शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

इनडोअरमुळे होणार रोमहर्षक सामने, भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली होईल - झीशान अली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:49 IST

एडमंटन येथे १५ सप्टेंबरपासून सुरूहोणारे डेव्हिस चषक स्पर्धेतील सामने उच्च दर्जाचे व रोमहर्षक होतील, असे मत भारताचे डेव्हिस चषक स्पर्धेतील प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले. हे सामने इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे ऊन व वा-याचा त्रास खेळाडूंना होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : एडमंटन येथे १५ सप्टेंबरपासून सुरूहोणारे डेव्हिस चषक स्पर्धेतील सामने उच्च दर्जाचे व रोमहर्षक होतील, असे मत भारताचे डेव्हिस चषक स्पर्धेतील प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले. हे सामने इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे ऊन व वा-याचा त्रास खेळाडूंना होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.झीशान म्हणाले, ‘या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली असेल. भारताच्या युकी भांबरीला इनडोअरमध्ये खेळणे आवडते. मागील वेळी आम्ही न्यूझीलंडविरुद्ध खूपच चांगली कामगिरी केली होती. इनडोअरमुळे आमचे काही नुकसान होईल, असे मला वाटत नाही, त्याचबरोबर त्यांनाही याचा खास फायदा होणार नाही.’या स्पर्धेत भारताला कॅनडाच्या डेनिस शापोवलोव व दुहेरीतील तज्ज्ञ खेळाडू डेनियल नेस्टर यांचे कडवे आव्हान असणार आहे. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेला मिलोस राओनिच दुखापतीमुळे या लढतीला मुकणार आहे. झीशान म्हणाले, ‘शापोवलोव खूपच चांगल्या फॉर्ममध्ये असून, त्याच्याविरुद्धची लढत ही सोपी असणार नाही. तरीही आम्हाला चार वर्षांत ही सर्वांत चांगली संधी आहे.’माजी कर्णधार एस. पी. मिश्रा यांनीही भारताला यावर्षी मोठी संधी असल्याचे म्हटले आहे. सोमदेव देवबर्मन याच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करीत आपले पद सोडणा-या मिश्रा यांना आपल्या अनुपस्थितीत संघ एकदाही प्ले आॅफच्या पुढे गेला नाही याचे आश्चर्य वाटते.ते म्हणाले, ‘मी २०१० व २०११ मध्ये भारताला जागतिक गटात नेले होते; मात्र त्या वेळीही भारताने अपेक्षित कामगिरी केली नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता कोणी तर या संघाला जागतिक गटात न्यायला हवे.’ मिश्रा म्हणाले, ‘मागील काही वर्षांच्या तुलनेत आपल्याकडे चांगले खेळाडू नाहीत. कॅनडाकडे चांगल्या रॅँकिंगचे खेळाडू आहेत.मात्र, आपली तयारी यावेळी चांगली झाली असल्याचे त्यांनी सांगितले. युकी भांबरी व रामकुमार सध्या चांगली कामगिरी करीत आहेत, तर रोहनने यापूर्वी नेस्टरला पराभूत केले होते. साकेतही चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने या वेळी रोमहर्षक सामने होतील.’झीशान म्हणाले, ‘इनडोअर स्टेडियममध्ये खेळताना बाहेरच्या कोणत्याही गोष्टींचा परिणाम आपल्या खेळावर होत नाही. त्यामुळे आपल्या खेळाचा स्तर सुमारे २० टक्क्यांपर्यंत वाढतो.’ भारताकडे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जागतिक गटात स्थान पटकाविण्याची आता मोठी संधी आहे, असे झीशान यांना वाटते. भारताला मागील तीन वर्षांत सर्बिया, झेक गणराज्य व स्पेनकडून पराभव पत्करावा लागला होता.

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत