शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Atal Bihari Vajpayee : स्मृतींना उजाळा : ‘अटल’ भारतरत्न हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 03:25 IST

भारतरत्न अटलजींच्या जाण्याने केवळ भाजपच नव्हे, तर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अजातशत्रू म्हणून नावलौकिक मिळवलेले अटलजी पक्षाच्या, जाती, धर्माच्या पलीकडचे होते.

ठाणे : भारतरत्न अटलजींच्या जाण्याने केवळ भाजपच नव्हे, तर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अजातशत्रू म्हणून नावलौकिक मिळवलेले अटलजी पक्षाच्या, जाती, धर्माच्या पलीकडचे होते. देशासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. साध्या राहणीतून त्यांनी विरोधकांनाही आपलेसे केले होते. सभागृहात ते बोलायचे, तेव्हा संपूर्ण सभागृहाचे लक्ष केवळ अटलजींच्या भाषणाकडे असायचे, असे सांगून भाजपाचे ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय केळकर यांनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला.कवी असलेल्या अटलजींचे राजकारणात अतुलनीय योगदान आहे. राजकारणात राहूनही रंग माझा वेगळा, असा त्यांचा स्वभाव होता. जनसंघ ते भाजपाच्या स्थापनेपासून पक्षासाठी काम करताना अटलजींना भेटण्याचा योग अनेकवेळा आल्याचे केळकर यांनी सांगितले. अटलजी पंतप्रधान असताना त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दिल्लीला गेलो असता एवढ्या मोठ्या व्यक्तीशी आपण काय बोलणार, हा प्रश्न मनात होता. परंतु अटलजींनी स्वत:हून विचारपूस करून आमची सर्वांची माहिती घेतली. माझे नाव संजय सांगताच, संजय उवाच असे त्यांच्या मुखातून हसतमुख वाक्य निघाले.इतकी मोठी व्यक्ती पण इतकी साधी की, पहिल्या भेटीतच आपलेसे करणारी. नंतर, पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडणुकीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील जव्हार गावात अटलजी यांची सभा होती. त्या सभेची जबाबदारी माझ्याकडे होती. मी जव्हारलाच मुक्काम ठोकून होतो. केवळ तीन दिवसांत सर्व कार्यकर्त्यांनी ३६ तास प्रचंड मेहनत घेऊन सभा यशस्वी केली आणि अटलजींच्या कौतुकाची थाप मिळाली. त्यांच्याकडे बघून कार्यकर्त्यांना स्फूर्ती मिळायची. अंगात एक बळ यायचे, असे संजय केळकर यांनी यानिमित्ताने सांगितले.शिष्टाचार बाजूलाअटलजी पंतप्रधान असताना दिल्ली येथे आ. केळकर यांना त्यांच्या भेटीची संधी मिळाली होती. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना कॅमेरा सोबत घेण्यास मज्जाव केला होता. अटलजींनी केळकर यांच्या मनातील हेरले. शिष्टाचार बाजुला ठेऊन त्यांनी आ. केळकर यांना त्यांच्यासमवेत फोटो घेऊ दिला होता. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीthaneठाणे