शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शाओमीची मुसंडी : सॅमसंगसह संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर विराजमान

By शेखर पाटील | Updated: November 15, 2017 12:10 IST

शाओमी या चिनी कंपनीने भारतीय बाजारपेठेत जोरदार मुसंडी मारत स्मार्टफोन विक्रीत सॅमसंगसोबत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर विराजमान होण्याची कामगिरी पार पाडली आहे.

इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशन म्हणजेच आयडीसी या डाटा रिचर्समधील ख्यातप्राप्त संस्थेने या वर्षीच्या तिसर्‍या तिमाहीत ( जुलै ते सप्टेंबर) भारतीय बाजारपेठेत झालेल्या स्मार्टफोन विक्रीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. यातून भारतीय ग्राहकांचा विविध ब्रँडबाबत असलेला कल स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे शाओमी कंपनीने अतिशय प्रचंड गतीने मारलेली मुसंडी हीच होय. गेल्या तीन महिन्यात भारतीय बाजारपेठेत सुमारे ३.९ कोटी स्मार्टफोनची विक्री झाली. यात प्रत्येकी २३.५ टक्क्यांचा वाटा सॅमसंग आणि शाओमी या कंपन्यांचा असल्याचे अधोरेखित झाले आहे.

शाओमीने आधीच गत तिमाहीत आपल्या कंपनीने भारतात ९२ कोटी स्मार्टफोन विकल्याचे जाहीर केले होते. यावर या आकडेवारीतून शिक्कामोर्तब झाले आहे. तर सॅमसंगनेही इतकेच स्मार्टफोन विकल्याचे यातून दिसून आले आहे. खरं तर, गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय स्मार्टफोनच्या बाजारपेठेत सॅमसंग पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. आता मात्र शाओमीही संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. अर्थात आता सॅमसंगच्या पहिल्या क्रमांकाला शाओमीच्या माध्यमातून पहिल्यांदाच तगडे आव्हान मिळाले आहे.

शाओमीच्या यशात रेडमी नोट 4 या मॉडेलचा सर्वाधीक वाटा आहे. गेल्या तीन महिन्यात या कंपनीने तब्बल ४० रेडमी नोट ४ हे हँडसेट विकले आहेत. याच्या जोडीला शाओमीने ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटींग तंत्राचा मिलाफ केल्याचंही या कंपनीला लाभ झाल्याचे दिसून आले आहे. तर सॅमसंगचे गॅलेक्सची जे 2, जे 7 नेक्स्ट, जे 7 मॅक्स आदी मॉडेल्सला लोकप्रियता लाभली आहे.

गत तिमाहीत लेनोव्हो ही कंपनी (आपल्या मालकीच्या मोटा ब्रँडसह) तिसर्‍या क्रमांकावर आहे. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे विवो आणि ओप्पो या कंपन्या असल्याचे आयडीसीने जाहीर केले आहे. म्हणजे पहिल्या पाच क्रमांकामध्ये दक्षिण कोरियातील सॅमसंगचा अपवाद वगळता अन्य सर्व कंपन्या चीनी आहेत. अर्थात यात एकही भारतीय कंपनीचा समावेश नसल्याची बाब लक्षणीय आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल