शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

इनडोअरमुळे होणार रोमहर्षक सामने, भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली होईल - झीशान अली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:49 IST

एडमंटन येथे १५ सप्टेंबरपासून सुरूहोणारे डेव्हिस चषक स्पर्धेतील सामने उच्च दर्जाचे व रोमहर्षक होतील, असे मत भारताचे डेव्हिस चषक स्पर्धेतील प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले. हे सामने इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे ऊन व वा-याचा त्रास खेळाडूंना होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : एडमंटन येथे १५ सप्टेंबरपासून सुरूहोणारे डेव्हिस चषक स्पर्धेतील सामने उच्च दर्जाचे व रोमहर्षक होतील, असे मत भारताचे डेव्हिस चषक स्पर्धेतील प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले. हे सामने इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे ऊन व वा-याचा त्रास खेळाडूंना होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.झीशान म्हणाले, ‘या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली असेल. भारताच्या युकी भांबरीला इनडोअरमध्ये खेळणे आवडते. मागील वेळी आम्ही न्यूझीलंडविरुद्ध खूपच चांगली कामगिरी केली होती. इनडोअरमुळे आमचे काही नुकसान होईल, असे मला वाटत नाही, त्याचबरोबर त्यांनाही याचा खास फायदा होणार नाही.’या स्पर्धेत भारताला कॅनडाच्या डेनिस शापोवलोव व दुहेरीतील तज्ज्ञ खेळाडू डेनियल नेस्टर यांचे कडवे आव्हान असणार आहे. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेला मिलोस राओनिच दुखापतीमुळे या लढतीला मुकणार आहे. झीशान म्हणाले, ‘शापोवलोव खूपच चांगल्या फॉर्ममध्ये असून, त्याच्याविरुद्धची लढत ही सोपी असणार नाही. तरीही आम्हाला चार वर्षांत ही सर्वांत चांगली संधी आहे.’माजी कर्णधार एस. पी. मिश्रा यांनीही भारताला यावर्षी मोठी संधी असल्याचे म्हटले आहे. सोमदेव देवबर्मन याच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करीत आपले पद सोडणा-या मिश्रा यांना आपल्या अनुपस्थितीत संघ एकदाही प्ले आॅफच्या पुढे गेला नाही याचे आश्चर्य वाटते.ते म्हणाले, ‘मी २०१० व २०११ मध्ये भारताला जागतिक गटात नेले होते; मात्र त्या वेळीही भारताने अपेक्षित कामगिरी केली नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता कोणी तर या संघाला जागतिक गटात न्यायला हवे.’ मिश्रा म्हणाले, ‘मागील काही वर्षांच्या तुलनेत आपल्याकडे चांगले खेळाडू नाहीत. कॅनडाकडे चांगल्या रॅँकिंगचे खेळाडू आहेत.मात्र, आपली तयारी यावेळी चांगली झाली असल्याचे त्यांनी सांगितले. युकी भांबरी व रामकुमार सध्या चांगली कामगिरी करीत आहेत, तर रोहनने यापूर्वी नेस्टरला पराभूत केले होते. साकेतही चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने या वेळी रोमहर्षक सामने होतील.’झीशान म्हणाले, ‘इनडोअर स्टेडियममध्ये खेळताना बाहेरच्या कोणत्याही गोष्टींचा परिणाम आपल्या खेळावर होत नाही. त्यामुळे आपल्या खेळाचा स्तर सुमारे २० टक्क्यांपर्यंत वाढतो.’ भारताकडे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जागतिक गटात स्थान पटकाविण्याची आता मोठी संधी आहे, असे झीशान यांना वाटते. भारताला मागील तीन वर्षांत सर्बिया, झेक गणराज्य व स्पेनकडून पराभव पत्करावा लागला होता.

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत