शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee : स्मृतींना उजाळा : ‘अटल’ भारतरत्न हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 03:25 IST

भारतरत्न अटलजींच्या जाण्याने केवळ भाजपच नव्हे, तर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अजातशत्रू म्हणून नावलौकिक मिळवलेले अटलजी पक्षाच्या, जाती, धर्माच्या पलीकडचे होते.

ठाणे : भारतरत्न अटलजींच्या जाण्याने केवळ भाजपच नव्हे, तर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अजातशत्रू म्हणून नावलौकिक मिळवलेले अटलजी पक्षाच्या, जाती, धर्माच्या पलीकडचे होते. देशासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. साध्या राहणीतून त्यांनी विरोधकांनाही आपलेसे केले होते. सभागृहात ते बोलायचे, तेव्हा संपूर्ण सभागृहाचे लक्ष केवळ अटलजींच्या भाषणाकडे असायचे, असे सांगून भाजपाचे ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय केळकर यांनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला.कवी असलेल्या अटलजींचे राजकारणात अतुलनीय योगदान आहे. राजकारणात राहूनही रंग माझा वेगळा, असा त्यांचा स्वभाव होता. जनसंघ ते भाजपाच्या स्थापनेपासून पक्षासाठी काम करताना अटलजींना भेटण्याचा योग अनेकवेळा आल्याचे केळकर यांनी सांगितले. अटलजी पंतप्रधान असताना त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दिल्लीला गेलो असता एवढ्या मोठ्या व्यक्तीशी आपण काय बोलणार, हा प्रश्न मनात होता. परंतु अटलजींनी स्वत:हून विचारपूस करून आमची सर्वांची माहिती घेतली. माझे नाव संजय सांगताच, संजय उवाच असे त्यांच्या मुखातून हसतमुख वाक्य निघाले.इतकी मोठी व्यक्ती पण इतकी साधी की, पहिल्या भेटीतच आपलेसे करणारी. नंतर, पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडणुकीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील जव्हार गावात अटलजी यांची सभा होती. त्या सभेची जबाबदारी माझ्याकडे होती. मी जव्हारलाच मुक्काम ठोकून होतो. केवळ तीन दिवसांत सर्व कार्यकर्त्यांनी ३६ तास प्रचंड मेहनत घेऊन सभा यशस्वी केली आणि अटलजींच्या कौतुकाची थाप मिळाली. त्यांच्याकडे बघून कार्यकर्त्यांना स्फूर्ती मिळायची. अंगात एक बळ यायचे, असे संजय केळकर यांनी यानिमित्ताने सांगितले.शिष्टाचार बाजूलाअटलजी पंतप्रधान असताना दिल्ली येथे आ. केळकर यांना त्यांच्या भेटीची संधी मिळाली होती. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना कॅमेरा सोबत घेण्यास मज्जाव केला होता. अटलजींनी केळकर यांच्या मनातील हेरले. शिष्टाचार बाजुला ठेऊन त्यांनी आ. केळकर यांना त्यांच्यासमवेत फोटो घेऊ दिला होता. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीthaneठाणे