शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

Atal Bihari Vajpayee : स्मृतींना उजाळा : ‘अटल’ भारतरत्न हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 03:25 IST

भारतरत्न अटलजींच्या जाण्याने केवळ भाजपच नव्हे, तर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अजातशत्रू म्हणून नावलौकिक मिळवलेले अटलजी पक्षाच्या, जाती, धर्माच्या पलीकडचे होते.

ठाणे : भारतरत्न अटलजींच्या जाण्याने केवळ भाजपच नव्हे, तर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अजातशत्रू म्हणून नावलौकिक मिळवलेले अटलजी पक्षाच्या, जाती, धर्माच्या पलीकडचे होते. देशासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. साध्या राहणीतून त्यांनी विरोधकांनाही आपलेसे केले होते. सभागृहात ते बोलायचे, तेव्हा संपूर्ण सभागृहाचे लक्ष केवळ अटलजींच्या भाषणाकडे असायचे, असे सांगून भाजपाचे ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय केळकर यांनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला.कवी असलेल्या अटलजींचे राजकारणात अतुलनीय योगदान आहे. राजकारणात राहूनही रंग माझा वेगळा, असा त्यांचा स्वभाव होता. जनसंघ ते भाजपाच्या स्थापनेपासून पक्षासाठी काम करताना अटलजींना भेटण्याचा योग अनेकवेळा आल्याचे केळकर यांनी सांगितले. अटलजी पंतप्रधान असताना त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दिल्लीला गेलो असता एवढ्या मोठ्या व्यक्तीशी आपण काय बोलणार, हा प्रश्न मनात होता. परंतु अटलजींनी स्वत:हून विचारपूस करून आमची सर्वांची माहिती घेतली. माझे नाव संजय सांगताच, संजय उवाच असे त्यांच्या मुखातून हसतमुख वाक्य निघाले.इतकी मोठी व्यक्ती पण इतकी साधी की, पहिल्या भेटीतच आपलेसे करणारी. नंतर, पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडणुकीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील जव्हार गावात अटलजी यांची सभा होती. त्या सभेची जबाबदारी माझ्याकडे होती. मी जव्हारलाच मुक्काम ठोकून होतो. केवळ तीन दिवसांत सर्व कार्यकर्त्यांनी ३६ तास प्रचंड मेहनत घेऊन सभा यशस्वी केली आणि अटलजींच्या कौतुकाची थाप मिळाली. त्यांच्याकडे बघून कार्यकर्त्यांना स्फूर्ती मिळायची. अंगात एक बळ यायचे, असे संजय केळकर यांनी यानिमित्ताने सांगितले.शिष्टाचार बाजूलाअटलजी पंतप्रधान असताना दिल्ली येथे आ. केळकर यांना त्यांच्या भेटीची संधी मिळाली होती. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना कॅमेरा सोबत घेण्यास मज्जाव केला होता. अटलजींनी केळकर यांच्या मनातील हेरले. शिष्टाचार बाजुला ठेऊन त्यांनी आ. केळकर यांना त्यांच्यासमवेत फोटो घेऊ दिला होता. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीthaneठाणे