकऱ्यांना कर्जवाटप झाले आहे. त्यांच्या १३ हजार ०७८.७५ हेक्टर क्षेत्रासाठी ६७ कोटी ७५ लाख ७६ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील १८० शेती संस्थांव्दारे ११ हजार ३७५ शेतकऱ्यांना त्यांच्या १३ हजार ६६७.२५ हेक्टर क्षेत्रासाठी ६२ कोटी ४७ लाख ९१ हजार रुपये कर्जाचे वाटप केले आहे.