शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

राज्यातील ११०० आश्रमशाळा उपाशी

By admin | Updated: August 30, 2015 21:32 IST

राज्यभरातील १ हजार १०० आश्रमशाळांमधील पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, वह्या, गणवेश, भाज्या अंथरु ण पांघरुण आणि शैक्षणिक साहित्याच्या खर्चापोटी

जान्हवी मोर्ये, ठाणेराज्यभरातील १ हजार १०० आश्रमशाळांमधील पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, वह्या, गणवेश, भाज्या अंथरु ण पांघरुण आणि शैक्षणिक साहित्याच्या खर्चापोटी दिला जाणारा निधी राज्य सरकारकडून अडीच महिने उलटून गेले तरी अद्याप मिळालेला नाही. ही धक्कादायक बाब शिक्षक भारती या संघटनेने उघडकीस आणली आहे. लोकभारती या पक्षाचे आमदार कपील पाटील व शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ तारमळे, विजय शिंदे, विजय घोडविंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळांना भेटी दिल्या. त्यात हे विदारक सत्य उघडकीस आले. आश्रमशाळांना खर्चापोटी ३० टक्के निधी वर्षाच्या सुरुवातीला आगाऊ दिला जातो. यापैकी एक रुपयाही निधी सरकारने अडीच महिने उलटून गेले तरी वितरीत केलेला नाही. यासंदर्भातील तक्रार मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे यांनी केली आहे. मुरबाड तालुक्यातील तळवली पाड्यावर व्हर्च्युअल क्लास आणि डिजिटल अशा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले शाळा ते चालवितात. सातशे विद्यार्थी या आश्रमशाळेत शिकतात. त्यांच्यासाठी जेवण, गॅस कुठून आणायचा. त्यासाठी उधारी आणि उसनवारी केली जाते. गणवेश न मिळाल्याने जुनाच गणवेश घालून शाळेत मुले बसतात. त्यांची शैक्षणिक आबाळ होत आहे. संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीसाठी साकारणाऱ्या बजेटमधून आश्रमशाळांचा खर्च केला जातो. शासनाने निधी न देणे म्हणजे घटनात्मक तरतुदीला हरताळ फासून जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. याविषयी त्यांनी भाजप खासदार कपील पाटील व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे.