शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

प्रत्येक क्रीडा संघटनेने बीसीसीआय कार्यप्रणालीचा करावा अभ्यास- सोमदेव देववर्मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:56 IST

भारताच्या माजी टेनिसपटूने व्यक्त केले स्पष्ट मत

- रोहित नाईक नवी मुंबई : ‘खेळाच्या प्रगतीसाठी प्रत्येक क्रीडा संघटनाने बीसीसीआयच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करायला पाहिजे. जेव्हा भारतीय क्रीडाक्षेत्रात व्यवस्थापन नाही, असे म्हटले जाते, तेव्हा त्यातून क्रिकेटला बाजूला ठेवावे लागेल. कारण क्रिकेटला अचूक आणि भक्कम व्यवस्थापन आहे. त्यामुळेच आज भारतात क्रिकेट अव्वल आहे,’ असे स्पष्ट मत भारताचा माजी टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.नेरुळ येथील डॉ. डी. वाय. क्रीडा अकादमी येथे सुरू असलेल्या स्पोर्ट्स फॉर ऑल आंतर शालेय क्रीडा स्पर्धेला उपस्थिती दर्शविलेल्या सोमदेवने ‘लोकमत’शी संवाद साधला. त्याने म्हटले की, ‘क्रिकेट खेळामध्ये शालेय स्तरापासून अचूक व्यवस्थापन आहे. सचिन-धोनीसारखे दिग्गज याच व्यवस्थापनातून पुढे आले आहेत. त्यामुळे इतर खेळांनीही क्रिकेटचे व्यवस्थापन शिकणे गरजेचे आहे. शिवाय भारतात क्रिकेट संस्कृती खोलपर्यंत रुजलेली आहे. अशी संस्कृती प्रत्येक खेळाला रुजवता आली पाहिजे. हे शक्य झाले, तरच खऱ्या अर्थाने देशात क्रीडासंस्कृती निर्माण होईल.’भारतीय टेनिसविषयी सोमदेव म्हणाला, ‘भारतीय टेनिसचा नवा स्टार कोण असेल, असा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जातो, पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. ९०च्या दशकामध्ये लिएंडर पेस भारताचा चेहरा होता. मात्र, तो दुहेरी स्पर्धांमध्ये वळल्यानंतर भारताला केवळ सानिया मिर्झाच्या रूपाने एक चेहरा मिळाला, पण त्यानंतर पुन्हा हा प्रश्न उपस्थित झाला आणि तो अद्याप सुटलेला नाही.’टेनिस खेळाचा प्रसार करण्यातही अपयश आल्याचे सांगताना सोमदेव म्हणाला की, ‘आपल्याकडे खेळाडूंची समस्या नसून, योग्य प्रक्रियेचा असलेला अभाव ही मुख्य समस्या आहे. आपल्याकडे नेहमीच विविध खेळांसोबत तुलना होते आणि हे थांबविले पाहिजे. प्रत्येक खेळ वेगळा आहे. टेनिससाठी आपल्याकडे अजूनही तज्ज्ञ प्रशिक्षकांची वानवा आहे. शिवाय तज्ज्ञ प्रशिक्षक घडविण्यातही आपण मागे असून, यासाठी आपल्याकडे कोणती प्रक्रियाही नाही.’तसेच, ‘आपल्याकडे आयटीएफआय मान्यताप्राप्त अनेक प्रशिक्षक आहेत, पण त्या तुलनेत गुणवान खेळाडू मात्र घडलेले नाहीत. ही समस्या गेल्या २० वर्षांपासून आहे आणि अजूनही आपण ती सोडविण्यात अपयशी ठरत आहोत. त्यामुळेच आजचा खेळाडू हा स्वत:च्या, त्याच्या कुटुंबीयांच्या आणि वैयक्तिक प्रशिक्षकाच्या मेहनतीच्या जोरावर पुढे जात आहे, पण टेनिस खेळातील व्यवस्थापनाचे यामध्ये काहीच योगदान नाही,’ अशी खंतही सोमदेवने या वेळी व्यक्त केली.१९९९ सालच्या सुमारास मी १४ व १६ वर्षांखालील गटात चमक दाखविली. त्यानंतर, मी देशाच्या सर्वोत्तम युवा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले, पण तरीही मला पुढील मार्गदर्शनासाठी खूप झुंजावे लागले होते. आजही तीच परिस्थिती इतर युवा खेळाडूंच्या बाबतीत कायम आहे. त्यामुळेच हे चित्र बदलले, तरच भारतीय टेनिसची प्रगती होईल.- सोमदेव देववर्मन

टॅग्स :TennisटेनिसBCCIबीसीसीआय