शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
3
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
4
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
5
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
6
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
7
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
8
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
9
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
10
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
11
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
12
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
13
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
14
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
15
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
16
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
17
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
18
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
19
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
20
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...

१२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची धास्ती

By admin | Updated: June 10, 2017 01:04 IST

बारावीचा निकाल आॅनलाइन जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रथम वर्षासाठी प्रवेशाची

जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : बारावीचा निकाल आॅनलाइन जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रथम वर्षासाठी प्रवेशाची धावपळ सुरू झाली आहे. विद्यापीठाची ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाइनद्वारे राबवत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातून १७ हजार ४४५ विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता केवळ पाच हजार ११३ विद्यार्थी इतकीच आहे. त्यामुळे उर्वरित १२ हजार ३३२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. डोंबिवलीत प्रगती, मॉडेल, पेंढरकर, मंजुनाथ ही पदवी महाविद्यालये आहेत. त्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेव्यतिरिक्त बॅँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, बीएमएस, बीएमएम, आयटी, कॉम्प्युटर सायन्स आदी विविध पदवीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कल्याणमध्ये बिर्ला, अग्रवाल, सोनावणे, मुथा ही महाविद्यालये आहेत. कल्याण-डोंबिवलीत कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. पण, त्या तुलनेत पदवी महाविद्यालये नाहीत. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतून बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा मोठा आहे. त्या तुलनेत महाविद्यालयांमधील जागा अत्यंत मर्यादित आहेत. १७ हजार उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्या पुरेशा नाहीत. जेथे कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालये एकाच ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी पदवी महाविद्यालयांत त्यांच्याच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश मिळतो. त्यामुळे अन्य कनिष्ठ महाविद्यालयांतून आलेल्या विद्यार्थ्यांना पदवी महाविद्यालयांत प्रवेश मिळताना अडचणी येतात. आॅनलाइन प्रवेशानुसार कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांना मुंबई अथवा अन्य शहरांतील महाविद्यालयांमध्येही प्रवेश मिळू शकणार आहे. मात्र, या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. यापूर्वी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत आसपासच्या ३० महाविद्यालयांचे पर्याय व नावे सुचवण्याची अट होती. यंदाच्या वर्षी आसपासच्या १० महाविद्यालयांची नावे विद्यार्थी सूचवू शकतो. पर्याय १० महाविद्यालयांचा असल्याने त्याला प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता कमी असल्याचा दावा सरकारी यंत्रणेकडून केला जात आहे. कल्याण-डोंबिवलीतील महाविद्यालयांसह विद्यार्थी उल्हासनगरातील चांदीबाई, आर.के. तलरेजा कॉलेज, ठाण्यातील बांदोडकर, मुलुंडमधील वझे-केळकर व काही मुंबईतील बड्या कॉलेजची नावे सूचवू शकतात. सगळेच विद्यार्थी कल्याण-डोंबिवली शहरांतील महाविद्यालयांना पसंती देतीलच, असे नाही. कर्जत, नेरळ, खोपोली, आसनगाव तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वाशी येथील व्यावसायिक अभ्यासक्रम व इंजिनीअरिंगलाही काही विद्यार्थी पसंती देऊ शकतात. त्यामुळे १२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची तसदी होईलच असे नाही, याकडेही काही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. अग्रवाल कॉलेजच्या उपप्राचार्या अनघा राणे यांनी सांगितले की, कला शाखेत पदवी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. पूर्वी विद्यापीठाची वर्षाला एकच परीक्षा होती. आता परीक्षा वाढल्याने अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांचा कल कमी होत आहे. यंदा निकाल मागच्या वर्षांच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढला असल्याने कट आॅफ लिस्ट ही कॉमर्स व सायन्ससाठी अटीतटीची असणार आहे. कॉमर्स शाखेकडे विद्यार्थ्यांची ओढ अधिक आणि जागा कमी असल्याने कॉमर्ससाठीची चुरस जास्त जाणवेल. कला शाखेच्या शिक्षणाचा टक्का घसरला आहे. अन्य अभ्यासशाखेकडे तो वाढतो आहे. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला १० जूनपासून प्रारंभ होत आहे. प्रवेशाची पहिली यादी २२ जूनला जाहीर होणार आहे. या यादीत नंबर लागल्यापासून प्रवेशासाठी तीन दिवसांत प्रवेश घ्यावयाचा आहे. दुसरी प्रवेशाची यादी २८ जूनला जाहीर होईल. १ जुलैला तिसरी यादी जाहीर केली जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने चुकीचा प्रवेश अर्ज आॅनलाइनला सबमिट केला, तर त्याला पुन्हा सुधारित अर्ज भरण्याची मुभा असल्याचे प्रक्रिया राबवणाऱ्या यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना त्याचे योग्य मार्गदर्शन महाविद्यालयाकडून मिळत नसल्याने त्यांना त्यांचा प्रवेश अर्ज बाद होण्याची चिंता सतावत आहे.