शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
2
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
3
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
4
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
5
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
6
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
7
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
8
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
9
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
10
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
11
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
12
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
13
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
14
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
15
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
16
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
17
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
18
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
19
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
20
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?

लोकसभा निवडणुकीतच टेलिकॉम कंपन्यांचा प्लॅन? रिचार्ज १५-१७ टक्क्यांनी महागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 1:59 PM

Tarrif Plan Hike: मोबाईल रिचार्जमध्ये ही वाढ साधारण तीन वर्षांनी केली जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला होण्याची शक्यता आहे. 

सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ सुरु झाला आहे. अद्याप प्रचाराला वेग आलेला नसला तरी टेलिकॉम कंपन्यांनी मात्र वेगवान इंटरनेटसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. वेगवान इंटरनेट आणि कॉलिंगचा वापर या काळात वाढणार आहे. यामुळे कंपन्यांनी टॅरिफ प्लॅनचे दर वाढविण्याची तयारी केल्याचे वृत्त येत आहे. 

मोबाईल रिचार्जमध्ये ही वाढ साधारण तीन वर्षांनी केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच रिचार्ज प्लॅन १५ ते १७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फायदा एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला होण्याची शक्यता आहे. 

जर रिचार्ज वाढले तर त्याचा थेट फटका तुमच्या खिशावर पडणार आहे. आता जवळपास १० रुपयांच्या आत कोणतेच महिनाभराचे रिचार्ज येत नाही. फाईव्ह जी वापरायचे असल्यास कमीतकमी २४० रुपयांचे रिचार्ज मारावे लागत आहे. अशातच १५ ते १७ टक्क्यांनी रिचार्ज वाढल्यास त्यावरील कर आदी पकडून हे रिचार्ज ३०० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२१ मध्ये कंपन्यांनी २० टक्क्यांची वाढ केली होती. 

व्होडाफोन आयडिया आर्थिक संकटात आहेत. यामुळे इतर कंपन्यांनी रिचार्ज वाढविले की ही कंपनी देखील त्यांचे फोरजी प्लॅन महाग करणार आहे. अद्याप या कंपन्यांकडून काही माहिती आलेली नाही. परंतु रिपोर्टनुसार आता फास्ट इंटरनेटसाठी जेवढे जेवढे पैसे मोजावे लागतायत त्यापेक्षा १४ रुपये जास्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. मोबाईल कंपन्या थेट फाईव्ह जी वापरणाऱ्यांना टार्गेट करू शकतात. सध्या फ्री असले तरी सवय लागली आहे. ते आता या डेटावर लिमिट आणि पैसे आकारू शकतात. 

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)