शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

भिवंडी तालुक्यात आढळली ३८ अतितीव्र कुपोषित बालके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 00:05 IST

वीटभट्टी कामगारांच्या मुलांना बाधा : २७१ बालकांची नोंद झाल्याने चिंता वाढली

नितीन पंडितभिवंडी : भिवंडी तालुक्यात कुपोषित बालकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, तालुक्यात २७१ कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. बालकांच्या कुपोषण नियंत्रणावर कोट्यवधींचा खर्च करूनही कुपोषणाची व्याप्ती रोखण्यात शासनाला अपयश आल्याने शासनाची उदासीनता उघड झाली आहे.

भिवंडीत मागील काही दिवसांपूर्वी वीटभट्टी कामगाराच्या अतितीव्र कुपोषित मुलीला उपचारासाठी उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केल्याने बालकांच्या कुपोषणाचा धक्कादायक प्रकार उघड झाला. मात्र, या प्रकारानंतरही भिवंडीतील कुपोषण रोखण्यात यश आलेले नाही. उलटपक्षी तालुक्यातील बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण वाढतच चालले आहे. आजच्या घडीला तालुक्यात ३८ अतितीव्र कुपोषित बालकांची, तर २३३ मध्यम कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात अतितीव्र व मध्यम कुपोषित बालकांची एकूण संख्या २७१ झाली असल्याची माहिती भिवंडी बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी कोरे यांनी दिली.

भिवंडी तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत सुरू असलेल्या बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. गरोदर व स्तनदा माता तसेच लहान बालकांना घरपोच पोषण आहारामध्ये धान्यपुरवठा करणे, तसेच तीन ते सहा वर्षे वयाच्या बालकांना ताजा आहार देणे, स्तनदा व गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणे, सहा वर्षे वयोगटातील मुलांना आठवड्यातून चार दिवस अंडी व केळी यांसारखे खाद्यपदार्थ देणे, त्यांची वजन व उंची तपासणे, आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहीम राबविणे, अशी विविध कामे अंगणवाडीच्या सेविकांमार्फत करणे गरजेचे आहे.

मात्र, या सेविकांपर्यंत ही कोणतीही साधने वेळेवर पुरवली जात नसल्याची बाब अंगणवाडी सेविकांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका कुपोषित मुलांना पोषक आहार स्वखर्चाने देतात. मात्र, या अंगणवाडी सेविकांचा पगार तुटपुंजा असून तोही वेळेवर होत नसल्याने कुपोषण निर्मूलनात मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाच्या निदर्शनास या बाबी आणूनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कुपोषण निर्मूलनाबाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या दिवा-अंजूर, कोन, खारबाव, पडघा, अनगाव, दाभाड, वज्रेश्वरी, चिबीपाडा अशा आठ प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत २२७ वीटभट्टी कामगारांच्या मुलांची नोंद असून, स्थलांतरित कुटुंब संख्या सहा हजार १८० इतकी आहे. तालुक्यातील ५५ गावे व आदिवासी पाड्यांमध्ये ही अतितीव्र कुपोषित बालके आढळून आली असल्याचा अहवाल बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी शासनास पाठवला आहे.कुपोषण निर्मूलन योजनेत गैरव्यवहार?सरकार कुपोषित बालकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते; परंतु कोणत्याही योजनांचा लाभ वीटभट्टीवर काम करणाºया कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक कबुली पालक वेळोवेळी देत असल्याने कुपोषण निर्मूलन योजनेत गैरव्यवहार होत असल्याची शंका घेण्यास वाव असल्याचे वीटभट्टी कामगारांचे म्हणणे आहे.