शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
7
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
8
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
9
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
10
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
11
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
12
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
13
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
14
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
15
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
16
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
17
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
18
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ११०० आश्रमशाळा उपाशी

By admin | Updated: August 30, 2015 21:32 IST

राज्यभरातील १ हजार १०० आश्रमशाळांमधील पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, वह्या, गणवेश, भाज्या अंथरु ण पांघरुण आणि शैक्षणिक साहित्याच्या खर्चापोटी

जान्हवी मोर्ये, ठाणेराज्यभरातील १ हजार १०० आश्रमशाळांमधील पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, वह्या, गणवेश, भाज्या अंथरु ण पांघरुण आणि शैक्षणिक साहित्याच्या खर्चापोटी दिला जाणारा निधी राज्य सरकारकडून अडीच महिने उलटून गेले तरी अद्याप मिळालेला नाही. ही धक्कादायक बाब शिक्षक भारती या संघटनेने उघडकीस आणली आहे. लोकभारती या पक्षाचे आमदार कपील पाटील व शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ तारमळे, विजय शिंदे, विजय घोडविंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळांना भेटी दिल्या. त्यात हे विदारक सत्य उघडकीस आले. आश्रमशाळांना खर्चापोटी ३० टक्के निधी वर्षाच्या सुरुवातीला आगाऊ दिला जातो. यापैकी एक रुपयाही निधी सरकारने अडीच महिने उलटून गेले तरी वितरीत केलेला नाही. यासंदर्भातील तक्रार मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे यांनी केली आहे. मुरबाड तालुक्यातील तळवली पाड्यावर व्हर्च्युअल क्लास आणि डिजिटल अशा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले शाळा ते चालवितात. सातशे विद्यार्थी या आश्रमशाळेत शिकतात. त्यांच्यासाठी जेवण, गॅस कुठून आणायचा. त्यासाठी उधारी आणि उसनवारी केली जाते. गणवेश न मिळाल्याने जुनाच गणवेश घालून शाळेत मुले बसतात. त्यांची शैक्षणिक आबाळ होत आहे. संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीसाठी साकारणाऱ्या बजेटमधून आश्रमशाळांचा खर्च केला जातो. शासनाने निधी न देणे म्हणजे घटनात्मक तरतुदीला हरताळ फासून जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. याविषयी त्यांनी भाजप खासदार कपील पाटील व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे.