शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पीक जास्त आणि खर्च कमी करण्यासाठी वोडाफोन आयडियाची शेतकऱ्यांना ‘स्मार्ट’ मदत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:26 IST

इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा वापर करून स्मार्टअ‍ॅग्री प्रकल्प अचूक आणि व्यावहारिक माहिती पुरवतो ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगले पीक व उत्पन्न मिळवण्यात मदत होते.  

‘वी’ची कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) संस्था वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आपला परिवर्तनात्मक 'स्मार्टअ‍ॅग्री' प्रकल्प उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम आणि तेलंगणामधील कृषीबहुल भागांमध्ये विस्तारत आहे. ‘वी’च्या सीएसआर स्मार्टअ‍ॅग्री प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या रोजगारात सुधारणा घडवून आणता यावी आणि शेतीच्या पर्यावरणानुकूल पद्धतींचा वापर करता यावा यासाठी मदत करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. 

इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रिअल-टाइम टेक्नॉलॉजी उपायांचा वापर करून स्मार्टअ‍ॅग्री प्रकल्प शेतकऱ्यांना शेतीमधील महत्त्वाच्या घटकांबद्दल माहिती पुरवतो. यामध्ये माती व हवेची गुणवत्ता, कीटक आणि पिकांची वाढ यांचा समावेश असतो. 

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसंदर्भात प्रत्यक्षात उपयोगात आणता येईल अशी आणि स्थानिक पातळीवर उपयुक्त ठरेल अशी महत्त्वाची माहिती, त्याबरोबरीनेच बाजारपेठा, सरकारी धोरणे आणि योजना इत्यादींचा समावेश असलेल्या कृषी बातम्या पुरवल्या जातात.  शेतकऱ्यांना ही सर्व माहिती त्यांच्या मोबाईल फोनवर त्यांच्या क्षेत्रीय भाषेमध्ये पुरवली जाते, एखाद्या शेतकऱ्याला माहिती वाचण्यात अडचण येत असल्यास ऑडिओ पर्याय देखील उपलब्ध आहे. 

स्मार्टअ‍ॅग्रीची सुरुवात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील कृषीबहुल भागांमध्ये करण्यात आली, आता हा प्रकल्प अजून चार राज्यांमध्ये विस्तारला जात आहे, यामुळे २.८ लाखांहून जास्त शेतकऱ्यांना ८ ते १२% जास्त पिके पिकवण्यासाठी आणि शेतीसाठी येणाऱ्या खर्चात १५ ते २० टक्क्यांची घट करण्यासाठी सक्षम केले आहे.  

आता वोडाफोन आयडिया फाऊंडेशन उत्तर प्रदेशात हरदोई, लक्ष्मीमपूर, राजस्थानात बुंदी, कोटा, टोंक, बारन, आसाममध्ये दिब्रुगढ, जोरहाट, तिनसुकिया, उडाल्गुरी आणि तेलंगणामध्ये आदिलाबाद मधील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानामार्फत मदत पुरवेल. 

स्मार्टअ‍ॅग्री प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतीच्या पर्यावरणानुकूल पद्धतींचा समावेश करण्यासाठी भौतिक मदत देखील पुरवली जाते.  स्मार्टअ‍ॅग्रीने शेतकऱ्यांना साहाय्य पुरवण्यासाठी आणि त्यांच्या पिकांविषयी महत्त्वाची माहिती सहजपणे मिळवता यावी यासाठी १२५ टेक-सॅव्ही युवा कृषी उद्योजकांना आणि १५ शेतकरी उत्पादक संघटनांना एम्पॅनेल केले आहे.