शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Asian Game 2018 : भारतीय टेबल टेनिसपटूंना वेध ऑलिम्पिक पदकाचे! 

By स्वदेश घाणेकर | Updated: September 3, 2018 08:21 IST

Asian Game 2018 : आशियाई स्पर्धेच्या इतिहासात कधी न जमलेली गोष्ट यंदा भारतीय खेळाडूंनी करून दाखवली.

मुंबई - आशियाई स्पर्धेत 1958 ते 2014 या कालावधीत भारताने एकूण 616 पदके जिंकली, परंतु त्यात एकही पदक हे टेबल टेनिसपटूंना पटकावता आलेले नाही. पण, यंदा ही उणीव भरून निघाली. भारतीय खेळाडूंनी दोन कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवेल. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात कधी न जमलेली गोष्ट यंदा भारतीय खेळाडूंनी करून दाखवली. सुवर्ण व रौप्यपदकांसमोर टेबल टेनिसपटूंचे हे यश गौण वाटत असेल, परंतु याचे महत्त्व खेळाडूच जाणतात. 

मनिका बात्रा, अचंता शरथ कमल, साथियन ग्यानसेकरन, मौमा दास यांच्याकडून यंदा पदकांच्या अपेक्षा होत्या. या खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक भरारी घेतली होती. त्यामुळे त्यांच्याकडून सुवर्ण नाही, निदान कांस्य पदक तरी अपेक्षित होते. 1958 सालापासून आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन स्पर्धा वगळता चीननेच या क्रीडा प्रकारात हुकुमत गाजवली आहे आणि यंदाही त्यांचाच दबदबा राहिला. भारताला केवळ एखादे पदक पटकावून पदकाचा दुष्काळ संपवायचा होता आणि त्यात ते यशस्वी ठरले. 

भारतीय खेळाडूंनी गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेत केलेली कामगिरी अभिमानास्पद होती, परंतु त्याचे रूपांतर आशियाई पदकांमध्ये करणे, थोडेसे अवघडच होते. पण, राष्ट्रकुलमधील पदकांनी भारतीय खेळाडूंचे मनोबल प्रचंड उंचावलेले होते आणि त्याच जोशात त्यांच्याकडून दोन कांस्यपदकांची लॉटरी लागली. 

23 वर्षीय मनिका बात्राने तिच्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता केली नसली तरी या स्पर्धेतील अनुभव तिला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कामी येणार आहे. गोल्ड कोस्टमध्ये सर्वाधिक चार पदकं जिंकणारी ती एकमेव भारतीय होती. पण तिला आशियाई स्पर्धेत एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही. मिश्र गटात तिने कांस्य जिंकले. 

टेबल टेनिस संघातील सर्वात अनुभवी खेळाडू शरथ कमल हाही कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे 36 वर्षीय कमल शेवटच्या आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याने एक नव्हे तर दोन कांस्यपदक नावावर केली. मिश्र आणि पुरुष सांघिक अशी दोन्ही पदक त्याच्या नावावर जमा झाली. तीन आशियाई स्पर्धांमध्ये त्याला एकही पदकं न जिंकल्याची खंत होती आणि जकार्ता येथे त्याने ती दूर केली. 

ही दोन पदक भारतीय टेबल टेनिसपटूंच्या पुढील यशाची पायाभरणी आहे. त्यामुळे खेळाडूंनाही २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावण्याचे वेध लागले आहेत. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाTennisटेनिस