शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

मोबाईल नंबर १० आकडीच का असतो? कधी विचार केलाय? जाणून घ्या इंटरेस्टिंग कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 10:42 IST

मोबाईल नंबर सेव्ह करताना आपण १० आकडे तपासून पाहतो.. पण मोबाईल नंबरमध्ये १० आकडेच का असतात?

मुंबई: एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर सेव्ह करताना, कोणालाही कॉल करत असताना आपण नंबर तपासून पाहतो. चुकून एखादा आकडा कमी-जास्त झाला नाही ना, याची खातरजमा करतो. पण मोबाईल क्रमांकात १० आकडेच का असतात याचा विचार कधी केला आहे का? यामागचं नेमकं कारण काय..?

भारतात प्रत्येक व्यक्तीला १० आकडी मोबाईल नंबर मिळतो. सरकारची राष्ट्रीय नंबरिंग योजना हे यामागचं कारण आहे. मोबाईल नंबर एक अंकी असल्यास ० ते ९ पर्यंत केवळ १० जणांनाच वेगवेगळे नंबर मिळाले असते. त्यामुळे १० नंबर तयार होतील आणि केवळ १० जणच त्यांचा वापर करू शकतील. २ अंकी नंबर असल्यास ० ते ९९ पर्यंत १०० नंबर तयार होतील आणि १०० जणच त्यांचा वापर करू शकतील.

मोबाईल नंबरमध्ये १० आकडे असण्यामागचं दुसरं कारण आहे देशाची लोकसंख्या. देशाची सध्याची लोकसंख्या १३० कोटी आहे. त्यामुळे ९ आकडी मोबाईल नंबर दिला गेल्यास भविष्यात सगळ्यांना मोबाईल नंबर मिळू शकणार नाही. १० आकडी मोबाईल नंबर असल्यास एक हजार कोटी नंबर्स तयार होतात. हाच विचार करून मोबाईल नंबर्स १० आकडी ठेवण्यात आले.

२००३ पर्यंत देशात ९ आकडी मोबाईल नंबर होते. मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेता ट्रायनं मोबाईल नंबर १० आकडी केले. १५ जानेवारी २०२१ पासून लँडलाईनहून फोन नंबर लावताना त्यापुढे शून्य लावण्याची सूचना दिली. या बदलामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाईल सेवांसाठी २५४.४ कोटी अतिरिक्त नंबर उपलब्ध झाले.