शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

देशात 4G फोन बंद होणार? मोदी सरकारने कंपन्यांसोबत महत्वाची बैठक घेतली, दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 12:33 IST

स्मार्टफोन कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 4G स्मार्टफोनचे उत्पादन थांबवावे, असे दूरसंचार विभाग (DoT) ने बैठकीत सुचवले आहे.

मोदी सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये बुधवारी एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत 5G नेटवर्क आणि 5G स्मार्टफोन वर काही निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये 5G स्मार्टफोनमध्ये लवकरात लवकर जल्द 5G सपोर्ट सॉफ्टवेयर अपडेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ५जी स्मार्टफोनची उपलब्धता वाढविण्यावरही जोर देण्यात आला आहे. 

यासाठी १० हजार रुपयांपेक्षा किंमतीच्या प्रत्येक फोनमध्ये ५जी असायला हवे, असे सांगण्यात आले आहे. यामुळे १० हजारांपेक्षा कमी किंमतीच्या फोनमध्ये ४जी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे काही कंपन्या ४जी फोन बनविणे देखील बंद करण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 4G स्मार्टफोनचे उत्पादन थांबवावे, असे दूरसंचार विभाग (DoT) ने बैठकीत सुचवले आहे. यामुळे यूजर्सना 4G वरून 5G स्मार्टफोनवर शिफ्ट करणे सोपे होणार आहे, असेही डॉटचे म्हणणे आहे. मध्यम श्रेणीतील ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटी असलेले स्मार्टफोन उपलब्ध करून दिले जातील. यामुळे या फोनची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

Realme सारख्या स्मार्टफोन कंपन्यांनी 12,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सर्व स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी दिली जाईल, असे आधीच म्हटले आहे. बजेट स्मार्टफोन श्रेणीतील कंपन्यांसाठी हे त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. 4G वरून 5G वर जाण्यासाठी जास्त गुंतवणूक आणि हार्डवेअर सपोर्टची गरज भासणार आहे. काही स्मार्टफोन कंपन्या 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या 4G स्मार्टफोनची चांगली विक्री करत आहेत.  

टॅग्स :5G५जीNarendra Modiनरेंद्र मोदी