शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
2
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
3
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
4
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
6
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
7
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
8
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
9
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
10
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
11
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
12
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ
13
बॉबी देओलने खरेदी केली शानदार रेंज रोव्हर SUV, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
14
“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
15
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
16
“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला
17
गुरुवारी लक्ष्मी नारायण त्रिकोण योग: ९ राशींना घवघवीत यश, भरघोस लाभ; ऐश्वर्य, वैभव प्राप्ती!
18
IPL 2025: बुमराह पाठोपाठ आणखी एक गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये पास; झाला संघात सामील
19
Sharvari Wagh : "गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार आदर्श पत्नी कोण? वाचा 'हा' श्लोक आणि जाणून घ्या लक्षणं!

मोबाईल नंबर १० आकडीच का असतो? कधी विचार केलाय? जाणून घ्या इंटरेस्टिंग कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 10:42 IST

मोबाईल नंबर सेव्ह करताना आपण १० आकडे तपासून पाहतो.. पण मोबाईल नंबरमध्ये १० आकडेच का असतात?

मुंबई: एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर सेव्ह करताना, कोणालाही कॉल करत असताना आपण नंबर तपासून पाहतो. चुकून एखादा आकडा कमी-जास्त झाला नाही ना, याची खातरजमा करतो. पण मोबाईल क्रमांकात १० आकडेच का असतात याचा विचार कधी केला आहे का? यामागचं नेमकं कारण काय..?

भारतात प्रत्येक व्यक्तीला १० आकडी मोबाईल नंबर मिळतो. सरकारची राष्ट्रीय नंबरिंग योजना हे यामागचं कारण आहे. मोबाईल नंबर एक अंकी असल्यास ० ते ९ पर्यंत केवळ १० जणांनाच वेगवेगळे नंबर मिळाले असते. त्यामुळे १० नंबर तयार होतील आणि केवळ १० जणच त्यांचा वापर करू शकतील. २ अंकी नंबर असल्यास ० ते ९९ पर्यंत १०० नंबर तयार होतील आणि १०० जणच त्यांचा वापर करू शकतील.

मोबाईल नंबरमध्ये १० आकडे असण्यामागचं दुसरं कारण आहे देशाची लोकसंख्या. देशाची सध्याची लोकसंख्या १३० कोटी आहे. त्यामुळे ९ आकडी मोबाईल नंबर दिला गेल्यास भविष्यात सगळ्यांना मोबाईल नंबर मिळू शकणार नाही. १० आकडी मोबाईल नंबर असल्यास एक हजार कोटी नंबर्स तयार होतात. हाच विचार करून मोबाईल नंबर्स १० आकडी ठेवण्यात आले.

२००३ पर्यंत देशात ९ आकडी मोबाईल नंबर होते. मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेता ट्रायनं मोबाईल नंबर १० आकडी केले. १५ जानेवारी २०२१ पासून लँडलाईनहून फोन नंबर लावताना त्यापुढे शून्य लावण्याची सूचना दिली. या बदलामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाईल सेवांसाठी २५४.४ कोटी अतिरिक्त नंबर उपलब्ध झाले.