शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

प्रत्येक क्रीडा संघटनेने बीसीसीआय कार्यप्रणालीचा करावा अभ्यास- सोमदेव देववर्मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:56 IST

भारताच्या माजी टेनिसपटूने व्यक्त केले स्पष्ट मत

- रोहित नाईक नवी मुंबई : ‘खेळाच्या प्रगतीसाठी प्रत्येक क्रीडा संघटनाने बीसीसीआयच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करायला पाहिजे. जेव्हा भारतीय क्रीडाक्षेत्रात व्यवस्थापन नाही, असे म्हटले जाते, तेव्हा त्यातून क्रिकेटला बाजूला ठेवावे लागेल. कारण क्रिकेटला अचूक आणि भक्कम व्यवस्थापन आहे. त्यामुळेच आज भारतात क्रिकेट अव्वल आहे,’ असे स्पष्ट मत भारताचा माजी टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.नेरुळ येथील डॉ. डी. वाय. क्रीडा अकादमी येथे सुरू असलेल्या स्पोर्ट्स फॉर ऑल आंतर शालेय क्रीडा स्पर्धेला उपस्थिती दर्शविलेल्या सोमदेवने ‘लोकमत’शी संवाद साधला. त्याने म्हटले की, ‘क्रिकेट खेळामध्ये शालेय स्तरापासून अचूक व्यवस्थापन आहे. सचिन-धोनीसारखे दिग्गज याच व्यवस्थापनातून पुढे आले आहेत. त्यामुळे इतर खेळांनीही क्रिकेटचे व्यवस्थापन शिकणे गरजेचे आहे. शिवाय भारतात क्रिकेट संस्कृती खोलपर्यंत रुजलेली आहे. अशी संस्कृती प्रत्येक खेळाला रुजवता आली पाहिजे. हे शक्य झाले, तरच खऱ्या अर्थाने देशात क्रीडासंस्कृती निर्माण होईल.’भारतीय टेनिसविषयी सोमदेव म्हणाला, ‘भारतीय टेनिसचा नवा स्टार कोण असेल, असा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जातो, पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. ९०च्या दशकामध्ये लिएंडर पेस भारताचा चेहरा होता. मात्र, तो दुहेरी स्पर्धांमध्ये वळल्यानंतर भारताला केवळ सानिया मिर्झाच्या रूपाने एक चेहरा मिळाला, पण त्यानंतर पुन्हा हा प्रश्न उपस्थित झाला आणि तो अद्याप सुटलेला नाही.’टेनिस खेळाचा प्रसार करण्यातही अपयश आल्याचे सांगताना सोमदेव म्हणाला की, ‘आपल्याकडे खेळाडूंची समस्या नसून, योग्य प्रक्रियेचा असलेला अभाव ही मुख्य समस्या आहे. आपल्याकडे नेहमीच विविध खेळांसोबत तुलना होते आणि हे थांबविले पाहिजे. प्रत्येक खेळ वेगळा आहे. टेनिससाठी आपल्याकडे अजूनही तज्ज्ञ प्रशिक्षकांची वानवा आहे. शिवाय तज्ज्ञ प्रशिक्षक घडविण्यातही आपण मागे असून, यासाठी आपल्याकडे कोणती प्रक्रियाही नाही.’तसेच, ‘आपल्याकडे आयटीएफआय मान्यताप्राप्त अनेक प्रशिक्षक आहेत, पण त्या तुलनेत गुणवान खेळाडू मात्र घडलेले नाहीत. ही समस्या गेल्या २० वर्षांपासून आहे आणि अजूनही आपण ती सोडविण्यात अपयशी ठरत आहोत. त्यामुळेच आजचा खेळाडू हा स्वत:च्या, त्याच्या कुटुंबीयांच्या आणि वैयक्तिक प्रशिक्षकाच्या मेहनतीच्या जोरावर पुढे जात आहे, पण टेनिस खेळातील व्यवस्थापनाचे यामध्ये काहीच योगदान नाही,’ अशी खंतही सोमदेवने या वेळी व्यक्त केली.१९९९ सालच्या सुमारास मी १४ व १६ वर्षांखालील गटात चमक दाखविली. त्यानंतर, मी देशाच्या सर्वोत्तम युवा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले, पण तरीही मला पुढील मार्गदर्शनासाठी खूप झुंजावे लागले होते. आजही तीच परिस्थिती इतर युवा खेळाडूंच्या बाबतीत कायम आहे. त्यामुळेच हे चित्र बदलले, तरच भारतीय टेनिसची प्रगती होईल.- सोमदेव देववर्मन

टॅग्स :TennisटेनिसBCCIबीसीसीआय