शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

भिवंडी तालुक्यात आढळली ३८ अतितीव्र कुपोषित बालके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 00:05 IST

वीटभट्टी कामगारांच्या मुलांना बाधा : २७१ बालकांची नोंद झाल्याने चिंता वाढली

नितीन पंडितभिवंडी : भिवंडी तालुक्यात कुपोषित बालकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, तालुक्यात २७१ कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. बालकांच्या कुपोषण नियंत्रणावर कोट्यवधींचा खर्च करूनही कुपोषणाची व्याप्ती रोखण्यात शासनाला अपयश आल्याने शासनाची उदासीनता उघड झाली आहे.

भिवंडीत मागील काही दिवसांपूर्वी वीटभट्टी कामगाराच्या अतितीव्र कुपोषित मुलीला उपचारासाठी उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केल्याने बालकांच्या कुपोषणाचा धक्कादायक प्रकार उघड झाला. मात्र, या प्रकारानंतरही भिवंडीतील कुपोषण रोखण्यात यश आलेले नाही. उलटपक्षी तालुक्यातील बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण वाढतच चालले आहे. आजच्या घडीला तालुक्यात ३८ अतितीव्र कुपोषित बालकांची, तर २३३ मध्यम कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात अतितीव्र व मध्यम कुपोषित बालकांची एकूण संख्या २७१ झाली असल्याची माहिती भिवंडी बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी कोरे यांनी दिली.

भिवंडी तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत सुरू असलेल्या बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. गरोदर व स्तनदा माता तसेच लहान बालकांना घरपोच पोषण आहारामध्ये धान्यपुरवठा करणे, तसेच तीन ते सहा वर्षे वयाच्या बालकांना ताजा आहार देणे, स्तनदा व गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणे, सहा वर्षे वयोगटातील मुलांना आठवड्यातून चार दिवस अंडी व केळी यांसारखे खाद्यपदार्थ देणे, त्यांची वजन व उंची तपासणे, आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहीम राबविणे, अशी विविध कामे अंगणवाडीच्या सेविकांमार्फत करणे गरजेचे आहे.

मात्र, या सेविकांपर्यंत ही कोणतीही साधने वेळेवर पुरवली जात नसल्याची बाब अंगणवाडी सेविकांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका कुपोषित मुलांना पोषक आहार स्वखर्चाने देतात. मात्र, या अंगणवाडी सेविकांचा पगार तुटपुंजा असून तोही वेळेवर होत नसल्याने कुपोषण निर्मूलनात मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाच्या निदर्शनास या बाबी आणूनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कुपोषण निर्मूलनाबाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या दिवा-अंजूर, कोन, खारबाव, पडघा, अनगाव, दाभाड, वज्रेश्वरी, चिबीपाडा अशा आठ प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत २२७ वीटभट्टी कामगारांच्या मुलांची नोंद असून, स्थलांतरित कुटुंब संख्या सहा हजार १८० इतकी आहे. तालुक्यातील ५५ गावे व आदिवासी पाड्यांमध्ये ही अतितीव्र कुपोषित बालके आढळून आली असल्याचा अहवाल बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी शासनास पाठवला आहे.कुपोषण निर्मूलन योजनेत गैरव्यवहार?सरकार कुपोषित बालकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते; परंतु कोणत्याही योजनांचा लाभ वीटभट्टीवर काम करणाºया कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक कबुली पालक वेळोवेळी देत असल्याने कुपोषण निर्मूलन योजनेत गैरव्यवहार होत असल्याची शंका घेण्यास वाव असल्याचे वीटभट्टी कामगारांचे म्हणणे आहे.