शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

उल्हासनगरातील १०० क्षयरोग रुग्ण संच्युरी कंपनीकडून ६ महिन्यांसाठी दत्तक

By सदानंद नाईक | Updated: May 16, 2024 17:25 IST

जगातील प्रमुख १० रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश असून क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पोषक आहार मिळाल्यास त्यांचे बरे होण्याचे प्रमाण वाढते.

उल्हासनगर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत महापालिकेकडून दरवर्षी टी वी रुग्णांची शोधमोहिम राबिवली जात असून वर्षाला १५०० टी.बी. रुग्ण शहरात आढळतात. त्यापैकी १०० रुग्णांना सहा महिन्यांसाठीं ग्रासीम कंपनी संच्युरी यांनी ६ महिण्यासाठी दत्तक घेतल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली आहे. 

जगातील प्रमुख १० रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश असून क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पोषक आहार मिळाल्यास त्यांचे बरे होण्याचे प्रमाण वाढते. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद शासनाने क्षयरुग्णांना प्रति व्यक्ती, प्रति महिना आवश्यक धान्य, कडधान्य, डाळी, तेल इत्यादी पोषण आहार निक्षयमित्राच्या माध्यमातून देण्याचे प्रयोजन आहे. सहा महिन्याचा पोषण आहारामुळे क्षयरुग्णांच्या आजारात व तब्येतीत झपाटयाने सुधारणा होत आहे. उल्हासनगर महापालिका यांच्या मार्गदर्शनामुळे दानशूर ग्रासिम कंपनी संच्युरी रेयॉन यांच्या सीएसआर निधीतून १०० क्षयरुग्णांना सहा महिन्यासाठी दत्तक घेऊन पोषण आहारासाठी निक्षयमित्र बनून ३ लाख ९० हजार रुपयांचा धनादेश महापालिका आयुक्त अजीज शेख यांना कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिला आहे.

महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी क्षयरोग रुग्णांना अशा पध्दतीने निक्षयमित्र म्हणून इतर दानशूर सामाजिक संस्था, स्वयं सेवी संस्था, लोक प्रतिनिधी किंवा कॉपोरेट संस्था यांनी सहकार्य करावे. असे आवाहन केले आहे. यावेळी उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, वैधकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा आदीजन उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर