शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

पीक जास्त आणि खर्च कमी करण्यासाठी वोडाफोन आयडियाची शेतकऱ्यांना ‘स्मार्ट’ मदत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:26 IST

इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा वापर करून स्मार्टअ‍ॅग्री प्रकल्प अचूक आणि व्यावहारिक माहिती पुरवतो ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगले पीक व उत्पन्न मिळवण्यात मदत होते.  

‘वी’ची कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) संस्था वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आपला परिवर्तनात्मक 'स्मार्टअ‍ॅग्री' प्रकल्प उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम आणि तेलंगणामधील कृषीबहुल भागांमध्ये विस्तारत आहे. ‘वी’च्या सीएसआर स्मार्टअ‍ॅग्री प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या रोजगारात सुधारणा घडवून आणता यावी आणि शेतीच्या पर्यावरणानुकूल पद्धतींचा वापर करता यावा यासाठी मदत करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. 

इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रिअल-टाइम टेक्नॉलॉजी उपायांचा वापर करून स्मार्टअ‍ॅग्री प्रकल्प शेतकऱ्यांना शेतीमधील महत्त्वाच्या घटकांबद्दल माहिती पुरवतो. यामध्ये माती व हवेची गुणवत्ता, कीटक आणि पिकांची वाढ यांचा समावेश असतो. 

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसंदर्भात प्रत्यक्षात उपयोगात आणता येईल अशी आणि स्थानिक पातळीवर उपयुक्त ठरेल अशी महत्त्वाची माहिती, त्याबरोबरीनेच बाजारपेठा, सरकारी धोरणे आणि योजना इत्यादींचा समावेश असलेल्या कृषी बातम्या पुरवल्या जातात.  शेतकऱ्यांना ही सर्व माहिती त्यांच्या मोबाईल फोनवर त्यांच्या क्षेत्रीय भाषेमध्ये पुरवली जाते, एखाद्या शेतकऱ्याला माहिती वाचण्यात अडचण येत असल्यास ऑडिओ पर्याय देखील उपलब्ध आहे. 

स्मार्टअ‍ॅग्रीची सुरुवात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील कृषीबहुल भागांमध्ये करण्यात आली, आता हा प्रकल्प अजून चार राज्यांमध्ये विस्तारला जात आहे, यामुळे २.८ लाखांहून जास्त शेतकऱ्यांना ८ ते १२% जास्त पिके पिकवण्यासाठी आणि शेतीसाठी येणाऱ्या खर्चात १५ ते २० टक्क्यांची घट करण्यासाठी सक्षम केले आहे.  

आता वोडाफोन आयडिया फाऊंडेशन उत्तर प्रदेशात हरदोई, लक्ष्मीमपूर, राजस्थानात बुंदी, कोटा, टोंक, बारन, आसाममध्ये दिब्रुगढ, जोरहाट, तिनसुकिया, उडाल्गुरी आणि तेलंगणामध्ये आदिलाबाद मधील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानामार्फत मदत पुरवेल. 

स्मार्टअ‍ॅग्री प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतीच्या पर्यावरणानुकूल पद्धतींचा समावेश करण्यासाठी भौतिक मदत देखील पुरवली जाते.  स्मार्टअ‍ॅग्रीने शेतकऱ्यांना साहाय्य पुरवण्यासाठी आणि त्यांच्या पिकांविषयी महत्त्वाची माहिती सहजपणे मिळवता यावी यासाठी १२५ टेक-सॅव्ही युवा कृषी उद्योजकांना आणि १५ शेतकरी उत्पादक संघटनांना एम्पॅनेल केले आहे.