शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

सोळा जिल्हयांवर दुष्काळी छाया!

By admin | Updated: July 15, 2015 23:12 IST

लोकमत विशेष

लोकमत विशेष
पावसाचे प्रमाण खूपच कमी

पुणे : जून महिन्यात काही ठिकाणी बरसल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे राज्याची स्थिती बिघडली आहे. १६ जिल्हयांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने या जिल्हयांवर दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होऊ लागली आहे. दुष्काळाच्या या झळा प्रामुख्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्हयांना बसत आहेत. आतापर्यंत राज्यात सर्वात कमी पाऊस हा लातूर व परभणी जिल्हयात पडला असून तो सरासरीपेक्षा तब्बल ५३ टक्क्यांनी कमी आहे.
यंदा देशात सरासरीपेक्षा कमी केवळ ८८ टक्केच पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहिर केले होते. त्यावरून महाराष्ट्रातही यंदा कमी पाऊस पडणार, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शेतकरी अगोदरपासून चिंताग्रस्त आहेत. अशातच पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांच्या डोळयात पाणी आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी खरीपाची पेरणी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पिके उगवली आहेत. मात्र पाऊस नसल्याने ती जळू लागली आहेत. यामुळे अनेक शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
जून महिन्यात उशीरा राज्यात दाखल झाल्यानंतरही चांगला पाऊस पडल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयात गायब झालेला पाऊस अर्धा जुलै महिना संपायला आला तरी परतलेला नाही. त्यामुळे राज्यातील स्थिती चिंताजनक बनत चालली आहे.
राज्यातील १६ जिल्हयांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडल्याने तेथे दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. आतापर्यंत राज्यात सर्वात कमी पाऊस हा लातूर आणि परभणी जिल्हयात पडला आहे. त्यापाठोपाठ बीड जिल्हयात ५० टक्के उस्मानाबाद जिल्हयात सरासरीपेक्षा ४९ टक्के कमी पाऊस, जळगाव जिल्हयात ४४ टक्के कमी पाऊस पडला आहे.
मराठवाडयात जूनपासून आतापर्यंत तुरळक सोडता पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे तेथे स्थिती खूपच भयावह आहे. त्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातही अशीच स्थिती आहे. विशेष म्हणजे, कोकणासारख्या सर्वाधिक पावसाच्या भागातील २ जिल्हयांनाही दुष्काळाने घेरले आहे. तेथेही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.
-----------
चौकट---
पंधरा जिल्हयांमध्ये सरासरीएवढा पाऊस
राज्यातील १५ जिल्हयांमध्ये सरासरीएवढा पाऊस पडला आहे. हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार सरासरीपेक्षा जरी पाऊस २० टक्क्यांपर्यंत कमी पडला तरी तो सरासरीएवढाच पकडला जातो. त्यानुसार १५ जिल्हयांमध्ये पावसाचे प्रमाण आतापर्यंत चांगले असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत सरासरीपेक्षा १३ टक्के जास्त, अमरावतीत १६ टक्के जास्त पाऊस पडला आहे.
----------