शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एअरटेलनंतर व्होडाफोनही नरमली; ग्राहकांना पुन्हा अनलिमिटेड कॉलिंगची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 11:03 IST

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनमध्ये कॉलिंग आणि इंटरनेटवरून शीतयुद्ध रंगले होते. कोणाचा प्लान कमी किंमतीत जास्त सेवा देणारा याबाबत गेल्या तीन वर्षांपासून रस्सीखेच सुरू होती. मात्र, तोट्यात जात असल्याचे पाहून या कंपन्यांनी हे प्लॅन वाढविण्याचा निर्णय घेतला होता. 

नवी दिल्ली : अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी मिनिटाला 6 पैसे एफयुपी द्यावी लागत असल्याने हा पैसा ग्राहकांच्या खिशातून काढण्य़ाचा निर्णय टेलिकॉम कंपन्यांच्याच अंगलट येऊ लागला आहे. यामुळे टेरिफ वाढविणाऱ्या कंपन्यांनी ग्राहक टिकविण्यासाठी पुन्हा अनलिमिटेड कॉलिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोन-आयडियाने ही माहिती दिली आहे. 

या आधी एअरटेलने एफयुपी हटविण्याची घोषणा केली होती. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनमध्ये कॉलिंग आणि इंटरनेटवरून शीतयुद्ध रंगले होते. कोणाचा प्लान कमी किंमतीत जास्त सेवा देणारा याबाबत गेल्या तीन वर्षांपासून रस्सीखेच सुरू होती. मात्र, तोट्यात जात असल्याचे पाहून या कंपन्यांनी हे प्लॅन वाढविण्याचा निर्णय घेतला होता. 

जिओ अन्य नेटवर्कवर कॉल करताना रिंग वाजण्याचा कालावधी कमी करत असल्याचा आरोप एअरटेल, व्होडाफोनने केला होता. तर जिओने हे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार असल्याचे म्हटले होते. असे केल्याने अन्य नेटवर्कच्या ग्राहकांना मिसक़ॉल जात होता. यामुळे त्या ग्राहकांनी जिओला फोन केल्याने या कंपन्यांना जिओला 6 पैसे एफयूपी द्यावी लागत होती. 

या वादमुळे कंपन्यांनी रिचार्जची रक्कम वाढविण्याबरोबरच अन्य नेटवर्कसाठी लिमिटही दिले होते. व्होडाफोनने 28 दिवसांच्या रिचार्जसाठी 1000 मिनिट दिले होते. तर 84 दिवसांच्या रिचार्जसाठी 3000 मिनिटे देण्यात आली होती. जर 28 दिवसांचा ग्राहक रोज अन्य नेटवर्कवर एक तास बोलत असेल तर त्याची ही लिमिट 16 दिवसांतच संपणार होती. असे झाले असते तर हे प्लॅन्स महागडे ठरत होते. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. तुलनेत जिओचे प्लान स्वस्त होते, यामुळे आधीच ग्राहक गमावलेल्या कंपन्यांना हे परवडणार नव्हते. 

यामुळे एअरटेलनंतर व्होडाफोनने अनलिमिटेड कॉल देण्याची घोषणा केली आहे.   

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनAirtelएअरटेलJioजिओ