शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मस्तच! 'या' स्मार्टफोनची बॅटरी आठवडाभर चालणार; चार्जिंगची कटकट वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 12:59 IST

तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी तुमचा मूड ठरवते असे नुकतेच एका अभ्यासामध्ये समोर आले आहे.

नवी दिल्ली : तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी तुमचा मूड ठरवते असे नुकतेच एका अभ्यासामध्ये समोर आले आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर बॅटरी संपत येईपर्यंत पुन्हा आपण घरी पोहोचू की अन्य कुठे चार्जिंग करता येईल, याचे विचार मनात घोऴत असतात. आता तर चांगली बॅटरी लाईफ देणारे मोबाईलची मागणी होत आहे. म्हणूनच जपानची ही कंपनी चक्क आठवडाभर चालणारा स्मार्टफोन आणणार आहे. 

टीव्हीमुळे ऐकिवात असलेली कंपनी Sharp ने याची घोषणा केली आहे. Sharp S7 लाँच करण्यात येणार आहे. हा फोन Sharp Aquos Sense 3 Lite चे पुढील व्हर्जन असणार आहे. Sharp S7 हा फोन एकदा चार्जिंग केल्यावर 7 दिवसांची बॅटरी लाईफ देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 4 हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. नुकताच हा फोन जपानमध्ये दाखविण्यात आला. येत्या डिसेंबरमध्ये हा फोन लाँच होणार आहे. 

peach, silver आणि gray अशा तीन रंगांत हा फोन मिळणार आहे. Gizmochina वर दिलेल्या माहितीनुसार या फोनचे वजन 167 ग्रॅम आहे. अँड्रॉईड वन ऑपरेटिंग सिस्टिम असणार असून 5.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनचे रिझोल्युशन 2160 x 1080 पिक्सल आहे. 

या फोनची बॅटरी दीर्घकाळ टिकण्यासाठी IGZO LCD energy-saving तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे बॅटरी तब्बल 7 दिवस म्हणजे 168 तास चालू राहणार आहे. Snapdragon 630 प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. पाठिमागे 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलJapanजपान