शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१०१ वर्षांच्या आजींनी दिला सूर्यनमस्काराचा कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 01:18 IST

१० हजार ६२२ विद्यार्थ्यांनी घातले एक लाख ३८ हजार ८६ सूर्यनमस्कार

कल्याण : रत्नागिरी जिल्ह्यातील १०१ वर्षांच्या लक्ष्मीबाई दामले आजींनी शनिवारी शहरातील ५४ शाळांमधील १० हजार ६२२ विद्यार्थ्यांसह सामूहिक सूर्यनमस्कार घातले. यावेळी त्यांनी सुदृढ व निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार हेच औषध असल्याचा कानमंत्र यावेळी उपस्थितांना दिला.

कल्याण-डोंबिवली महापालिका, महिला-बालकल्याण समिती आणि सुभेदारवाडा कट्ट्याने सूर्यनमस्कार दिनानिमित्त पश्चिमेतील सुभाष मैदानावर सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून दामले आजी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी या वयात व्यासपीठावर सूर्यनमस्कार घालून उपस्थितांना आश्चर्यचकित केले.

या कार्यक्रमप्रसंगी महापौर विनीता राणे, महिला व बालकल्याण समिती सभापती वीणा जाधव, माजी आमदार नरेंद्र पवार, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण, ‘ओएमजी’ रेकॉडर््सचे प्रा. दिनेश गुप्ता, गजानन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव, क्रीडाभारतीच्या कल्याण शाखेचे सचिव महादेव क्षीरसागर, नगरसेवक अरुण गीध, माजी नगरसेवक गणेश जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गामातेचे दर्शन घेऊन खेळाडू साधिन्य मोरे याच्या हस्ते ज्योत सुभाष मैदान येथे आणण्यात आली. त्यानंतर दामले आजी व उपस्थितांनी सूर्यदेवतेच्या प्रतिमेचे पूजन केले.

जाधव म्हणाल्या की, ‘सूर्यनमस्कारामुळे आरोग्य चांगले राहते. दामले आजींकडून प्रेरणा घेऊन सर्वांनी रोज सूर्यनमस्कार घालावेत.’ तर, ‘शंभर वर्षे आयुष्य जगायचे असल्यास रोज सूर्यनमस्कार घालावेत’ असे आवाहन पवार यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा जयवंत आणि शिवछत्रपती पुरस्कारविजेते अंकुर आहेर यांनी केले. या कार्यक्रमाला क्रीडाभारती कल्याण शाखा, अनिरुद्ध बापू डिझॅस्टर मॅनेजमेंट सेल, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, सर्व शाळा, मुख्याध्यापक तसेच क्रीडा शिक्षकांचे सहकार्य लाभले.

वयाच्या सातव्या वर्षांपासूनचा शिरस्ता

वयाच्या सातव्या वर्षांपासून मी सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केली. आजही दररोज न चुकता घालत आहे. सर्वांनी वेळ आणि अडचणींवर मात करून सूर्यनमस्कार घातले पाहिजेत, असे दामले आजींनी सांगितले. माझ्यासारखे निरोगी शरीर ठेवायचे असेल तर प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच सूर्यनमस्कार घालायला सांगितले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित पालकांना केले.

सूर्यनमस्कार हेच आजींचे औषध

यावेळी महापौर विनीता राणे म्हणाल्या की, ‘लहानपणापासून सूर्यनमस्कार घालणाऱ्या दामले आजींनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे औषध घेतले नाही. सूर्यनमस्कार हेच त्यांचे औषध. त्या औषधाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांनी दिवसातून एकदा सूर्यनमस्कार घातल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाहीत. आरोग्य निरोगी व तंदुरुस्त राहील.’

टॅग्स :Healthआरोग्यthaneठाणे