शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीतच टेलिकॉम कंपन्यांचा प्लॅन? रिचार्ज १५-१७ टक्क्यांनी महागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 14:00 IST

Tarrif Plan Hike: मोबाईल रिचार्जमध्ये ही वाढ साधारण तीन वर्षांनी केली जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला होण्याची शक्यता आहे. 

सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ सुरु झाला आहे. अद्याप प्रचाराला वेग आलेला नसला तरी टेलिकॉम कंपन्यांनी मात्र वेगवान इंटरनेटसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. वेगवान इंटरनेट आणि कॉलिंगचा वापर या काळात वाढणार आहे. यामुळे कंपन्यांनी टॅरिफ प्लॅनचे दर वाढविण्याची तयारी केल्याचे वृत्त येत आहे. 

मोबाईल रिचार्जमध्ये ही वाढ साधारण तीन वर्षांनी केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच रिचार्ज प्लॅन १५ ते १७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फायदा एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला होण्याची शक्यता आहे. 

जर रिचार्ज वाढले तर त्याचा थेट फटका तुमच्या खिशावर पडणार आहे. आता जवळपास १० रुपयांच्या आत कोणतेच महिनाभराचे रिचार्ज येत नाही. फाईव्ह जी वापरायचे असल्यास कमीतकमी २४० रुपयांचे रिचार्ज मारावे लागत आहे. अशातच १५ ते १७ टक्क्यांनी रिचार्ज वाढल्यास त्यावरील कर आदी पकडून हे रिचार्ज ३०० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२१ मध्ये कंपन्यांनी २० टक्क्यांची वाढ केली होती. 

व्होडाफोन आयडिया आर्थिक संकटात आहेत. यामुळे इतर कंपन्यांनी रिचार्ज वाढविले की ही कंपनी देखील त्यांचे फोरजी प्लॅन महाग करणार आहे. अद्याप या कंपन्यांकडून काही माहिती आलेली नाही. परंतु रिपोर्टनुसार आता फास्ट इंटरनेटसाठी जेवढे जेवढे पैसे मोजावे लागतायत त्यापेक्षा १४ रुपये जास्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. मोबाईल कंपन्या थेट फाईव्ह जी वापरणाऱ्यांना टार्गेट करू शकतात. सध्या फ्री असले तरी सवय लागली आहे. ते आता या डेटावर लिमिट आणि पैसे आकारू शकतात. 

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)