शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

व्होडाफोन-आयडियाची मोदी सरकारला मोठ्ठी ऑफर; 1 रुपयांत कंपनीच घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 15:07 IST

कंपनीला गेल्या दशकात जवळपास दोन लाख कोटींचा तोटा झाला आहे. आणि आता सरकारला 53000 कोटी रुपयांचा एजीआर द्यायचा आहे.

ठळक मुद्देकील मुकूल रोहतगी यांनीच ही ऑफर देऊ केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. कंपनी बुडाली तर 10000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात असणार आहे.जर कंपनी बंद पडली तर टेलिकॉम सेक्टरमध्ये स्पर्धा संपून जाईल आणि केवळ दोनच कंपन्या उरतील. 

नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडियाने केंद्र सरकारला एक अशी ऑफर देऊ केली आहे की अशी ऑफर जगात कोणीच अद्याप दिलेली नसेल. ही ऑफर आयडिया कंपनीची जाहिरात 'व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी!' याच्याशी मिळतीजुळती आहे. तसेच कंपनीने सरकारला सांगितले आहे की केवळ 1 रुपया देऊन तुम्ही अख्खी कंपनी खरेदी करू शकता.

 कंपनीला गेल्या दशकात जवळपास दोन लाख कोटींचा तोटा झाला आहे. आणि आता सरकारला 53000 कोटी रुपयांचा एजीआर द्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये व्होडाफोनकडून बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी यांनीच ही ऑफर देऊ केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यांनी दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांच्याशी फोनवर चर्चा केली. जर कंपनी बुडाली तर 10000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात असणार आहे. यासंदर्भात रोहतगी यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. या चर्चेनंतर व्होडाफोन इंडियाचे अध्यक्ष आदित्य बिर्ला यांनी दूरसंचार विभागाचे अधिकारी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच्याशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. 

आता ही नवीन 1 रुपयांत कंपनी खरेदी करण्याची काय भानगड आहे. तर बीएसएनएल 4 जी स्पेक्ट्रम आणि नेटवर्कसाठी प्रयत्न करत आहेत. अशातच सरकारने जर व्होडाफोन आयडिया खरेदी केली तर आयते 30 कोटी ग्राहक मिळणार आहेत. बीएसएनएलच्या 3 जी हून 4 जी मध्ये जाण्याच्या प्रयत्नांना व्होडाफोन आयडियाचे नेटवर्क मदत करेल. यामुळे 1 रुपयांत कंपनीच खरेदी करण्याची ऑफर याच संदर्भातून देण्यात आली आहे. जर सरकारने कंपनीला वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर टेलिकॉम सेक्टर बुडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रोहतगी यांनी मीडिय़ाला आधीच इशारा दिलेला आहे. जर कंपनी बंद पडली तर टेलिकॉम सेक्टरमध्ये स्पर्धा संपून जाईल आणि केवळ दोनच कंपन्या उरतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोनने 2150 कोटीं सरकारी तिजोरीत जमा केले होते. यानंतर रविवारी एक हजार कोटी भरले आहेत. कंपनीला 15 वर्षांचा अवधी हवा आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBSNLबीएसएनएल