शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

तंत्रज्ञानाचे संक्रमण

By अनिल भापकर | Updated: January 14, 2018 01:44 IST

सोशल मीडिया मुळे अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा घडतात जसे कि आपला देश हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात जवळपास प्रत्येक महिन्याला काहीना काही सण असतो, असं म्हणायलाही काही हरकत नाही.त्या प्रत्येक सणांची माहिती जसे कि सणांचे महत्व ते का साजरे करायचे आदी सोशल मीडियावर त्या त्या सणाच्या काही दिवस अगोदर फिरत असते. म्हणजेच आजच्या धावपळीच्या तसेच विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात नवीन पिढीला आपल्या सणावाराचे महत्व सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळत असते .सोशल मीडिया मुळे तंत्रज्ञानाच्या संक्रमणा सोबतच संस्काराचे सुद्धा संक्रमण होते असे म्हणता येईल.

ठळक मुद्देआजकाल तंत्रज्ञान म्हटले कि प्रामुख्याने स्मार्टफोन आणि सोशल मीडिया याच विषयीची चर्चा होते कारण ‘सोशल मीडिया’चा वापर हा सध्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनला आहे.नवीन पिढीला आपल्या सणावाराचे महत्व सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळत असते .सोशल मीडिया मुळे तंत्रज्ञानाच्या संक्रमणा सोबतच संस्काराचे सुद्धा संक्रमण होते असे म्हणता येईल. सोशल मीडिया हे आपल्या हाती आलेले एक मोठे अस्र आहे आता त्याचा वापर चांगल्यासाठी करायचा कि वाईटासाठी हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.हे तंत्रज्ञानाचे संक्रमण आपण कशा पद्धतीने स्वीकारायचे हे आपणच ठरवले पाहिजे.

सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात.मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. संक्रमण हा जगाचा नियमच आहे आणि संपूर्ण जग या नियमाला बांधील आहे, त्यामुळे ते स्वीकारणे आणि जगाच्या गतीसोबत आपली गती कायम राखणे आपल्याला अनिवार्य आहे. या संक्रमण प्रक्रियेला तंत्रज्ञानाचा तरी कसा अपवाद राहील.

आजकाल तंत्रज्ञान म्हटले कि प्रामुख्याने स्मार्टफोन आणि सोशल मीडिया याच विषयीची चर्चा होते कारण ‘सोशल मीडिया’चा वापर हा सध्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनला आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप किंवा ट्वीटरसारख्या सोशल मीडियाने सर्वसामान्यांचे जीवनच व्यापून टाकले आहे एवढी मोठी व्याप्ती या सोशल मीडिया ची आहे.

ज्या लोकांना कधी काळी चार ओळीचे पत्र लिहिताना सुद्धा घाम फुटायचा ते लोक आता फेसबुक आणि व्हाट्सअँप सारख्या सोशल मीडिया च्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहे.आपले म्हणणे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहे.सोशल मीडिया च्या गैरवापरावरून नेहमी टिका होते.खरेतर सोशल मीडिया हा चांगला कि वाईट यावर अनेकदा चर्चा होते मात्र कोणताही मीडिया हा कधीही चांगला किंवा वाईट नसतो. त्याचा वापर करणारा त्याचा वापर कसा करतो यावर सारे अवलंबून असते.

सोशल मीडिया मुळे अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा घडतात जसे कि आपला देश हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात जवळपास प्रत्येक महिन्याला काहीना काही सण असतो, असं म्हणायलाही काही हरकत नाही.त्या प्रत्येक सणांची माहिती जसे कि सणांचे महत्व ते का साजरे करायचे आदी  सोशल मीडियावर त्यात्या सणाच्या काही दिवस अगोदर फिरत असते. म्हणजेच आजच्या धावपळीच्या तसेच विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात नवीन पिढीला आपल्या सणावाराचे महत्व सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळत असते .सोशल मीडिया मुळे तंत्रज्ञानाच्या संक्रमणा सोबतच संस्काराचे सुद्धा संक्रमण होते असे म्हणता येईल.

त्यासाठी सोशल मीडियाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. सोशल मीडियाला दुय्यम समजण्याची आवश्यकता नाही आणि त्याच वेळी त्याला अवास्तव महत्त्व देण्याचीही गरज नाही.अनेकदा आपण जी माहिती सोशल मीडियावर फॉरवर्ड करत असतो त्याची सत्यता पडताळून मगच ती शेअर करायला हवी.सोशल मीडिया हे आपल्या हाती आलेले एक मोठे अस्र आहे आता त्याचा वापर चांगल्यासाठी करायचा कि वाईटासाठी हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.हे  तंत्रज्ञानाचे संक्रमण आपण कशा पद्धतीने स्वीकारायचे हे आपणच ठरवले पाहिजे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल