शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाचे संक्रमण

By अनिल भापकर | Updated: January 14, 2018 01:44 IST

सोशल मीडिया मुळे अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा घडतात जसे कि आपला देश हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात जवळपास प्रत्येक महिन्याला काहीना काही सण असतो, असं म्हणायलाही काही हरकत नाही.त्या प्रत्येक सणांची माहिती जसे कि सणांचे महत्व ते का साजरे करायचे आदी सोशल मीडियावर त्या त्या सणाच्या काही दिवस अगोदर फिरत असते. म्हणजेच आजच्या धावपळीच्या तसेच विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात नवीन पिढीला आपल्या सणावाराचे महत्व सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळत असते .सोशल मीडिया मुळे तंत्रज्ञानाच्या संक्रमणा सोबतच संस्काराचे सुद्धा संक्रमण होते असे म्हणता येईल.

ठळक मुद्देआजकाल तंत्रज्ञान म्हटले कि प्रामुख्याने स्मार्टफोन आणि सोशल मीडिया याच विषयीची चर्चा होते कारण ‘सोशल मीडिया’चा वापर हा सध्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनला आहे.नवीन पिढीला आपल्या सणावाराचे महत्व सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळत असते .सोशल मीडिया मुळे तंत्रज्ञानाच्या संक्रमणा सोबतच संस्काराचे सुद्धा संक्रमण होते असे म्हणता येईल. सोशल मीडिया हे आपल्या हाती आलेले एक मोठे अस्र आहे आता त्याचा वापर चांगल्यासाठी करायचा कि वाईटासाठी हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.हे तंत्रज्ञानाचे संक्रमण आपण कशा पद्धतीने स्वीकारायचे हे आपणच ठरवले पाहिजे.

सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात.मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. संक्रमण हा जगाचा नियमच आहे आणि संपूर्ण जग या नियमाला बांधील आहे, त्यामुळे ते स्वीकारणे आणि जगाच्या गतीसोबत आपली गती कायम राखणे आपल्याला अनिवार्य आहे. या संक्रमण प्रक्रियेला तंत्रज्ञानाचा तरी कसा अपवाद राहील.

आजकाल तंत्रज्ञान म्हटले कि प्रामुख्याने स्मार्टफोन आणि सोशल मीडिया याच विषयीची चर्चा होते कारण ‘सोशल मीडिया’चा वापर हा सध्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनला आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप किंवा ट्वीटरसारख्या सोशल मीडियाने सर्वसामान्यांचे जीवनच व्यापून टाकले आहे एवढी मोठी व्याप्ती या सोशल मीडिया ची आहे.

ज्या लोकांना कधी काळी चार ओळीचे पत्र लिहिताना सुद्धा घाम फुटायचा ते लोक आता फेसबुक आणि व्हाट्सअँप सारख्या सोशल मीडिया च्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहे.आपले म्हणणे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहे.सोशल मीडिया च्या गैरवापरावरून नेहमी टिका होते.खरेतर सोशल मीडिया हा चांगला कि वाईट यावर अनेकदा चर्चा होते मात्र कोणताही मीडिया हा कधीही चांगला किंवा वाईट नसतो. त्याचा वापर करणारा त्याचा वापर कसा करतो यावर सारे अवलंबून असते.

सोशल मीडिया मुळे अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा घडतात जसे कि आपला देश हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात जवळपास प्रत्येक महिन्याला काहीना काही सण असतो, असं म्हणायलाही काही हरकत नाही.त्या प्रत्येक सणांची माहिती जसे कि सणांचे महत्व ते का साजरे करायचे आदी  सोशल मीडियावर त्यात्या सणाच्या काही दिवस अगोदर फिरत असते. म्हणजेच आजच्या धावपळीच्या तसेच विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात नवीन पिढीला आपल्या सणावाराचे महत्व सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कळत असते .सोशल मीडिया मुळे तंत्रज्ञानाच्या संक्रमणा सोबतच संस्काराचे सुद्धा संक्रमण होते असे म्हणता येईल.

त्यासाठी सोशल मीडियाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. सोशल मीडियाला दुय्यम समजण्याची आवश्यकता नाही आणि त्याच वेळी त्याला अवास्तव महत्त्व देण्याचीही गरज नाही.अनेकदा आपण जी माहिती सोशल मीडियावर फॉरवर्ड करत असतो त्याची सत्यता पडताळून मगच ती शेअर करायला हवी.सोशल मीडिया हे आपल्या हाती आलेले एक मोठे अस्र आहे आता त्याचा वापर चांगल्यासाठी करायचा कि वाईटासाठी हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.हे  तंत्रज्ञानाचे संक्रमण आपण कशा पद्धतीने स्वीकारायचे हे आपणच ठरवले पाहिजे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल