शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

सोळा जिल्हयांवर दुष्काळी छाया!

By admin | Updated: July 15, 2015 23:12 IST

लोकमत विशेष

लोकमत विशेष
पावसाचे प्रमाण खूपच कमी

पुणे : जून महिन्यात काही ठिकाणी बरसल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे राज्याची स्थिती बिघडली आहे. १६ जिल्हयांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने या जिल्हयांवर दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होऊ लागली आहे. दुष्काळाच्या या झळा प्रामुख्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्हयांना बसत आहेत. आतापर्यंत राज्यात सर्वात कमी पाऊस हा लातूर व परभणी जिल्हयात पडला असून तो सरासरीपेक्षा तब्बल ५३ टक्क्यांनी कमी आहे.
यंदा देशात सरासरीपेक्षा कमी केवळ ८८ टक्केच पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहिर केले होते. त्यावरून महाराष्ट्रातही यंदा कमी पाऊस पडणार, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शेतकरी अगोदरपासून चिंताग्रस्त आहेत. अशातच पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांच्या डोळयात पाणी आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी खरीपाची पेरणी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पिके उगवली आहेत. मात्र पाऊस नसल्याने ती जळू लागली आहेत. यामुळे अनेक शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
जून महिन्यात उशीरा राज्यात दाखल झाल्यानंतरही चांगला पाऊस पडल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयात गायब झालेला पाऊस अर्धा जुलै महिना संपायला आला तरी परतलेला नाही. त्यामुळे राज्यातील स्थिती चिंताजनक बनत चालली आहे.
राज्यातील १६ जिल्हयांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडल्याने तेथे दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. आतापर्यंत राज्यात सर्वात कमी पाऊस हा लातूर आणि परभणी जिल्हयात पडला आहे. त्यापाठोपाठ बीड जिल्हयात ५० टक्के उस्मानाबाद जिल्हयात सरासरीपेक्षा ४९ टक्के कमी पाऊस, जळगाव जिल्हयात ४४ टक्के कमी पाऊस पडला आहे.
मराठवाडयात जूनपासून आतापर्यंत तुरळक सोडता पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे तेथे स्थिती खूपच भयावह आहे. त्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातही अशीच स्थिती आहे. विशेष म्हणजे, कोकणासारख्या सर्वाधिक पावसाच्या भागातील २ जिल्हयांनाही दुष्काळाने घेरले आहे. तेथेही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.
-----------
चौकट---
पंधरा जिल्हयांमध्ये सरासरीएवढा पाऊस
राज्यातील १५ जिल्हयांमध्ये सरासरीएवढा पाऊस पडला आहे. हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार सरासरीपेक्षा जरी पाऊस २० टक्क्यांपर्यंत कमी पडला तरी तो सरासरीएवढाच पकडला जातो. त्यानुसार १५ जिल्हयांमध्ये पावसाचे प्रमाण आतापर्यंत चांगले असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत सरासरीपेक्षा १३ टक्के जास्त, अमरावतीत १६ टक्के जास्त पाऊस पडला आहे.
----------