शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

बॅड न्यूज! पुन्हा एकदा वाढू शकतात स्मार्टफोन्सच्या किंमती; या कारणांमुळे होऊ शकते 10 टक्के भाववाढ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 18:04 IST

कच्च्या मालाच्या आयतीमध्ये समस्या येत असल्यामुळे गेल्या सहा महिन्यात मोबाईल्सच्या किंमती वाढवल्या जात आहेत.

गेले काही महिने देशातील स्मार्टफोन कंपन्या आपल्या मोबाईल्सच्या किंमती वाढवत आहेत. या महागाईतून दिलासा मिळण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत कारण भारतीय स्मार्टफोन ग्राहकांना अजून एक झटका लागणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या काही महिन्यात ग्राहकांना नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्त किंमत द्यावी लागेल. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आता फोन विकत घेणे फायदेशीर ठरू शकतो.  

समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी सणासुदीच्या काळात स्मार्टफोन कंपन्या सध्या उपलब्ध असलेल्या फोन्सच्या किंमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढवू शकतात. सध्या जरी बरेचशे फोन्स भारतात बनत असले तरी कच्चा माल अजूनही चीनमधून येत आहे. या कच्च्या मालाच्या आयतीमध्ये समस्या येत असल्यामुळे गेल्या सहा महिन्यात मोबाईल्सच्या किंमती वाढवल्या जात आहेत.  

कोरोना महामारीमुळे घरून काम करणाऱ्यांचे आणि ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि लॅपटॉप्सच्या मागणीत वाढ झाली आहे. हे डिवाइस बनवण्यासाठी लागणाऱ्या कंपोनंट्सच्या किंमती चीनमध्ये वाढल्या आहेत. तसेच काही कंपोनंटस बाजारात उपलब्ध देखील होत नाहीत. या सर्वांचा दबाव गॅजेट्स निर्माता कंपन्यांवर पडत आहे. त्यामुळे मागणी जास्त असूनही सणासुदीच्या काळात स्मार्टफोन कंपन्या आपल्या जुन्या तसेच नव्या स्मार्टफोन्सचे भाव वाढवू शकतात.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन